शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं टम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
5
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
6
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
7
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
8
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
9
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
10
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
11
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
12
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
13
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
14
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
15
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
16
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
17
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला
18
मुंबईत इमारतीचा भाग कोसळला, तिघे जखमी; मुसळधार पावसात बचावकार्य सुरु
19
दहीहंडीच्या दिवशी वाहतूक पोलिसांनी फोडली कोट्यवधीच्या ‘दंडाची हंडी’; मुंबईत नियमांचे उल्लंघन
20
आपल्या आई, बहिणीचे मतदानावेळचे CCTV फुटेज द्यावे का? राहुल गांधींच्या मागणीवर आयोगाचा सवाल

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजपा-शिवसेनेत अजूनही फोनाफोनी सुरूच?; उद्धव ठाकरेंनी सांगितले हळूच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 21:13 IST

शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी 48 तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी थेट सहा महिन्यांचीच मुदत दिली, असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला.

मुंबई : काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पत्रकार परिषदेनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेत राज्यपालांच्या भुमिकेवर टीका केली. यावेळी त्यांनी भाजपाचा मोठा आरोपही खोडून काढला. काँग्रेस राष्ट्रवादीशी कधी संपर्क केल्याचे त्यांनीच सांगितले यामुळे भाजपाचा आरोप खोटा असल्याचे ठाकरे म्हणाले. 

शिवसेनेने सत्तास्थापनेसाठी 48 तासांची मुदत मागितली होती. मात्र राज्यपालांनी थेट सहा महिन्यांचीच मुदत दिली. त्यामुळे महाराष्ट्राला एवढा दयावान माणूस लाभला तर राज्याचं भलं होईल असं म्हणत उद्धव ठाकरेंनी राज्यपालांना टोमणा देखील लगावला आहे.

 यावेळी पत्रकारांनी मित्राकडून संपर्क केला जातोय का? असा प्रश्न विचारला असता त्यांनी काहीसे होकारार्थीच उत्तर दिले. दरवेळी संपर्कात जर नवनवीन गोष्टी ठरवल्या जाणार असतील तर अर्थ नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच हिंदुत्वामध्ये वचनबद्धता हे महत्त्वाचं कलम आहे. आम्हाला राम मंदिर हवं, पण प्रभू रामचंद्र जसे सत्यवचनी होते, तसं वचन पाळायचं नसेल तर या हिंदुत्वाला अर्थ नाही, असेही ते म्हणाले. 

काँग्रेस, राष्ट्रवादी मिळून शिवसेनेला उल्लू बनवत आहेत; नारायण राणेंचा टोला

सत्तास्थापनेसाठी जे जे करावं लागेल, ते करेन; नारायण राणे उतरले मैदानात

दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल कोणती भूमिका घेणार हे आजही ठरलेलं नाही. त्यामुळे एनडीएनतून बाहेर पडलेली शिवसेना अद्याप वेटिंगवरच असल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेला पाठिंबा देण्याबद्दल काँग्रेस, राष्ट्रवादीकडून आज निर्णय घेतला जाईल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात होती. मात्र राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानं आता आमच्याकडे भरपूर वेळ असल्याचं म्हणत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शिवसेनेला ‘वेटिंग’वर ठेवलं आहे. यशवंतराव चव्हाण सेंटरवर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार आणि अहमद पटेल यांनी काँग्रेस, राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली.

 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019BJPभाजपाShiv Senaशिवसेना