शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवसाचे दिग्दर्शक झालात तर...; अक्षय कुमारच्या प्रश्नावर CM फडणवीसांचं दमदार उत्तर, टाळ्यांचा कडकडाट
2
जशास तसे उत्तर! जरांगेंचा एल्गार, १९९४ च्या ओबीसी आरक्षणाविरोधात याचिका दाखल करणार
3
योगी बुलडोजर चालवत आहेत तर...? बूट फेकण्याचा प्रयत्न करणाऱ्या वकील राकेश किशोर यांचा CJI बीआर गवईंना थेट सवाल
4
कर्ज फेडण्यासाठी अदानी घेणार २,२०० कोटींचं लोन; जगातील ४ मोठ्या बँका करणार मदत, शेअर्समध्ये तेजी
5
मोठी चूक! 'डेलॉइट' कंपनीला AI मुळे कोट्यवधींचा फटका; चुकीच्या रिपोर्टसाठी ऑस्ट्रेलियन सरकारला परत करावे लागणार पैसे
6
बिहारमध्ये भाजपाच्या अडचणी वाढणार, चिराग पासवान-प्रशांत किशोर यांना टाळी देण्याच्या तयारीत?
7
"मला निवडणूक लढवण्याची इच्छा"; मैथिली ठाकूरने सांगितली दोन मतदारसंघांची नावे
8
जखमींना हॉस्पिटलला पोहचवा, २५ हजार ते १ लाख मिळवा; योगी सरकारनं आणली जबरदस्त योजना
9
VIRAL : तो नवरा आहे गं, महिषासुर नाही... करवा चौथची पूजा करण्यासाठी महिलेनं काय केलं, Video बघाच!
10
"आम्हाला दोघांनाही एकमेकांशी लग्न करायचं नव्हतं...", रेणुका शहाणेंचा मोठा खुलासा, म्हणाल्या...
11
'या' एका निर्णयाने फिरलं वातावरण! ग्राहक जोडणीत BSNL ने Airtel ला टाकले मागे; जिओची काय स्थिती?
12
Cough Syrup : "पप्पा, घरी जाऊया...", कफ सिरपमुळे मुलीने गमावला जीव; १६ डायलिसिस, २२ दिवस मृत्यूशी झुंज
13
कतरिना कैफचं झालं बेबी शॉवर, 'या' फोटोमुळे मिळाली हिंट; ४२ व्या वर्षी देणार बाळाला जन्म
14
धक्कादायक! विरारमध्ये दोन विद्यार्थ्यांची १२ व्या मजल्यावरून उडी; दोघांचाही मृत्यू
15
“गेम करण्याएवढी ताकद नाही, आम्ही भांडी घासायला बसलोय का”; ओबीसी नेत्यांचे जरांगेंना उत्तर
16
Australia Squad Against India : टीम इंडियाच्या २ कॅप्टनसमोर ऑस्ट्रेलियाकडून मार्श दाखवणार ताकद
17
म्हणे, कसलाही पश्चात्ताप नाही... दैवी शक्तीनं सांगितलं!; सरन्यायाधीश हल्ला प्रकरणात 'त्या' वकिलाचं विधान
18
VIDEO: रस्त्याखाली काम, रस्त्यावर 'जॅम'! मेट्रो सुरू झाली, पण कार अजूनही ट्रॅफिकमध्येच; वरळी नाक्याजवळची कोंडी कधी फुटणार?
19
Video - राईड संपल्यानंतर 'ती' रॅपिडोवाल्याशी भिडली, पैसे मागताच डोळ्यात फेकली मिरची फूड
20
१५ राण्या, ३० मुलं अन् १०० नोकरांसह दुबईला पोहोचला 'या' देशाचा राजा; शेख पाहत राहिले...

Maharashtra Election 2019: कल्याण डोंबिवलीसाठीचं साडेसहा हजार कोटींचं पॅकेज गेलं कुठे?; राज ठाकरेंचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2019 21:51 IST

विविध मुद्द्यांवरुन भाजपा, शिवसेना सरकारचा समाचार

कल्याण: महापालिका निवडणुकीवेळी मुख्यमंत्री कल्याण डोंबिवलीला साडेसहा हजार कोटींचं पॅकेज देऊ म्हणाले होते. त्या पॅकेजचं पुढे काय झालं? ते पैसे गेले कुठे? असे प्रश्न मनसे प्रमुख राज ठाकरेंनी कल्याणमधील सभेत उपस्थित केले. मुख्यमंत्र्यांच्या घोषणा म्हणजे धापाच असल्याचा टोला त्यांनी लगावला. यावेळी राज यांनी आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, शिवस्मारक या मुद्द्यांवरुन सरकारवर जोरदार टीका केली. अरबी समुद्रात शिवरायांचं स्मारक उभारण्याची टूम काँग्रेस, राष्ट्रवादीच्या सरकारनं काढली होती. यानंतर राज्यात भाजपा, शिवसेनेचं सरकार आलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री, उद्धव ठाकरे समुद्रात गेले. त्यांनी पाण्यात काहीतरी टाकलं आणि म्हणाले स्मारक इथे होणार. त्या स्मारकाचं पुढे काय झालं? ज्या ठिकाणी जलपूजन झालं, ती जागा आता मोदी, फडणवीस आणि उद्धव यांच्यातला एक जण तरी दाखवू शकतो का, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा चीनवरुन मागवला. मग आता महाराजांच्या स्मारकासाठी शिल्पकारदेखील चीनमधूनच मागवणार का, अशा प्रश्न राज यांनी विचारला. कलम ३७० चा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपा अध्यक्ष अमित शहांनादेथील राज यांनी लक्ष्य केलं. कलम ३७० रद्द केल्याबद्दल अभिनंदन. आता काश्मीरमधील परिस्थिती सुधारा, असं राज म्हणाले. पण काश्मीरमधून रद्द केलेल्या कलम ३७० चा महाराष्ट्रातील निवडणुकीशी संबंध काय, असा सवाल राज यांनी उपस्थित केला. गेल्या पाच वर्षांत १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पण शहा त्याबद्दल चकार शब्द काढत नाहीत. शहा ज्यावेळी कलम ३७० वर बोलत होते, त्याचवेळी त्याच भागात एका शेतकऱ्यानं गळफास लावून आत्महत्या केली. पण मुख्य विषयांवरुन लोकांचं लक्ष विचलित करायचं काम भाजपाकडून सुरू आहे. त्यासाठीच कलम ३७० चा मुद्दा उपस्थित केला जात असल्याचं राज ठाकरे म्हणाले.  

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरेMNSमनसेNarendra Modiनरेंद्र मोदीDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे