शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
5
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
6
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
7
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
8
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
9
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
10
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
11
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
12
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
13
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
14
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
15
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
16
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
17
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
18
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
19
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
20
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: जर कुणीच मागे हटायला नाही तयार; मग कसं बनणार महायुतीचं सरकार?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2019 08:03 IST

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे.

मुंबई - महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता स्थापनेचा संघर्ष अद्यापही सुरुच आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या दरम्यान सत्ता वाटपाचा तिढा सुटण्याचं चिन्ह नाही. मंगळवारी भाजपाने सत्ता स्थापनेचा चेंडू शिवसेनेच्या कोर्टात ढकलला आहे. अद्याप शिवसेनेकडून कोणताही प्रस्ताव मिळाला नाही. भाजपाचे दार २४ तास चर्चेसाठी खुलं आहे अशी प्रतिक्रिया भाजपा नेत्यांनी दिली आहे. तर मुख्यमंत्रीपदावर अडून असलेली शिवसेना जे ठरलंय ते द्या यावर ठाम असल्याचं दिसून आलं. 

महाराष्ट्र विधानसभेचा कार्यकाळ ९ नोव्हेंबरला संपुष्टात येणार आहे. सत्ता स्थापनेच्या तिढ्याबाबत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आमच्यासाठी चर्चेचे दरवाजे खुले आहेत. आम्ही कधीही चर्चेसाठी नकार दिला नाही. शिवसेनेकडूनच चर्चा बंद करण्यात आली आहे. सत्तास्थापनेच्या तिढ्यात दोन्ही पक्ष मुख्यमंत्रीपदावर ठाम आहेत. भाजपाच्या एका मंत्र्याने सांगितले की, मुख्यमंत्रीपदावर कोणतीही चर्चा होणार नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालीच राज्यात सरकार स्थापन होईल. देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील असं सांगितले आहे. 

तसेच भाजपाकडून प्लॅन बीदेखील तयार करण्यात येत आहे. विधानसभेत भाजपाचे १०५ आमदार निवडून आले आहेत तर काही अपक्षांनी भाजपाला पाठिंबा दिल्याने ही संख्या ११८ पर्यंत पोहचली आहे. जर शिवसेनासोबत आली नाही तरी भाजपा बहुमत सिद्ध करु शकते असा दावा भाजपाच्या एका मंत्र्याने केला आहे. तसेच शिवसेना आघाडीच्या पाठिंब्याने सरकार बनवेल हा अंदाज या ज्येष्ठ मंत्र्याने फेटाळून लावला आहे. 

भाजपाच्या या मंत्र्याने सांगितले की, आमच्या माहितीनुसार जर शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने सरकार बनवू पाहत असेल तर सभागृहात ते बहुमत सिद्ध करु शकणार नाही कारण त्यांना काँग्रेसची मदत मिळणार नाही. त्यामुळे शिवसेना आघाडीच्या मदतीने सरकार स्थापन करणार नाही असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, भाजप-शिवसेनेतील तणाव दूर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. भाजपवर सडकून टीका करणारे खा.संजय राऊत यांचा सूर नरमाईचा दिसला. मुख्यमंत्रिपदासाठी शिवसेना आग्रही असल्याचे ते पुन्हा म्हणाले. पण त्यात भाजप नेतृत्वाला टार्गेट करण्याचा सूर नव्हता. भाजप नेतृत्वाला लक्ष्य करताना राऊत पथ्य पाळताना दिसतील, असा दावा भाजपच्या ज्येष्ठ नेत्याने बोलताना केला. भाजपला पाच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्याचे मान्य केल्यास प्रसिद्धी माध्यमांसमोर काय सांगायचे, असा पेच शिवसेनेसमोर आहे. मात्र, त्याला तात्विक भूमिकेचा मुलामा देऊन भूमिकेचे समर्थन केले जाण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाChief Ministerमुख्यमंत्री