शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
2
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शहा यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
5
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
6
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
7
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
8
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
9
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ
10
सोडून गेलेले परत आले तरी उमेदवारी नाही, उद्धव ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर
11
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
12
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
13
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
14
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
15
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
16
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
17
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
18
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
19
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
20
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला

Maharashtra CM: 5 आमदार संपर्कात नाहीत, तरीही भाजपा सरकारचा पराभव निश्चित - राष्ट्रवादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2019 21:08 IST

भाजपाने अजित पवारांच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे सरकार स्थापन केले आहे.

मुंबई - महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर नवाब मलिक यांनी भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांच्या बैठकीनंतर मलिक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी, आम्ही बहुमत चाचणीत भाजपा सरकारचा पराभव करू, असे मलिक यांनी म्हटले. हजेरीसाठी दिलेल्या पत्रावर शपथविधी सोहळा पार पडला. जेव्हा विधिमंडळ अधिवेशन सुरू होईल, तेव्हा बहुमत सिद्ध करण्याच्या निवडणुकीत आम्ही भाजपाला पराभूत करू. त्यानंतर महाविकासआघाडीचं सरकार स्थापन होईल, असा विश्वासही मलिक यांनी बोलून दाखवलं. 

भाजपाने अजित पवारांच्या अनपेक्षित पाठिंब्यामुळे सरकार स्थापन केले आहे. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांनी शपथ घेतली, तर उपमुख्यमंत्रीपदी राष्ट्रवादी काँग्रेसचेअजित पवार यांनी शपथ घेतली. त्यानंतर राज्यातील राजकारणात भुकंप झाल्याची प्रतिक्रिया अनेकांनी दिली. त्यावर, शरद पवार यांनीही नाराजी व्यक्त करत, अजित पवारांचा तो निर्णय वैयक्तिक असल्याचं म्हटलंय. तसेच, राष्ट्रवादी पक्षाचा या निर्णयाला पाठिंबा नसल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे या राजकारणात वेगळच ट्विस्ट पाहायला मिळालं. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक घेतली. या बैठकीला 43 आमदारांची उपस्थिती होती.    

''अजित पवारांनी जो निर्णय घेतला, त्यास पक्ष सहमत नाही. त्यामुळेच, अजित पवारांना विधिमंडळ नेतेपदावरुन हटविण्यात आले आहे. तुर्तात जयंत पाटील यांच्याकडे तो अधिकार देण्यात आला आहे. केवळ 5 आमदार आमच्या संपर्कात नाही, त्यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला जात आहे. 6 आमदार लवकरच येथे पोहोचतील. त्यामुळे आमदारांच्या संख्याबळाच्या जोरावर आम्ही छोरी छोरी छुपके छुपके.. बनविण्यात आलेलं सरकार पराभूत करू, असे नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारAjit Pawarअजित पवारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस