शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:18 IST

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर  यावरून राजकीय प्रतिकिया येत असून,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया' अशी प्रतिकिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

शिवसेनेला भाजपने लटकवले, काँग्रेसला फटकवले तर राष्ट्रवादीला अटकवले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपचं पुन्हा सरकार यावे ही लोकांची अपेक्षा होता.मात्र शिवसनेने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद व मंत्रीपद गेले. तर शिवसेनेला धडा शिकवण्याचे काम भाजपने केले असल्याचे आठवले म्हणाले.

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल. त्यानुसार सर्व काही सुरळीत झाले आहे. त्यामुळे जे झाले आहे ते खूप चांगले झाले असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले आहे. तसेच शिवसनेने भाजपसोबत यायले पाहिजे होते. मात्र त्यांनी राजकीय खेळ खेळण्याचे प्रयत्न केला व मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या उशिरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आठवले म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला, आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत म्हणत होते. मात्र आता त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार असा खोचक टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.