शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
6
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
7
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
8
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
9
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
10
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
11
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
12
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
13
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
14
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
15
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
16
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
17
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
18
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
19
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
20
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय

Maharashtra Bandh: आजचा बंद म्हणजे Mahavikas Aghadi सरकारचा ढोंगीपणा, Devendra Fadnavis यांनी सांगितलं नेमकं कारण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2021 13:41 IST

Devendra Fadnavis, Maharashtra Bandh: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात ( Lakhimpur Kheri Violence) राज्यातील सत्ताधारी Mahavikas Aghadi सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.

मुंबई - उत्तर प्रदेशमधील लखीमपूर-खेरी येथे झालेल्या हिंसाचाराविरोधात राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांनी आज राज्यात बंद पुकारला आहे. या बंदला संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. दरम्यान, विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या बंदवरून राज्य सरकारवर जोरदार टीका केली आहे. आजचा बंद म्हणजे महाविकास आघाडी सरकारचा ढोंगीपणा आहे, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, आज महाविकास आघाडी सरकारने पुकारलेला बंदमुळे मविआ सरकारचा ढोंगीपणा उघड झाला आहे. कारण लखीमपूरच्या घटनेकरिता महाराष्ट्रामध्ये बंद केला जातो. मात्र महाराष्ट्रातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मात्र एका नव्या पैशाची मदत हे सरकार करत नाही. महाराष्ट्रातील शेतकरी अभूतपूर्व संकटात आहे. हे सरकार आल्यापासून राज्यात दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. बांधावर जाऊन मदतीची आश्वासने दिली. मात्र ही आश्वासने हवेत विरली.

आजचा बंद हा ढोंगीपणाचा कळस आहे. कारण याच मंडळींनी मावळमध्ये  पाणी मागणाऱ्या शेतकऱ्यांवर गोळीबार केला होता, अशा गोळीबार करणाऱ्या लोकांना अशा प्रकारचं आंदोलन करण्याची नैतिकता तरी आहे का. खरंतर लखीमपूरची घटना गंभीर आहे. तेथील सरकार त्यावर कारवाई करत आहे. हा बंद हा त्या घटनेबाबत सहानुभूती व्यक्त करण्यासाठी नाही आहे तर त्यावर राजकीय पोळी भाजता येईल का या संकुचित विचाराने केलेला बंद आहे. म्हणूनच लोकांचा या बंदला प्रतिसाद नाही आहे. मात्र प्रशासनाची मदत घेऊन, दमदाटी करून, धमक्या देऊन राज्यातील लोकांना बंद पाळण्यासाठी भाग पाडलं जात आहे. तसंही हे बंद सरकार बंद सरकार आहे. योजना, अनुदानं बंद केली, कोरोना काळात देश सुरू असताना महाराष्ट्र बंद केला होता. आता काही सुरू होत असताना सरकारने बंद पुकारला, असा टोला फडणीवस यांनी लगावला.

खरंतर उच्च न्यायालयाने एका निर्णयानुसार बंद पुकारणे बेकायदेशीर ठरवलेले आहे. त्यामुळे न्यायालयाने या बंदची दखल घ्यावी. तसेच बंदमधील नुकसानीची भरपाई सरकारकडून वसूल करण्यात यावी. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळाच्या बैठकीतून बंदचा निर्णय घेतला, ही घटनेची पायमल्ली आहे, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.  

टॅग्स :Maharashtra BandhMaharashtra BandhDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसMahavikas Aghadiमहाविकास आघाडीLakhimpur Kheri Violenceलखीमपूर खीरी हिंसाचार