शहरं
Join us  
Trending Stories
1
8th Pay Commission: सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! 8 व्या वेतन आयोगाला केंद्राची मंजुरी; वाढीव पगार कधीपासून मिळणार?
2
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणीचा पोस्टमार्टेम रिपोर्ट आला, मृत्यू नेमका कशामुळे?
3
Video: ७ महिन्याच्या गर्भवतीनं उचललं तब्बल १४५ किलो वजन; कसा अन् कुणी केला हा पराक्रम?
4
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
5
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? एसबीआय करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
6
अस्थिर बाजारात 'सुझलॉन'ची मोठी झेप! तिमाही निकालापूर्वीच भाव वाढला; दुसऱ्यांदा मल्टीबॅगर ठरणार?
7
'मासिक पाळी आलीय, ब्रेक पाहिजे', सुपरवायझर म्हणाला, 'कपडे काढा'; हरयाणा विद्यापीठातील धक्कादायक प्रकार
8
‘त्यांनी आपल्या २ मुली पळवल्या तर तुम्ही त्यांच्या १० जणीं घेऊन या’, भाजपा नेत्याचं वादग्रस्त विधान  
9
अर्जुन तेंडुलकर चमकला; पण 'या' गोलंदाजाने दिला त्रास! रन काढू दिलीच नाही, विकेटही घेतली...
10
महागडे मोबाइल अन् मोठे टीव्हीच हवेत; या दिवाळीत 'प्रीमियम' खरेदीचा नवा पॅटर्न समोर
11
कोण आहे रंजना प्रकाश देसाई?; ज्यांना ८ व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षपदाची मिळाली जबाबदारी
12
रणबीरच्या 'रामायण'मध्ये विवेक ओबेरॉयचीही भूमिका, अभिनेत्याने दान केलं मानधन; म्हणाला...
13
बाजारात मोठी अस्थिरता! सेंसेक्स-निफ्टी सपाट पातळीवर बंद; महिंद्रा-बजाजसह 'हे' शेअर्स आपटले
14
प्रणित मोरे ऐकत नाय! क्रिकेटपटूच्या बहिणीसोबत वाढतेय जवळीक? 'बिग बॉस'च्या घरातील व्हिडीओ पाहून चाहतेही अवाक्
15
आज पुन्हा सोन्याचे दर घसरले, २००० रुपयांनी झालं स्वस्त; चांदीची चमकही झाली कमी, काय आहेत नवे रेट
16
“आदित्य ठाकरेंनी महाराष्ट्राचा पप्पू आहे असे प्रदर्शन करू नये”; CM फडणवीसांचा खोचक टोला
17
Mohammed Shami: रणजीमध्ये शमीचा 'सुपरहिट' शो! दोन सामन्यांत १५ विकेट्स, पुनरागमनाचे संकेत
18
नशीब, बंपर, छप्परफाड...! भारतीयाला रातोरात लागली २४० कोटींची लॉटरी; युएईला कामगार म्हणून गेलेला...
19
पगार वाढला, पण बँक बॅलन्स नाही? 'या' एका सवयीमुळे तुमची बचत थांबते; तज्ज्ञांचा मोठा इशारा
20
एका वाघाची लव्ह स्टोरी! वाघिणीच्या शोधात जंगल सोडलं, अन्...; वन विभागाचे कर्मचारी हैराण

महाराष्ट्र निवडणूक 2019: ‘तेव्हा भाजपानं लाज भाजून खाल्ली होती की तळून?’

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 22:11 IST

नैतिकतेचा मुद्दा उपस्थित करणाऱ्या भाजपाला काँग्रेसचा सवाल

मुंबई: विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होऊन जवळपास तीन आठवडे होत आले आहेत. मात्र अद्यापही राज्यात सत्ता स्थापन न झाल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. राज्यातील जनतेनं महायुतीला स्पष्ट कौल दिला होता. मात्र यानंतर महायुतीमधील दोन मोठे पक्ष असलेल्या शिवसेना, भाजपामध्ये सत्तापदांच्या वाटपांवरुन निर्माण झालेला संघर्ष टोकाला गेला. अखेर कोणत्याही पक्षानं राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा न केल्यानं राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे. शिवसेनेनं अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपद देण्यात यावं अशी मागणी केल्यानं महायुतीमधील दरी रुंदावली. शिवसेना भाजपापासून दूर गेल्यानं सत्ता स्थापनेचा पेच निर्माण झाला. यानंतर भाजपानं सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ नसल्यानं सरकार स्थापनेचा दावा करणार नसल्याचं जाहीर केलं. ही घोषणा करताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नैतिकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरुन काँग्रेसनं भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे.  भाजपाला आजच नैतिकता आठवली का, असा प्रश्न काँग्रेस नेते भाई जगताप यांनी उपस्थित केला आहे. जगताप यांनी एक ट्विट करत भाजपानं याआधी अनेक राज्यांमध्ये कमी जागा जिंकूनही सत्ता स्थापन केली होती, याची आठवण करुन दिली आहे. ‘गोव्यात काँग्रेसला १७, भाजपाला १३, मणिपूरमध्ये काँग्रेसला २८, भाजपाला २१, बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलाला ८०, संयुक्त जनता दलाला ७१, भाजपाला ५३, मेघालयात काँग्रेसला २१, एनपीपी १९, भाजपाला २ जागा मिळाल्या होत्या. मात्र या सगळ्या राज्यांमध्ये भाजपानं सत्ता स्थापन केली. त्यावेळी भाजपानं नैतिकता गुंडाळून ठेवली होती का? जम्मू काश्मीरमध्ये मेहबूबा मुफ्तीबरोबर युती करताना लाज भाजून खाल्ली होती की तळून?,’ असे प्रश्न जगताप यांनी विचारले आहेत.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाcongressकाँग्रेस