शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
2
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
3
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
4
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
5
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
6
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
7
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
8
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
9
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
10
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
11
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
12
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
13
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
14
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
15
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
16
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
17
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
18
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
19
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
20
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?

महाराष्ट्र भूषण पुरस्कार पुन्हा एकदा सुरू होणार, मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली समिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 20, 2020 11:26 IST

२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता.

ठळक मुद्दे१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला.१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता

मुंबई : राज्य सरकारचा ‘महाराष्ट्र भूषण’ हा सर्वोच्च सन्मान गेली पाच वर्षे कोणालाही प्रदान करण्यात आलेला नव्हता. आता मात्र हा पुरस्कार पुन्हा सुरू करण्याची भूमिका घेत महाविकास आघाडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती स्थापन केली आहे.उपमुख्यमंत्री अजित पवार हे समितीचे उपाध्यक्ष असतील. सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख,  राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर, सांस्कृतिक कार्य सचिव आणि सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक हे शासकीय सदस्य तर शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. प्रकाश आमटे, उद्योजपती बाबा कल्याणी, क्रिकेटपटू संदीप पाटील आणि अभिनेते दिलीप प्रभावळकर अशासकीय सदस्य असतील.२०१५ मध्ये शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना तत्कालीन फडणवीस सरकारने हा पुरस्कार प्रदान केला होता आणि त्यावर वादही झाला होता. त्यानंतर सरकारने हा पुरस्कार कोणालाही दिला नाही. आता ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील समिती गेल्या पाच वर्षांतील पुरस्कारही जाहीर करणार का, याबाबत उत्सुकता राहील.१९९५ मध्ये राज्यात युती सरकार असताना हा पुरस्कार सुरू झाला. पहिलाच पुरस्कार शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला, पण बाळासाहेबांनी पुरस्कार स्वीकारण्यास नम्र नकार दिला. राज्यात माझे सरकार आहे आणि मीच पुरस्कार घेणे उचित होणार नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली होती.१९९७ मध्ये पहिला पुरस्कार प्रख्यात साहित्यिक पु.ल. देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आणि त्यावेळच्या पुलंच्या भाषणाने वादळ निर्माण केले होते. त्याच वेळी धारावीतील एका पुलाच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना बाळासाहेब ठाकरे यांनी, ‘ जुने पुलं पाडून आता नवीन पुलं बांधण्याची गरज आहे’, असा टोला हाणला होता. 

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv SenaशिवसेनाMaharashtraमहाराष्ट्र