शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Maharashtra Cabinet Expansion: उस्मानाबादकरांची भिस्त आता जावयांवरच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 06:46 IST

मंत्रिपद मिळाले नाही, मात्र तीन जावई झाले मंत्री; आता विकासाचा लाडिक हट्ट पुरवा

उस्मानाबाद : मंत्रीमंडळ विस्तारात उस्मानाबादची झोळी रितीच राहिली आहे़ मात्र तीन- जावई मंत्री झाल्याने त्यावरच नागरिकांना समाधान मानावे लागले आहे.उस्मानाबाद जिल्ह्यातील चारपैकी कधी नव्हे ते पहिल्यांदाच तीन जागा शिवसेनेच्या पदरी पडल्या आहेत़ त्यामुळे एकतरी मंत्रीपद विस्तारात जिल्ह्याला नक्कीच मिळेल, अशी आशा सेना पदाधिकाऱ्यांना होती. मात्र, सोमवारच्या मंत्रीमंडळ विस्तारात उस्मानाबादच्या पदरी निराशा पडली़ एकही मंत्री न झाल्याचे दु:ख व्यक्त होत असतानाच उस्मानाबाद तालुक्यातील तेर, ढोकी, उपळे या तीन अगदी लगतच्याच गावांमध्ये मात्र, आनंद ओसंडून वाहत होता़ त्याला कारणही खासच आहे़ विस्तारात या तीन गावांतील जावयांनी शपथ घेतली आहे़ तेर ही अजित पवार यांची सासरवाडी़ माजी मंत्री डॉ़पद्मसिंह पाटील यांच्या चुलत भगिनी सुनेत्राताई यांच्याशी त्यांचा विवाह झालेला़ आता अजित पवारांच्या हाती सत्तेची दोर आली असल्याने तेरमध्ये उत्साह आहेच़ मात्र, राणाजगजितसिंह पाटील हे आता भाजपात गेले असल्याने हा उत्साह रस्त्यावर आला नाही, इतकेच.राजेश टोपे हेही इकडचेच जावई़ उपळे ही टोपेंची सासरवाडी़ येथील जिल्हा बँकेचे माजी उपाध्यक्ष विक्रम पडवळ हे त्यांचे सासरे़ टोपे मंत्री झाल्याचे समजल्यानंतर रात्री सर्व कुटूंबियांनी एकत्र येऊन आनंद साजरा केला़ तिसरे जावई मंत्री प्राजक्त तनपुरे यांची सासरवाडी ही ढोकी गावची़ तेर पासून अवघ्या ८ किमी अंतरावर असलेल्या ढोकीतील उद्योगपती सुभाष देशमुख हे त्यांचे सासरे आहेत़ तनपुरे मंत्री झाल्याचे समजल्यानंतर सायंकाळी घरासमोर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारRajesh Topeराजेश टोपेPrajakta Tanpurayप्राजक्त तनपुरे