शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:36 IST

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे,

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. केंद्रातील भाजप सरकार अडवणुकीची भूमिका घेत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. सरकार बनवण्याचे कोणतेही पर्याय न शोधता राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेणे हा कुटील डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही? कशा पद्धतीने पुढे जायचे? यावर आमचे नेते चर्चा करीत आहेत.यासाठी किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आधी काँग्रेसच्या नेत्यांची आपसात चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. चर्चेअंती आम्ही कोणत्यातरी निष्कर्षाप्रत येऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.मंगळवारी मुंबईत अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय चर्चा झाल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.>समान मुद्द्यांवर अगोदर चर्चागेल्या कित्येक वर्षांनंतर माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. पहिलीच भेट असल्यामुळे फार काही व्यापक चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीतून तूर्त कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे त्यांंनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी एकच जाहीरनामा होता, पण शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता. दोघांच्याही जाहीरमान्यातील समान मुद्दे कोणते असतील यावर आधी आमची चर्चा होईल. त्यानुसार समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर पुढील बोलणी होऊ शकते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे