शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 12:35 IST

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 12 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला संघर्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक अशा घडामोडी राज्यात घडत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला सहकार्य करण्याबद्दल फारशा अनुकूल नाहीत. मात्र काँग्रेसचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक आहे.भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असं मत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचीदेखील हीच भूमिका असल्याचा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसमधील तरुण गट शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अतिशय आग्रही आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना मात्र शिवसेनेला सहकार्य करण्याचा विचार फारसा पटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेनं सरकार स्थापन करावं आणि काँग्रेसनं त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाबद्दल काँग्रेसचे दिल्लीतील नेते अनुकूल नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असं दिल्लीतील नेत्यांचं मत असल्याचं समजतं. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसनं समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसनं सावध भूमिका घ्यावी, असं ज्येष्ठांना वाटतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस