शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
2
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
3
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
4
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
5
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
6
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
7
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
8
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
9
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
10
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
11
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
12
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
13
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
14
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
16
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
17
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या
18
वडील विनोद खन्ना यांच्यासोबत काम का करायचं नव्हतं? 'छावा' फेम अक्षय खन्नाने सांगितलेलं हैराण करणारं कारण
19
Airtel नं लाँच केला जबरदस्त प्लान; हाय स्पीड डेटासह मिळणार 'इतके' फायदे, जाणून घ्या
20
बदलापूर रेल्वे स्थानकातून येऊ शकते चेंगराचेंगरीची बातमी; 'हा' व्हिडीओ बघून काळजात होईल धस्स!

सत्तास्थापनेसाठी दिल्लीत खलबतं; शिवसेनेला पाठिंब्यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2019 09:35 IST

तर्तास शिवसेनेला जर पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं विधान राष्ट्रवादीने केलं होतं.

मुंबई - राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजपाने असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेची सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यात मुख्यमंत्रिपद बसविणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. 

काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितले की, राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत काँग्रेसची सकाळी १० वाजता बैठक आहे. पक्षाचे हायकमांड ठरवतील तो निर्णय घेणार पण आम्हाला जनतेने विरोधी पक्षात बसण्याचा कौल दिला आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आम्ही विरोधी पक्षात आहोत असं खर्गे यांनी सांगितले. 

दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत आज दिल्लीला जाणार आहेत. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्यासाठी शिवसेना कसरत करत होणार आहे. सत्तास्थापनेसाठी आज दिल्लीपासून मुंबईत अनेक महत्वपूर्ण बैठकी होत आहे. शिवसेना आमदारांची बैठक सकाळी ९.३० च्या सुमारास द रिट्रिट हॉटेलमध्ये होणार आहे. या बैठकीत शिवसेना आमदारांकडून समर्थन पत्रावर सह्या घेणार येणार असल्याची माहिती आहे. तर राज्यात घडणाऱ्या वेगवान घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठकही बोलविण्यात आली आहे. या बैठकीत काँग्रेसची भूमिका काय असेल त्याची वाट पाहणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 

तर्तास शिवसेनेला जर पाठिंबा हवा असेल तर शिवसेनेने केंद्रातील सत्तेतून बाहेर पडलं पाहिजे असं विधान राष्ट्रवादीने केलं होतं. त्यामुळे केंद्रीय मंत्री अरविंद सावंत त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देत आहे यामुळे शिवसेना एनडीएतून बाहेर पडणार यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत अरविंद सावंत म्हणाले की, लोकसभा निवडणुकी आधी जागा वाटप आणि सत्ता वाटपाचा एक फॉर्म्युला ठरला होता. दोघांना तो मान्य होता.आता हा फॉर्म्युला नाकारून शिवसेनेला खोटे ठरवण्याचा प्रकार धक्कादायक तसेच महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कलंक लावणारा आहे. खोटेपणाचा कळस करत महाराष्ट्रात भाजपाने फारकत घेतलीच आहे. शिवसेनेची बाजू सत्याची आहे. अशा खोट्या वातावरणात दिल्लीतील सरकार मध्ये तरी का रहायचे? असा सवाल त्यांनी केला आहे.  

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसBJPभाजपा