शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

पडळकरांच्या भाषणात धनगर आरक्षणाऐवजी कलम 370, तीन तलाकचा मुद्दा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 18:08 IST

सभेत बोलताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा कुठेचं उल्लेख केला नाही.

मुंबई - वंचित बहुजन आघाडीकडून लोकसभा निवडणुकीत रिंगणात उतरणारे गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. वंचितमध्ये असताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाच्या मुद्यावरून सरकार विरोधात रान उठवले होते. मात्र आता भाजपमध्ये जाताच पडळकरांच्या भाषणातून हा मुद्दा गायब झाला असून, कलम 370, तीन तलाकवर ते बोलताना पहायला मिळत आहे. माण-खटाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत ते बोलत होते.

राजकारणाच्या सुरुवातील महादेव जानकरांच्या रासपामध्ये, 2014 ची निवडणूक भाजपाकडून, 2019 लोकसभा वंचित बहुजन आघाडीकडून आणि आता पुन्हा 2019 विधानसभा निवडणूक भाजपाकडून असा पडळकर यांचा राजकीय प्रवास आहे. भाजप सोडल्यानंतर पडळकर यांनी धनगर समजाच्या आरक्षणाच्या मुद्यावरून सत्ताधारी पक्षाला वेळोवेळी घेरण्याचा प्रयत्न केला. तर पडळकर यांनी याचा मुद्द्यावरून राज्यभर सभा सुद्धा घेतल्या होत्या.

मात्र आता नुकतेच त्यांची भाजपमध्ये घरवापसी झाली आहे. तर भाजपमध्ये जाताच पडळकर यांना धनगर आरक्षणाचा विसर पडला असल्याचे बोलले जात आहे. माण-खटाव मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित केलेल्या सभेत बोलताना पडळकर यांनी कलम 370,तीन तलाक,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विदेश दौरे यावर भाषण ठोकले. त्यामुळे त्यांच्या भाषणाची चांगलीच चर्चा पहायला मिळत आहे.

या सभेत बोलताना पडळकर यांनी धनगर आरक्षणाचा कुठेचं उल्लेख केला नाही. कलम 370 मुळे काश्मीरमधील लोकांना कसा फायदा मिळणार याचा लेखा-जोखा त्यांनी यावेळी मांडला. त्यामुळे विरोधात असताना धनगर आरक्षणाच्या मुद्द्यावरून बोलणारे पडळकर भाजपात येताच कलम 370, तीन तलाकवर बोलू लागले असल्याची चर्चा पाहायला मिळाली.