शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

Maharashtra Election 2019 : १०० हून अधिक साखर कारखानदार निवडणूक रिंगणात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2019 04:55 IST

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- पोपट पवारकोल्हापूर : ‘उसाशिवाय साखरेला अन् साखरेशिवाय राजकारणाला गोडवा येत नाही’ या म्हणीचा प्रत्यय सध्या राज्याच्या विधानसभा निवडणुकीच्या फडातच दिसून आला आहे. एक दोन नव्हे, तर तब्बल १०० हून अधिक साखर कारखानदार विधानसभेच्या रणांगणात आपले नशीब आजमावत असल्याने त्यांची ही राजकीय आखाड्यातील साखरपेरणी फळाला येणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारीतून राजकारण अन् राजकारणातून सत्ता हे वर्तुळ पूर्ण करण्यासाठी धडपडणाऱ्या साखर सम्राटांना सर्वच पक्षांनी पायघड्या अंथरल्याने सहकार चळवळीचा आत्मा ठरलेली साखर कारखानदारी राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा केंद्रबिंदू ठरू पाहत आहे.

यंदाच्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपकडून सर्वाधिक साखर कारखानदारांना उमेदवारी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे साखर कारखानदारांपासून काहीसे दूर असणाºया भाजपने यंदा २८ साखर कारखानदारांच्या गळ्यात उमेदवारीची माळ घातली आहे. तर स्थापनेपासूनच सहकारी तत्त्वाचा अजेंडा घेऊन वावरणाºया राष्ट्रवादी काँग्रेसने साखर कारखान्यांशी संबंधित असणाºया ३० जणांना उमेदवारी दिली आहे.

शिवसेनेकडून यंदा १५ साखर कारखानदार रिंगणात उतरले असून, काँग्रेसनेही १२ साखर कारखानदारांना उमेदवारी देऊन मैदानात उतरवले आहे. दुसरीकडे कोणत्याच पक्षाकडून उमेदवारी न मिळाल्याने जवळजवळ ११ साखर सम्राटांना अपक्ष म्हणून रिंगणात उडी घ्यावी लागली आहे. दरम्यान राहुरी, कागल, माजलगाव, कोपरगाव, करमाळा, पंढरपूर, वाई, पाटण, करवीर, इस्लामपूर यांसह ११ विधानसभा मतदारसंघात साखर कारखानदारांमध्येच थेट लढत होत असल्याने या मतदारसंघाकडेही संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.पश्चिम महाराष्ट्रात सर्वाधिक ५४ जणकृष्णा, भीमा, कोयना, वारणा, पंचगंगा या नद्यांच्या मुबलक पाण्याने सुबत्ता आलेल्या पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखानदारीची मुळे राजकारणाशी घट्ट जोडली गेली आहेत. परिणामी, साखर कारखानदारांना वगळून राजकीय मैदान मारणे कोणत्याच पक्षाला परवडणारे नाही. त्यामुळे यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही साखर कारखानदारीशी संबंधित पश्चिम महाराष्ट्रातील तब्बल ५४ उमेदवार विधानसभा निवडणुकीचा फड गाजवित आहेत.मराठवाड्यातही 22 जणांना उमेदवारीपाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या मराठवाड्यातल्या काही भागातही साखर कारखान्यांभोवतीच राजकारण केंद्रित झाले आहे. त्यामुळे तेथील आठ जिल्ह्यांतील २२ साखर कारखानदार निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत.प्रमुख उमेदवार आणि त्यांचे साखर कारखाने- पंकजा मुंडे :वैजनाथ सहकारी,परळी (भाजप)- अशोक चव्हाण : भाऊराव चव्हाण कारखाना, नांदेड (काँग्रेस)- राधाकृष्ण विखे : विठ्ठलराव विखे-पाटील कारखाना, प्रवरानगर(भाजप)- बाळासाहेब थोरात :भाऊसाहेब थोरात कारखाना, संगमनेर (काँग्रेस)- अजित पवार : सोमेश्वर सहकारी साखर कारखाना, बारामती (राष्ट्रवादी)- हसन मुश्रीफ : संताजी घोरपडे कारखाना, कागल (राष्ट्रवादी)- अमित देशमुख : विकास सहकारी, लातूर (काँग्रेस)- सुधाकरपंत परिचारक :पांडुरंग कारखाना, श्रीपूर (भाजप)- अतुल भोसले : यशवंतराव मोहिते कारखाना, कºहाड (भाजप)- विश्वजित कदम :सोनहिरा कारखाना,पलूस-कडेगाव (काँग्रेस)- शंभूराज देसाई : बाळासाहेब देसाई सहकारी साखरकारखाना, पाटण (शिवसेना)- सुभाष देशमुख : लोकमंगल साखर कारखाना, सोलापूर (भाजप)- संदिपान भुमरे : संतएकनाथ सहकारी कारखाना, पैठण (शिवसेना)

टॅग्स :Sugar factoryसाखर कारखानेMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019