शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी दुर्घटना! गेरुआ नदीत गावकऱ्यांना घेऊन जाणारी बोट उलटली; १३ जणांना वाचवलं, ८ बेपत्ता
2
Cyclone Montha : मोंथाचा विध्वंस! २.१४ लाख एकर पिकं उद्ध्वस्त, १८ लाख लोकांना फटका, रेल्वे स्टेशन पाण्याखाली
3
भयंकर! हिट अँड रननंतर कारने बाईकस्वाराला १.५ किमी फरफटतं नेलं; धडकी भरवणारा Video
4
आजचे राशीभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५: सरकारी मदत, आर्थिक लाभ; जुने मित्र भेटतील, आनंदी दिवस
5
'साईबाबा' फेम अभिनेते सुधीर दळवींना मदत केल्याने रणबीर कपूरची बहीण झाली ट्रोल, नेमकं काय घडलं?
6
"खरं सांगायचं तर..."; फिल्मफेअर पुरस्कार विकत घेतल्याच्या आरोपांवर अभिषेक बच्चन स्पष्टच म्हणाला
7
पती झाला हैवान! लेकासमोरच पत्नीची निर्घृण हत्या, डोळ्यांना, चेहऱ्याला...; अपघाताचा रचला बनाव
8
आता ब्लू इकॉनॉमीकडे झेप, तब्बल १२ लाख कोटींचे करार; शिवछत्रपतींच्या विचारांनी भारत प्रगतीपथावर
9
राज ठाकरेही मेळाव्यात फोडणार मतचोरीचा बॉम्ब? बोगस नावे, मतचोरी, EVM घोटाळ्यांवर सादरीकरण
10
वेतन वाढेल, जबाबदारी? आठव्या वेतन आयोगाने सरकारवरील बोजा २० ते २५ हजार कोटींनी वाढणार
11
मुंबई पालिकेची निवडणूक जानेवारीच होणार? आरक्षण सोडत ११ नोव्हेंबरला, आयोगाकडून सूचना प्रसिद्ध
12
५ नोव्हेंबरपर्यंत पाऊसधारांचा अंदाज; कमी दाबाचा पट्टा ओमानकडे जाण्याऐवजी किनारपट्ट्यांवर रेंगाळला
13
सावध व्हा, ‘कॉल मर्जिंग स्कॅम’ धाेका ! नव्या पद्धतीने केवळ काही अवधीत लाखो रुपयांवर डल्ला
14
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
15
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
16
काँग्रेसमध्ये महापालिकेसाठी इच्छुकांची गर्दी; आले ४५० अर्ज, इच्छुकांकडून ५०० रुपये शुल्क
17
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
18
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
19
सेंट जॉर्जेस रुग्णालयातील मृत्यूदर का वाढला? दाखल रुग्णांपैकी २४ ते २५ टक्के जण दगावतात
20
अर्बन कंपनी सर्च केले आणि ऑनलाइन मेड मागविली; महिलेचे खातेच झाले रिकामे

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2019 05:36 IST

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे,

अतुल कुलकर्णी मुंबई : राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ‘लोकमत’शी बोलताना केला. केंद्रातील भाजप सरकार अडवणुकीची भूमिका घेत आहे. म्हणूनच महाराष्ट्रात जाणीवपूर्वक राष्ट्रपती राजवट लागू केली आहे. सरकार बनवण्याचे कोणतेही पर्याय न शोधता राष्ट्रपती राजवट लागू करण्यामागे राज्यात पुन्हा विधानसभा निवडणुका घेणे हा कुटील डाव असल्याचा आरोप चव्हाण यांनी केला. जनतेने आम्हाला विरोधात बसण्याचा कौल दिला होता, पण बदलत्या राजकीय परिस्थितीत भाजप आणि शिवसेना एकत्र जाऊ शकत नाहीत. हे लक्षात आल्यानंतर शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी आम्हाला सत्तेत सहभागी होण्यासाठी अधिकृत प्रस्ताव दिला आहे. त्यामुळे सत्तेत जायचे की नाही? कशा पद्धतीने पुढे जायचे? यावर आमचे नेते चर्चा करीत आहेत.यासाठी किमान समान कार्यक्रम आणि सत्तेतील सहभाग या मुद्द्यांवर आधी काँग्रेसच्या नेत्यांची आपसात चर्चा होईल. त्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्ही पक्षांच्या नेत्यांशी चर्चा होईल. चर्चेअंती आम्ही कोणत्यातरी निष्कर्षाप्रत येऊ, असेही चव्हाण यांनी सांगितले.मंगळवारी मुंबईत अहमद पटेल, के. सी. वेणुगोपाल, मल्लिकार्जुन खरगे आणि शरद पवार यांची संयुक्त बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेला पाठिंबा देण्यासाठी तत्त्वत: मान्यता दिली. मात्र सरकारमध्ये सहभागी व्हायचे की नाही याचा निर्णय चर्चा झाल्याशिवाय आम्ही घेऊ शकत नाही, असेही अशोक चव्हाण यांनी या वेळी सांगितले.>समान मुद्द्यांवर अगोदर चर्चागेल्या कित्येक वर्षांनंतर माणिकराव ठाकरे, प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या समवेत मी उद्धव ठाकरे यांना भेटलो. पहिलीच भेट असल्यामुळे फार काही व्यापक चर्चा झाली नाही. त्यामुळे या भेटीतून तूर्त कुठलाही निष्कर्ष काढता येणार नसल्याचे त्यांंनी सांगितले.काँग्रेस-राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांना निवडणुकीसाठी एकच जाहीरनामा होता, पण शिवसेनेचा जाहीरनामा वेगळा होता. दोघांच्याही जाहीरमान्यातील समान मुद्दे कोणते असतील यावर आधी आमची चर्चा होईल. त्यानुसार समान कार्यक्रमावर तिन्ही पक्षांचे एकमत झाल्यानंतर पुढील बोलणी होऊ शकते, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे