शहरं
Join us  
Trending Stories
1
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी
2
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
3
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
4
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
5
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
6
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
7
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
8
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
9
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
10
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
11
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
12
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
13
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
14
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
15
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
16
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
17
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
18
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
19
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
20
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?

Maharashtra Budget Session 2022 : "दाऊदच्या मंत्र्यांचा राजीनामा घ्या"; नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी भाजपा आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2022 11:45 IST

Maharashtra Budget Session 2022 : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला.

मुंबई – राज्याच्या विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला (Maharashtra Budget Session 2022) सुरुवात झाली आहे. नवाब मलिकांना ईडीची अटक, एसटी महामंडळाचं विलिनीकरण, मराठा आरक्षण यासारख्या विविध मुद्द्यांवरून सत्ताधारी-विरोधक आमनेसामने येण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सभागृहात गोंधळ झाला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या भाषणावेळी सत्ताधारी पक्षाने गोंधळ घातला. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वादग्रस्त वक्तव्यावरून सभागृहात घोषणाबाजी सुरू केली. त्यामुळे राज्यपालांनी अवघ्या काही मिनिटांत अभिभाषण आटोपतं घेतलं. 

अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी भाजपा (BJP) आमदार आक्रमक झाले आहेत. नवाब मलिक (Nawab Malik) यांच्या राजीनाम्यासाठी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणाबाजी केली. भाजपा आमदारांच्या हातात काही पोस्टर्स होते. या पोस्टर्सवर नवाब मलिक आणि दाऊद इब्राहिमचा फोटो सुद्धा होता. "दाऊदच्या मंत्र्याचा राजीनामा घ्या" असा उल्लेखही या पोस्टर्सवर आहे. विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर, आशिष शेलार, अतुल भातखळकर, देवेंद्र फडणवीस आदी नेते उपस्थित होते. राज्य विधिमंडळाच्या आजपासून सुरू होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या निमित्ताने भाजपा आणि मित्रपक्षांची एक बैठक बुधवारी मुंबई येथे झाली. त्यानंतर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधत सरकारवर हल्लाबोल केला होता.

मलिकांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच, पण...; फडणवीसांचा हल्लाबोल

दाऊद इब्राहिम, अंडरवर्ल्डशी आर्थिक व्यवहार करणाऱ्या मंत्री नवाब मलिक यांना वाचवायला अख्खे सरकार उभे आहे. देशात असे कधी घडले नाही. ज्या सरकारचे प्रमुख शिवसेनेचे आहेत, ते मुंबईच्या खून्यांशी व्यवहार करणाऱ्या सोबत राहतात, हेही पाहतो आहोत. नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी आक्रमक होणारच. पण आम्हाला चर्चेत रस, अनेक मुद्दे मांडणार, चर्चा सुद्धा करणार. शेतकरी हवालदिल आहे, पण त्याची वीज कापली जाते आहे. अजित पवार यांनी दोन वेळा वीज न कापण्याबाबत शब्द दिला, पण त्यांचे कुणी ऐकत नाही असा आरोप फडणवीसांनी केला. 

असे फुसके बार काय वादळ उठवणार?; शिवसेनेचा भाजपाला टोला

विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. हे अधिवेशन गाजेल, वाजेल किंवा वादळी ठरेल, अशी हूल विरोधी पक्षांतर्फे उठवली जात आहे. त्यात अजिबात तथ्य दिसत नाही. विरोधी पक्षांच्या लोकांनी आरोपांची राळ उडवायची व त्यातून वादळ उभे करायचे दिवस आता राहिलेले नाहीत. कारण विरोधकांचे आरोप द्वेषपूर्ण असतात. त्यामुळे ते आपटीबारही ठरत नाहीत. असे फुसके बार काय वादळ उठवणार? अशा शब्दात शिवसेनेनं अधिवेशनापूर्वी विरोधी पक्ष भाजपाला टोला लगावला आहे. 

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBudget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनnawab malikनवाब मलिकBJPभाजपाPoliticsराजकारण