शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

महाराष्ट्र निवडणूक 2019: युती तुटली का?; उद्धव ठाकरेंनी थेट उत्तर टाळलं, पण भाजपाला डिवचलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 21:33 IST

युतीवर भाष्य करणं टाळलं; भाजपाला टोला

मुंबई: बहुमताचा दावा करण्यात अपयशी ठरल्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी प्रथमच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी युतीवर थेट भाष्य करणं टाळलं. मात्र भाजपाला डिवचण्याची संधी त्यांनी सोडली नाही. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या भिन्न विचारसरणीवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना यावेळी उद्धव ठाकरेंनी टोला लगावला. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी कसे काय एकत्र येणार, असे प्रश्न अनेकांना पडू लागले आहेत. त्यांना भाजपा आणि मेहबूबा मुफ्ती कसे एकत्र आले, असा प्रश्न मला विचारावासा वाटतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. जम्मू काश्मीरमध्ये भाजपा आणि मुफ्ती एकत्र कसे आले? नितीशकुमार-भाजपा कसे एकत्र आले? पासवान आणि भाजपा सोबत कसे आले? मोदी हटाव म्हणणारे चंद्राबाबू आणि भाजपा कसे एकत्र आले?, असे प्रश्न उद्धव यांनी उपस्थित केले. भाजपा आणि या विचारधारांचा संगम नेमक्या कोणत्या संगमावर झाला याची माहिती मागितली आहे, असा चिमटादेखील त्यांनी काढला. यावेळी उद्धव ठाकरेंना युती तुटली का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी स्पष्टपणे भाष्य करणं टाळलं. ज्या गोष्टी करायच्या, त्या बेधडकपणे करेन. आत्ता मी जेवढं बोलतोय तेवढं बोलतोय, असं उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी त्यांनी भाजपाच्या शुभेच्छांवरदेखील भाष्य केलं. ‘भाजपाने असमर्थता दर्शवल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी आम्हाला आघाडीसोबत जाण्यासाठी शुभेच्छा दिल्या होत्या. आम्ही भाजपाला मित्र मानतो. मित्रानं दिशा दाखवली असेल आणि त्या दिशेनं न जाणं हा मित्रत्वाला कलंक ठरेल,’ असं उद्धव ठाकरे म्हणाले. उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या अरविंद सावंत यांचे आभार मानले. मला अरविंद सावंत यांना धन्यवाद द्यायचे आहेत. शिवसेनाप्रमुखांचा शिवसैनिक कडवट असतो. आपल्या पक्षाला दिल्लीत विचित्र वागणूक मिळतेय, हे लक्षात येताच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. असेच कडवट शिवसैनिक हीच माझी शक्ती असल्याचं ते म्हणाले. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेस