शहरं
Join us  
Trending Stories
1
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
2
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
3
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
4
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
5
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
6
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”
7
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
8
Donald Trump Tariff Russian Oil: "आता कोणताही सेकंडरी टॅरिफ नाही, २-३ आठवड्यानंतर विचार करू," अतिरिक्त शुल्कावरुन भारताला दिलासा मिळणार?
9
विराट-रोहित नव्हे MI कॅप्टन हार्दिक पांड्यामुळं IPL कॉमेंट्री पॅनलमधून 'गायब' झाला इरफान पठाण
10
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
11
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
12
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
13
"लग्न टिकलं असतं तर मला आवडलं असतं...", अरबाज खानसोबतच्या घटस्फोटावर इतक्या वर्षांनी मलायकाचं भाष्य
14
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
15
Gopal Kala 2025: कलियुगात टिकून राहायचे असेल तर कृष्णाच्या 'या' पाच गोष्टी आजपासून फॉलो करा!
16
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
17
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
18
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
19
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
20
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:36 IST

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे,

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. केंद्रातील भाजप सरकार अडवणुकीची भूमिका घेत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. सरकार बनवण्याचे कोणतेही पर्याय न शोधता राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेणे हा कुटील डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही? कशा पद्धतीने पुढे जायचे? यावर आमचे नेते चर्चा करीत आहेत.यासाठी किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आधी काँग्रेसच्या नेत्यांची आपसात चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. चर्चेअंती आम्ही कोणत्यातरी निष्कर्षाप्रत येऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.मंगळवारी मुंबईत अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय चर्चा झाल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.>समान मुद्द्यांवर अगोदर चर्चागेल्या कित्येक वर्षांनंतर माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. पहिलीच भेट असल्यामुळे फार काही व्यापक चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीतून तूर्त कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे त्यांंनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी एकच जाहीरनामा होता, पण शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता. दोघांच्याही जाहीरमान्यातील समान मुद्दे कोणते असतील यावर आधी आमची चर्चा होईल. त्यानुसार समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर पुढील बोलणी होऊ शकते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे