शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

Maharashtra CM: 5 आमदार संपर्कात नाहीत, तरीही भाजपा सरकारचा पराभव निश्चित - राष्ट्रवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 21:08 IST

भाजपाने अजित पवारांच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे सरकार स्थापन केले आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नवाब मलिक यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, आम्ही बहुमत चाचणीत भाजपा सरकारचा पराभव करू, असे मलिक यांनी म्हटले. हजेरीसाठी दिलेल्या पत्रावर शपथविधी सोहळा पार पडला. जेव्हा विधिमंडळ अधिवेशन सुरू होईल, तेव्हा बहुमत सिद्ध करण्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला पराभूत करू. त्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही मलिक यांनी बोलून दाखवलं. 

भाजपाने अजित पवारांच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणात भुकंप झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यावर, शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त करत, अजित पवारांचा तो निर्णय वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. तसेच, राष्ट्रवादी पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे या राजकारणात वेगळच ट्विस्ट पाहायला मिळालं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला 43 आमदारांची उपस्थिती होती.    

''अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यास पक्ष सहमत नाही. त्यामुळेच, अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. तुर्तात जयंत पाटील यांच्याकडे तो अधिकार देण्यात आला आहे. केवळ 5 आमदार आमच्या संपर्कात नाही, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 आमदार लवकरच येथे पोहोचतील. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही छोरी छोरी छुपके छुपके.. बनविण्यात आलेलं सरकार पराभूत करू, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस