शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

गुंतवणुकीत महाराष्ट्र गुजरातपेक्षाही मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 07:07 IST

अशोक चव्हाण यांची टीका; शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे राज्य पिछाडीवर

मुंबई : उद्योग क्षेत्रातील गुंतवणुकीबाबत देवेंद्र फडणवीस सरकारच्या चार वर्षांच्या काळात महाराष्ट्र तिसऱ्या क्रमांकावर फेकला गेला. गुंतवणुकीचे प्रमाण वेगाने घसरत असून उद्योग क्षेत्राचे तीन तेरा वाजले आहेत. महाराष्ट्रगुजरातपेक्षाही मागे पडला आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा.अशोक चव्हाण यांनी मंगळवारी येथे पत्र परिषदेत केली.

केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्रालयाच्या डिपार्टमेंट आॅफ इंडस्ट्रिअल पॉलिसी अँड प्रमोशनने जाहीर केलेली आकडेवारी नमूद करून चव्हाण म्हणाले की, २०१६ मध्ये कर्नाटकात १ लाख ५४ हजार १७३ कोटी, गुजरातेत ५६ हजार १५६ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीचे प्रस्ताव आले. तर या तुलनेत महाराष्ट्रात केवळ ३८ हजार १९३ कोटी रूपयांचेच प्रस्ताव आले. २०१७ मध्येही कर्नाटकात १ लाख ५२ हजार ११८ कोटी रु, गुजरातमध्ये ७९ हजार ६८ कोटींचे प्रस्ताव आले. तर महाराष्ट्र अवघ्या ४८ हजार ५८१ कोटी रूपयांच्या गुंतवणुकीच्या प्रस्तावासह तिस-या क्रमांकावर राहिला. सप्टेंबर २०१८ अखेर कर्नाटकात ८३ हजार २३६ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले असून गुजरात राज्यात ५९ हजार ८९ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. तर महाराष्ट्रात यंदा केवळ ४६ हजार ४२८ कोटी रुपयांचे प्रस्ताव आले आहेत. या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात कर्नाटक आणि गुजरातच्या तुलनेत फार कमी गुंतवणुकीचे प्रस्ताव आले आहेत. पूर्वी गुजरात महाराष्ट्रापेक्षा कितीतरी पिछाडीवर असायचा. परंतु, विद्यमान सरकारच्या नाकर्तेपणाचा गुजरात लाभार्थी असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप चव्हाण यांनी केला.

संभाजी भिडेंना राजाश्रयभीमा कोरेगाव दंगलीचे मुख्य सुत्रधार संभाजी भिडे होते असा आरोप करून चव्हाण म्हणाले की, भिडे आणि त्यांच्या साथीदारांवरील दंगलीचे ६ गुन्हे सरकारने मागे घेतले. भिडेंवरील गुन्हे मागे घेणा-या सरकारने मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणा-या तरूण तरूणींवरील गुन्हे आश्वासन देऊनही मागे घेतले नाहीत. भिडेंना राजाश्रय दिला जात आहे. हे गुन्हे मागे का घेतले नाहीत? याचे उत्तर सरकारने द्यावे असे चव्हाण म्हणाले.चव्हाणांचे अज्ञान अनपेक्षित : सुभाष देसाईकाँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण महाराष्ट्राची बदनामी का करू इच्छितात? माजी मुख्यमंत्री म्हणून नाही तर माजी उद्योगमंत्री म्हणून इतके अज्ञान चव्हाण यांचे असेल, याची अपेक्षा आम्ही केली नव्हती, अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी पत्र परिषदेत दिली. देसाई म्हणाले की, देशात येणाºया एकूण गुंतवणुकीत तर महाराष्ट्र आघाडीवर आहेच, शिवाय, गुंतवणुकीचे प्रस्ताव प्रत्यक्ष गुंतवणुकीत परावर्तित होण्यात सुद्धा महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने जाहीर केलेल्या माहितीतून स्पष्ट होते.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणMaharashtraमहाराष्ट्रGujaratगुजरात