शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
3
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
4
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
5
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
6
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
7
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
8
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
9
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
10
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
11
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
12
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
13
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
14
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
15
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
16
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
17
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
18
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
19
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
20
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला

Maharashtra Budget 2018: राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांना 13 हजार कोटींची कर्जमाफी- अर्थमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2018 15:30 IST

2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते.

मुंबई: आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच्या फडणवीस सरकारच्या शेवटच्या अर्थसंकल्पात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यातील 35 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आल्याचा दावा केला. यासाठी तब्बल 13 हजार कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचे मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले. सरकारकडून गुरुवारी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात 2017 – 18 या वर्षामध्ये कृषि क्षेत्राची वाढ आधीच्या वर्षीच्या 12.5 टक्क्यांच्या तुलनेत चांगलीच घसरून 8.3 टक्के झाल्याचे नमूद करण्यात आले होते. याशिवाय, गेल्या काही काळापासून कर्जमाफीच्या अंमलबजावणीतील ढिसाळपणामुळे शेतकरी वर्ग नाराज आहे. त्यामुळे आजच्या अर्थसंकल्पात कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूदी असणार याबद्दल अटकळ बांधली जात होती. त्यानुसार आजच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीसोबत सिंचन आणि जलसंपदा विभागासाठी अनेक तरतूदी दिसून आल्या. 

आतापर्यंत राज्यातील 35.68 लाख शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात आले असून त्यासाठी 13 हजार 782 कोटी रूपये खर्च करण्यात आल्याचा दावा मुनगंटीवार यांनी केला. तर आगामी वर्षात जलसंपदा विभागासाठी 8 हजार 233 कोटींची तरतूद करण्यात आल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितले. 

अर्थसंकल्पातील कृषी क्षेत्रासाठीच्या महत्त्वपूर्ण तरतुदी पुढीलप्रमाणे:

* शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टीने सरकार प्रयत्नशील.* सेंद्रीय शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी १०० कोटींची तरतूद* सूक्ष्म सिंचनासाठी ४३२ कोटी आणि विहिरींसाठी १३२ कोटींची तरतूद* वनशेतीस प्राधान्य देण्यासाठी 15 कोटींची तरतूद* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार * कोकणातील आंबा, काजू उत्पादन वाढवण्यासाठी १०० कोटी रुपये तरतूद* शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत ४६ लाख ३४ हजार कर्जधारकांना कर्जमाफी देणार * मागील तीन वर्षांत घोषित जलसंपदा विभागाच्या सर्व योजनांना निधी उपलब्ध केला.* पंतप्रधान कृषि सिंचन योजनेअंतर्गत समाविष्ट असलेल्या राज्यातील २६ प्रकल्पांकरिता ३ हजार ११५ कोटी २१ लक्ष निधीची तरतूद* जलसंपदा विभागासाठी ८ हजार २३३ कोटी १२ लक्ष रूपयाची तरतूद* कोकणातील खार बंधा-यांच्या बांधकामासाठी विशेष कार्यक्रम राबविणार व अस्तित्वातील खार बंधा-यांची दुरुस्ती करणार ह्यासाठी ६० कोटींची भरीव तरतूद.* जलयुक्त शिवार अभियानासाठी १५०० कोटी एवढा विशेष निधी* मागेल त्याला शेततळे ह्या योजनेत ६२ हजार शेततळी पूर्ण. त्यासाठी १६० कोटी एवढा निधी. 

टॅग्स :Maharashtra Budget 2018महाराष्ट्र अर्थसंकल्प २०१८Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवार