शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
5
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
6
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
7
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
8
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
9
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
10
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
11
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
12
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
13
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
14
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
15
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
16
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
17
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
18
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
19
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
20
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?

Maharashtra Election 2019 : भाजपा सरकारला छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नाही: शरद पवार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2019 16:30 IST

Maharashtra Election 2019 : महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली.

शिवरायांचा आदर्श ठेवून राज्य चालवण्याचा निर्णय यांनी घेतला. मात्र महाराजांचा इतिहास ज्याठिकाणी तयार झाला ते गडकिल्ले इथून पुढे पर्यटन केंद्र म्हणून जाहीर केले. तिथे हॉटेल, बार काढायला परवानगी देणार आणि तिथे छमछमची व्यवस्था करणार का? तसेच ज्या महाराजांची तलवार शौर्याने तेजाने चमकली त्याठिकाणी दारूचे अड्डे काढण्याचा निकाल या सरकारने घेतल्याने यांना छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचा अधिकार नसल्याचे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. 

महाराष्ट्र उद्योगात एक नंबरचं राज्य करण्यासाठी आम्ही कष्ट केले. कारखानदारी उभी केली, हजारो हातांना काम देण्याची काळजी घेतली. त्याचप्रमाणे धरणं बांधण्यासाठी पुढाकार घेत अनेक प्रागतिक निर्णय आम्ही घेतले. रोजगार हमी कायदा १९७८ साली एकमताने झाला तेव्हा राज्याचा मुख्यमंत्री मी होतो. देशात महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा पहिला निर्णय महाराष्ट्रात झाला तेव्हाही मीच मुख्यमंत्री असल्याचे शरद पवार यांनी स्पष्ट केले आहे. अकोल्यातील प्रचारसभेत शरद पवार बोलत होते.

राज्यात मंडल कमिशनच्या निर्णयावरून दंगली झाल्या. मात्र आम्ही महाराष्ट्राच्या जनतेला विश्वासात घेऊन हा निर्णय राबवला. बाबासाहेबांचे नाव विद्यापीठाला देण्यासाठी काहींचा विरोध असतानाही आम्ही विद्यापीठाला बाबासाहेबांचे नाव दिलं होतं. तुम्ही काय केलं? अरबी समुद्रात शिवस्मारक बांधण्याचं जाहीर केलं पण आजवर एका विटेचंही बांधकाम केलं नाही. इंदू मिलमध्ये डॉ. बाबासाहेबांचे आंतरराष्ट्रीय स्मारक उभं करण्याचं जाहीर केलं. पण घटनेच्या शिल्पकाराचं स्मारक तुम्हाला ५ वर्षांत उभारता आलं नाही आणि मला विचारतात तुम्ही काय केलं? असा प्रश्न देखील शरद पवारांनी उपस्थित केला. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019akole-acअकोलेNCPराष्ट्रवादी काँग्रेस