शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
3
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
4
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
5
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
6
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
7
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
8
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
9
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
10
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
11
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
12
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
13
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
14
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
15
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
16
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
17
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
18
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
19
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
20
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले

Maharashtra Budget 2022 : अर्थसंकल्प म्हणजे 'घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ', सदाभाऊ खोतांची खोचक प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 18:32 IST

Sadabhau Khota : महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ, अशा पद्धतीने हा आजचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. 

मुंबई : महाविकास आघाडी सरकारचा सन २०२२-२३ या वर्षाचा अर्थसंकल्प आज विधानसभेत अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला.  हा अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर त्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली असली तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र हा अर्थसंकल्प सर्वांगीण विकासाची मोठी भरारी घेणारा अर्थसंकल्प असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, महाविकास आघाडी सरकारने सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे घोषणांचा पाऊस आणि योजनांचा दुष्काळ, अशा पद्धतीने हा आजचा अर्थसंकल्प सादर झाला आहे, अशी खोचक प्रतिक्रिया रयत क्रांती संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. 

या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांना, शेतमजुरांना व बारा बलुतेदारांना काहीही मिळाले नाही. 50 हजार रुपये मागच्या शेतकऱ्यांना पैसे देऊ म्हणून घोषणा केली. पण ते कधी मिळणार अजून माहिती नाही. दोन लाखाच्या वरती ज्या शेतकऱ्यांचे कर्ज आहे. त्यांना काय देणार या सर्व बाबींवर सरकार काहीही बोलले नाही, असे सदाभाऊ खोत म्हणाले. 

दुसऱ्या बाजूला वीज माफी दिली पाहिजे होती पण वीज बिलाबाबत सरकार काहीही बोलले नाही. सोन्या वरचा टॅक्स कमी केलं, बिल्डरांच्या खरेदी व्यवहारावरील टॅक्स कमी केले. परंतु डिझेल पेट्रोलचा टॅक्स कमी केला नाही. या राज्यातल्या शेतकऱ्यांना काही दिले नाही. या राज्यातल्या बारा बलुतेदारांना काही दिले नाही. राज्यातल्या धनगर, माळी, ओबीसीसमाज यालाही काही दिलेलं नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारचा दिलासा या राज्यातल्या जनतेला देण्याचे काम या सरकारने केलेले नाही, असे सदाभाऊ खोत यांनी सांगितले. 

याचबरोबर, एसटी कर्मचाऱ्यांचे तोंडाला तर पानेपुसली. सध्या एसटी बंद आहेत पहिल्या जुन्या एसटी गाड्या सडायला लागलेल्या आहेत आणि नवीन 3000 एसटी आम्ही गाड्या खरीदी करणार म्हणजे परत हे या माध्यमातून कमिशन खायला मोकळे. असा हा दिशाहीन आणि भरकटलेला अर्थसंकल्प आहे, अशा शब्दांत सदाभाऊ खोत यांनी टीका केली आहे. 

टॅग्स :Sadabhau Khotसदाभाउ खोत Ajit Pawarअजित पवारMaharashtra Budgetमहाराष्ट्र बजेट २०२२Uddhav Thackerayउद्धव ठाकरे