शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

“काही अर्थ नाही, कर्जमाफी शेतकऱ्यांसाठी की बँकांसाठी? ”; शेतकरी नेत्यांची सरकारवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2026 19:09 IST

Maharashtra Budget 2026 News: अतिवृष्टीमुळे आणि शेतीमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे.

Maharashtra Budget 2026 News: अर्थसंकल्प मांडत असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जी शेतकरी कर्जमाफी जाहीर केली आहे, ती तकलादू आहे. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा विश्वासघात करणारी आहे. ऑक्टोबर महिन्यात आम्ही आंदोलन केले होते, तेव्हा सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सात बारा कोरा करण्याचा पुनरुच्चार केला होता. पण प्रत्यक्षात कर्जमाफी जाहीर केली, त्याला काही अर्थ राहिलेला नाही, अशी टीका शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी केली. 

विधिमंडळात राज्याचा अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी अशा कर्जमाफीची घोषणा केली आहे. ३० सप्टेंबर २०२५ पर्यंत पीक कर्ज थकीत असणाऱ्या शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळणार असून, या योजनेचे नामकरण 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना' असे करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे पीक कर्ज ३० सप्टेंबर २०२५ रोजी थकीत होते, अशा पात्र शेतकऱ्यांचे २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज पूर्णपणे माफ करण्यात येणार आहे. जे शेतकरी आपल्या कर्जाचे हप्ते वेळेवर आणि नियमितपणे भरत आहेत, अशा प्रामाणिक कर्जदार शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून ५०,००० रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. यावरून राजू शेट्टी यांनी सरकारवर टीका केली.

वरचे पैसे भरायला शिल्लक नाही

राज्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे कर्ज साधारण अडीच ते तीन लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. व्याजासकट साडे तीन लाखाच्या पुढे गेले आहे. असे असताना दोन लाखांपर्यंत कर्जमाफीचा लाभ तेव्हा मिळेल, जेव्हा वरची रक्कम बँकेत शेतकरी भरेल. परंतु, ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीमुळे आणि शेतीमालाचे भाव पडल्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. वरचे पैसे भरायला शिल्लक नाही. तेव्हा शेतकरी पैसे भरणार तरी कसे?, अशी विचारणा राजू शेट्टी यांनी केली. 

जे नियमित होते, तेही थकीत गेले

नियमित कर्जाची परतफेड करणाऱ्यांची परिस्थिती अशी आहे की, ऑक्टोबर महिन्यात यांनी सांगितले की, आम्ही कर्जमाफी जाहीर करणार आहोत. त्यामुळे जे नियमित होते, तेही थकीत गेले. आता ते थकीत असलेल्यांच्या यादीत गेल्यामुळे ते नियमितच्या यादीतून बाहेर गेले, असे राजू शेट्टी म्हणाले. 

दरम्यान, सरकारने केलेली ही कर्जमाफी बँकांसाठी आहे की शेतकऱ्यांसाठी आहे? असा प्रश्न पडतो, अशी टीका त्यांनी केली. तसेच आजचा राज्य सरकारचा अर्थसंकल्प म्हणजे केवळ आकडेवारीची फेकाफेक होती. जसे गाजर केंद्र सरकारने दिले, तसे गाजर आता राज्य सरकारने आपल्याला दिले. सरसकट कर्जमाफीची घोषणा केली होती मात्र ही सरसकट कर्जमाफी देत नाही दोन लाखांपर्यंत फक्त कर्जमाफी देणार आहे. शेतकऱ्यांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केली.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Loan waiver: For farmers or banks? Criticism of the government.

Web Summary : Farmer leaders criticize Maharashtra's loan waiver, calling it deceptive and insufficient. The ₹2 lakh limit and conditions leave many farmers out, benefiting banks more. Concerns rise over farmers' ability to repay remaining amounts.
टॅग्स :Maharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट 2026Budget Sessionअर्थसंकल्पीय अधिवेशनFarmerशेतकरीfarmingशेतीRaju Shettyराजू शेट्टी