शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

महाराष्ट्र निवडणूक 2019: आधी आमचं ठरू दे, मग शिवसेनेबाबत विचार करू; अहमद पटेल यांचं सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 20:02 IST

गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या.

मुंबई :  भाजपा, शिवसेनेसह राष्ट्रवादीही सरकार स्थापनेस असमर्थ ठरल्याने राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. गेल्या दोन दिवसांपासून आघाडीच्या मॅरेथॉन बैठका सुरु होत्या. आज अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेत भुमिका मांडली. राज्यपालांनी आपल्याला निमंत्रण न दिल्याची खंत काँग्रेसने व्यक्त केली. 

विधानसभा निवडणुकीनंतर कुठलाही पक्ष सरकार स्थापन करू शकत नसल्यानं महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करावी, या राज्यपालांच्या शिफारशीनंतर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत या शिफारशीवर शिक्कामोर्तब केलं होतं. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी या आदेशावर स्वाक्षरी केली आहे. 

काँग्रेसचे नेते अहमद पटेल यांनी शिवसेनेला पाठिंबा देण्यावर आधी आमचे ठरूद्या नंतर शिवसेनेचा विचार केला जाईल असे सांगितले. तसेच काँग्रेसचे आमदार जयपूरला ठेवणार का या प्रश्नावर त्यांनी बरेचशे आमदार राज्यात परतले असल्याचे सांगताना त्यांना हॉटेलवर ठेवणार नसल्याचे म्हटले आहे. 

राज्यपालांनी सत्तास्थापनेसाठी भाजपाला, शिवसेनेला बोलावले. त्यांनतर राष्ट्रवादीला बोलावले पण काँग्रेसला बोलावले नाही, असेही  पटेल म्हणाले. 

तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिल्याचा टोला लगावला. तसेच आमच्या सवडीने निर्णय घेऊ आणि नंतर शिवसेनेसोबत बोलू असे सांगितले आहे. 

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019Shiv SenaशिवसेनाBJPभाजपा