शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

महाराष्ट्र निवडणूक 2019: काँग्रेसचा एक गट देणार शिवसेनेला 'हात'?; भाजपाला दूर ठेवण्याच्या हालचाली जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 12:35 IST

राज्यात नव्या राजकीय समीकरणांचे संकेत

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन 12 दिवस उलटले तरी अद्याप राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. शिवसेना, भाजपामध्ये सुरू असलेला संघर्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीची वाढलेली जवळीक अशा घडामोडी राज्यात घडत आहेत. राष्ट्रवादी शिवसेनेला सत्ता स्थापनेसाठी पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस द्विधा मनस्थितीत आहे. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी शिवसेनेला सहकार्य करण्याबद्दल फारशा अनुकूल नाहीत. मात्र काँग्रेसचा एक गट शिवसेनेसोबत जाण्यास उत्सुक आहे.भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसनं शिवसेनेला पाठिंबा द्यावा, असा एक मतप्रवाह काँग्रेसमध्ये आहे. शिवसेना किंवा राष्ट्रवादीकडून सरकार स्थापनेसाठी प्रस्ताव आलाच तर तो मान्य करावा, असं मत काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केलं आहे. यासोबतच विश्वजीत कदम, अमित देशमुख यांचीदेखील हीच भूमिका असल्याचा दावा पाटील यांनी केला. काँग्रेसमधील तरुण गट शिवसेनेला पाठिंबा देण्याविषयी अतिशय आग्रही आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेत्यांना मात्र शिवसेनेला सहकार्य करण्याचा विचार फारसा पटत नाही. त्यामुळे राष्ट्रवादी व शिवसेनेनं सरकार स्थापन करावं आणि काँग्रेसनं त्यास बाहेरुन पाठिंबा द्यावा, या प्रस्तावाबद्दल काँग्रेसचे दिल्लीतील नेते अनुकूल नाहीत. त्याचा राष्ट्रवादी-शिवसेना-भाजपला होईल, काँग्रेसला मात्र बळ मिळणार नाही, असं दिल्लीतील नेत्यांचं मत असल्याचं समजतं. उत्तर प्रदेशात याआधी काँग्रेसनं समाजवादी पक्ष आणि मायावतीच्या बसपा या दोन पक्षांना बाहेरुन पाठिंबा दिला होता. त्यावेळी काँग्रेसचा जनाधार कमी झाला आणि हे दोन पक्ष वाढले. त्याची पुनरावृत्ती महाराष्ट्रात होऊ नये असं काँग्रेस नेत्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रवादी-शिवसेनेचं सरकार आल्यास अनेक काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीकडे वळतील व काँग्रेस दुबळी होईल. शिवाय, हे सरकार किती काळ टिकेल याचीही खात्री नाही. त्यामुळे काँग्रेसनं सावध भूमिका घ्यावी, असं ज्येष्ठांना वाटतं.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv Senaशिवसेनाcongressकाँग्रेसNCPराष्ट्रवादी काँग्रेस