शहरं
Join us  
Trending Stories
1
Jharkhand: झारखंडमध्ये भीषण अपघात, कावडियांची बस ट्रकवर आदळली; १९ जणांचा मृत्यू
2
Nimisha Priya : केरळमधील नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा रद्द; भारताच्या मुत्सद्देगिरीला अखेर यश
3
खेकड्यांनी धरण पोखरल्यानंतर आता नवा शोध! मंत्री म्हणतात, ४००० टन कोळसा पावसात वाहून गेला...
4
राज्यात नव्या राजकीय समीकरणाची नांदी; शेकापच्या कार्यकर्त्यांना राज ठाकरे करणार मार्गदर्शन
5
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
6
आजचे राशीभविष्य २९ जुलै २०२५ : आर्थिक लाभाचे योग, नोकरीत वरिष्ठ देखील खुश होतील
7
समाज माध्यमांत राज्य सरकारवर टीका केल्यास कर्मचाऱ्यांवर ‘शिस्तभंग’; परिपत्रक जारी
8
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
9
...तर सत्ताकांक्षी भाजपा भविष्यहीन पक्ष बनेल; आता योद्धे हवेत, भाड्याचे तट्टू कामाचे नाहीत!
10
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
11
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
12
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
13
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
14
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
15
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
16
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
17
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
18
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
19
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
20
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!

Maharashtra Election 2019 : सलग दुसऱ्या दिवशी राज्यात मुसळधार; मुंबईवर मळभ, मतदानावर पावसाचे सावट

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2019 06:40 IST

Maharashtra Election 2019: परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला.

मुंबई/पुणे/कोल्हापूर/औरंगाबाद : परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे भात, द्राक्षे, सोयाबीन या पिकांना फटका बसला आहे. अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून पुढील चार दिवस राज्यात कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे़

गेल्या तीन दिवसांपासून पडणाºया मुसळधार पावसाने रत्नागिरी व सिंधुदूर्ग जिल्ह्यात भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, कापलेली भातशेती पावसामध्ये भिजत आहे. कोल्हापूर जिल्ह्यात परतीच्या पावसाने अक्षरश: धुमाकूळ घातला असून भात, नागली पिके जमिनीवर झोपली आहेत. ‘भोगावती’चे पाणी पात्राबाहेर पडले आहे. पंचगंगेच्या पातळीत दिवसभरात दोन फुटांची वाढ झाली.

सांगली आणि सातारा जिल्ह्याला शनिवारी रात्री मुसळधार पावसाने झोडपून काढल्यानंतर रविवारीही बहुतांश भागात पावसाने हजेरी लावली. सोलापूर व पुणे जिल्ह्यातही संततधार पावसाने जनजीवन विस्कळित झाले.

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात सोमवारी होत असलेल्या विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी पूर्ण झाली असतानाच, दुसरीकडे या दिवशी मुंबई, कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दरम्यान, रविवारी सलग तिसºया दिवशीही मुंबईवरील मळभ कायम होती. भारतीय हवामान शास्त्र विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची नोंद झाली. गोव्यासह संपूर्ण राज्यात बहुतांश ठिकाणी पाऊस पडला. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भाच्या काही भागांत कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट, तर मराठवाड्याच्या काही भागांत लक्षणीय घट झाली. विदर्भाच्या उर्वरित भागांत किंचित घट झाली आहे.

तीन दिवस पावसाचे

२१ व २२ ऑक्टोबर रोजी कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, तर मराठवाड्यात काही ठिकाणी, विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़ २३ व २४ ऑक्टोबरला कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रात बºयाच ठिकाणी, मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे़

२१ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात गडगडाट व जोरदार वाºयासह पावसाची शक्यता आहे़ पुणे, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, चार जिल्ह्णात २१ ते २३ ऑक्टोबर दरम्यान जोरदार वाºयासह विजेच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे़ बीड, उस्मानाबाद जिल्ह्यात २१ ऑक्टोबरला तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होण्याची शक्यता आहे़

सोयाबीनला फटका

मराठवाड्यातील नांदेड, परभणी, लातूर,बीड जिल्ह्यात परतीच्या पावसाने जोरदार हजेरी लावली.काढणीला आलेल्या सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे़ नाशिक जिल्ह्यात द्राक्षाचे मोठे नुकसान केले आहे. जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात पावसाची रिपरिप सुरू होती. विदर्भात हलक्या सरी कोसळत होत्या.

राज्याच्या उर्वरित भागांत किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट झाली आहे. राज्याच्या उर्वरित भागांत कमाल तापमान सरासरीच्या जवळपास नोंदविण्यात आले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019MumbaiमुंबईVotingमतदानElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग