शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
सुनेची काळजी घेण्यासाठी निघालेल्या यास्मिन; तीन दिवस प्रवास पुढे ढकलला, विमान अपघातात मृत्यू
4
Navi Mumbai: नवी मुंबई विमानतळावर लँडिंग करण्याआधी वैमानिकांसमोर २२५ अडथळे!
5
लव जिहादच्या आरोपावर आमिर खानने दिलं उत्तर, म्हणाला, "माझ्या दोन्ही बहिणी अन् मुलीने..."
6
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
7
Thane: मुंब्रा-शीळ भागात आणखी ८ इमारती जमीनदोस्त!
8
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
9
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
10
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
11
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
12
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
13
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
14
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
15
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
16
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
17
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
18
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
19
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
20
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन

Maharashtra Election 2019: नितीन गडकरींनी व्यक्त केली खंत; आयारामांमुळे भाजपाची संस्कृती बदलेल अन्यथा... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2019 08:44 IST

नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत.

नागपूर - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारण ढवळून निघालं आहे. अशातच निवडणुकीपूर्वी राज्यात पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाल्याचं पाहायला मिळालं. अनेक काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेत्यांनी पक्षाला रामराम करत सत्ताधारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. यावरुन भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी खंत व्यक्त केली आहे. 

माध्यमाशी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आयारामांमुळे भाजपाचं कल्चर बदलेल अन्यथा त्यांचे कल्चर बदलेल, शेवटी काळाच्या ओघात पक्ष विस्तार करण्यासाठी माणसं जोडावी लागतात. नागपूरमध्ये जेवढे पदाधिकारी आहेत त्यातील ९० टक्के काँग्रेसचे आहेत. काँग्रेस मोठा पक्ष होता. त्यातून ते पक्षात आले त्यांनी पक्षाची संस्कृती स्वीकारली असं म्हणत गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांवर भाष्य केलं आहे. 

तसेच यंदाच्या निवडणुकीत भाजपाला अनुकुलता आहे, शिवसेनेसोबतची युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आहे. पक्ष मोठा झाला की सगळेच जण प्रवेश करतात. आशिष देशमुख जसं मॉर्निंग वॉक करतात तसं पक्ष बदलत असतात. देवेंद्र फडणवीस सर्वाधिक मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास नितीन गडकरींनी व्यक्त केला. 

दरम्यान, मागील निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादीला जितक्या जागा मिळाल्या होत्या तेवढ्या जागा टिकविणं हे आव्हान विरोधी पक्षांसमोर आहे, मात्र शिवसेना-भाजपा महायुती चांगल्या घेत पुन्हा निवडून येणार आहे. पुन्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असंही नितीन गडकरींनी स्पष्ट केलं. 

नितीन गडकरी यांनी पहिल्यांदाच अशाप्रकारे विधान केलं असं नाही, तर यापूर्वीही अनेकदा नितीन गडकरींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना टोला लगावला होता. राज्यातील काही नेते असे असतात जे सत्तेशिवाय राहू शकत नाही, त्यामुळे अनेकदा ही मंडळी सत्ताधारी पक्षात प्रवेश करत असतात. त्यामुळे अशा नेत्यांना लोकांनी धडा शिकविला पाहिजे असं मत गडकरींनी यापूर्वी व्यक्त केलं होतं. नितीन गडकरी यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियातही मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना पाहायला मिळत होते.  विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक मातब्बर नेते विजयसिंह मोहिते पाटील, मधुकर पिचड, शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, वैभव पिचड, चित्रा वाघ, कालिदास कोळंबकर अशा नेत्यांनी भाजपात प्रवेश केला

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीBJPभाजपाcongressकाँग्रेस