शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रज्ञासिंह, पुरोहितसह सातही जणांची मुक्तता; मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा १७ वर्षांनी निकाल
2
गॅस सिलिंडर ३४.५० रुपयांनी स्वस्त झाला; १ ऑगस्टपासून हे महत्वाचे चार बदल, पाचवा...
3
आजचे राशीभविष्य १ ऑगस्ट २०२५ : भटकंती कराल, अचानक धनलाभ होईल! असा जाईल आजचा दिवस
4
न्या. लाहोटी म्हणाले, “मालेगाव स्फोटाचा निकाल पीडितांच्या कुटुंबीयांसाठी वेदनादायक”
5
५ न्यायाधीश, २ तपास यंत्रणा, १७ वर्षे प्रतीक्षा; मालेगाव खटल्यातील सर्व आरोपींची सुटका
6
अलमट्टी धरणाची उंची वाढवू नये, कर्नाटक सरकारला निर्देश द्यावे; CM फडणवीसांचे केंद्राला पत्र
7
माणिकराव कोकाटेंना रमीचा डाव भोवला, ‘कृषी’ गेले, आता ‘खेळ’मंत्री; दत्ता भरणे नवे कृषिमंत्री
8
आबा नाही म्हणाले अन् मामांना मिळाले ‘कृषी’; कोकाटेंचा निर्णय का झाला, पडद्यामागे काय घडले?
9
भारतीय अर्थव्यवस्था सध्या मृतावस्थेत, ट्रम्प खरे बोलले! विरोधी पक्षनेते राहुल गांधींची टीका
10
खड्डेमुक्त रस्ते हा घटनेतील मूलभूत हक्क; जबाबदारी राज्य सरकार टाळू शकत नाही: सुप्रीम कोर्ट
11
EVM फेरफार अशक्य, तपासणीत पुन्हा एकदा सिद्ध, राज्यातील मतदारसंघांमध्ये तपासणी; आयोगाचा दावा
12
एक दिवस पाकिस्तान भारताला तेल विकू शकेल: डोनाल्ड ट्रम्प; अमेरिका-पाकचा व्यापार करार
13
ट्रम्प टॅरिफ: सर्वसामान्य अमेरिकनांच्या खिशाला फटका, अर्थव्यवस्थेला झटका, ५ लाख जॉब जाणार
14
मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EDचे मुंबईत ८ ठिकाणी छापे; बनावट सामंजस्य करार,  कंपन्यांवर कारवाई
15
मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात अधिक पाऊस पडणार; भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज
16
प्रांजल खेवलकरच्या लॅपटॉपमध्ये अनेक महिलांचे पार्टी अन् त्यानंतरचे आक्षेपार्ह व्हिडिओ!
17
IND vs ENG 5th Test Day 1 Stumps: नायर-वॉशिंग्टन जोडी जमली अन् टीम इंडियावरील मोठं संकट टळलं!
18
माल चाहिए क्या? xxx वाला? विचारल्यानंतर खेवलकर म्हणाले होते, 'ठेवून घ्या'! चॅटिंग आलं समोर
19
Karun Nair Fifty : 'त्रिशतकवीर' करुण नायरच्या भात्यातून ३१४६ दिवसांनी आली 'फिफ्टी'!
20
Nashik Crime: भयंकर! पत्नीला गुंगीचे औषध पाजून नग्नावस्थेत बनवले व्हिडिओ, दोन वर्ष डान्स बारमध्ये नाचायला लावले

Maharashtra CM :रामदास आठवले म्हणतात,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया'

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 13:18 IST

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल.

मुंबई : महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेची घटिका समीप आलेली असतानाच राज्यात भाजपा आणि राष्ट्रवादीचं नवं सरकार आलं आहे. देवेंद्र फडणवीस यांनी राजभवनात पुन्हा एकदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. फडणवीस यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यांनतर  यावरून राजकीय प्रतिकिया येत असून,'शिवसेना को लटकाया,राष्ट्रवादी को अटकाया' अशी प्रतिकिया केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे.

शिवसेनेला भाजपने लटकवले, काँग्रेसला फटकवले तर राष्ट्रवादीला अटकवले असल्याचे रामदास आठवले म्हणाले. भाजपचं पुन्हा सरकार यावे ही लोकांची अपेक्षा होता.मात्र शिवसनेने आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने त्यांचे मुख्यमंत्रीपद व मंत्रीपद गेले. तर शिवसेनेला धडा शिकवण्याचे काम भाजपने केले असल्याचे आठवले म्हणाले.

अमित शहा यांनी मला आधीच सांगितले होते की, तुम्ही चिंता करू नका सर्व काही ठीक होईल. त्यानुसार सर्व काही सुरळीत झाले आहे. त्यामुळे जे झाले आहे ते खूप चांगले झाले असल्याचे सुद्धा आठवले म्हणाले आहे. तसेच शिवसनेने भाजपसोबत यायले पाहिजे होते. मात्र त्यांनी राजकीय खेळ खेळण्याचे प्रयत्न केला व मुख्यमंत्रीपदासाठी केलेल्या उशिरामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे नुकसान झाले असल्याचे आठवले म्हणाले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी संजय राऊत यांच्यावर सुद्धा निशाणा साधला, आमचाच मुख्यमंत्री होणार असल्याचे राऊत म्हणत होते. मात्र आता त्यांचा मुख्यमंत्री कसा होणार असा खोचक टोला त्यांनी राऊत यांना लगावला आहे.