शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2019 14:13 IST

मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या एक्झिट पोलमध्ये शिवसेना-भाजपा महायुतीला २०० च्या वर जागा मिळणार असा अंदाज आहे. मात्र शिवसेना-भाजपा यांना राज्यात बंडखोरीचा सामना करावा लागला. बंडखोरी नसती तर राज्यात महायुतीच्या ४-५ जागा वाढल्या असत्या असा दावा भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. 

याबाबत बोलताना एकनाथ खडसे म्हणाले की, महायुतीला २०० च्या वर जागा मिळतील असं भाजपाने याआधीच सांगितले होते. एक्झिट पोलचे आकडेही तसे सांगत आहे. राज्यात महायुतीची सत्ता येणार हे स्पष्ट आहे. मात्र काही ठिकाणी राज्यात बंडखोरीचा फटका बसला नसता तर आणखी जागांमध्ये वाढ झाली असती असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. 

तसेच मुक्ताई नगर शिवसेनेचे बंडखोर उभे राहिले मात्र त्यांच्यावर कारवाई झाली नाही. याठिकाणी बंडखोर उभे आहे त्याचे पडसाद अन्य ठिकाणी उमटले असणार, बंडखोरांवर कारवाई होणं गरजेचे होते. अन्य ठिकाणी शिवसेनेने बंडखोरांवर कारवाई केली आहे. मात्र मुक्ताई नगरमध्ये कारवाई करण्यात आली नाही. तरीही रोहिणी खडसे १५ हजार मताधिक्याने निवडून येणार असल्याचं एकनाथ खडसेंनी सांगितले. 

राज्यातील विविध चॅनेल्सने दाखविलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपाला १२०-१४० जागा तर शिवसेनेला ८०-१०० जागा मिळतील असं सांगण्यात आलं आहे. तर विरोधकांना अवघ्या ४०-६० जागा जिंकता येतील असं सांगितले आहे. राज्यातील वातावरण महायुतीच्या बाजूने असल्याचं कल एक्झिट पोलमध्ये दिला आहे. मात्र प्रत्यक्ष निकालात काय होतं यासाठी २४ तारखेची वाट पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, विधानसभा निवडणुकीत भाजपाने १६४ तर शिवसेनेने १२४ जागा लढविल्या आहेत. तर कणकवली, माण या मतदारसंघात शिवसेना-भाजपा एकमेकांसमोर निवडणुका लढवित आहे. त्यामुळे या दोन जागा कोणत्या पक्षाला मिळणार हे पाहणे गरजेचे आहे. महायुतीत शिवसेना किती जागा मिळविणार यावर राज्याचं पुढील राजकारण अवलंबून आहे. आमचं ठरलंय असं म्हणत समसमान फॉर्म्युल्यावर शिवसेना निवडणुकीपूर्वी ठाम होती. मात्र काही तडजोडी करुन पुन्हा युतीत निवडणूक लढविली. राज्यात शिवसेनेचा मुख्यमत्री बसविणार असं उद्धव ठाकरेंनी सांगितले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणच्या बंडखोरांवर शिवसेनेने जाणीवपूर्वक कारवाई केली नाही का? असा प्रश्न उपस्थित होतो. 

महत्वाच्या बातम्या 

भाजपाला शिवसेनेशिवाय राज्य करता येणार नाही; संजय राऊतांचा दावा 

'प्रत्यक्ष निकालात राष्ट्रवादी पहिल्या अथवा दुसऱ्या क्रमांकावर असणार'

मोदी सरकार शेतकऱ्यांना देणार 'दिवाळी गिफ्ट'? आज होणार निर्णय

काँग्रेसचा भाजपाला सूचक इशारा?; प्रवक्ते म्हणतात, 'आदित्य ठाकरेही मुख्यमंत्री होऊ शकतात'

उदयनराजेंना आणखी प्रतिक्षा करावी लागणार; साताऱ्याचा निकाल विलंबाने लागणार

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाEknath Khadaseएकनाथ खडसे