शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
2
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
3
आमदार, खासदार विकत घ्यायला पैसे आहेत पूल बांधायला नाही? मावळ दुर्घटनेवरुन राऊतांचा सवाल
4
Post Office च्या 'या' स्कीममध्ये हवी तितकी खाती उघडू शकता, हमी परताव्यासह मिळेल Tax मध्येही सूट
5
इंग्लंडविरूद्धच्या टेस्टसाठी शार्दुल ठाकूरला 'प्लेइंग ११'मध्ये संधीची शक्यता, 'या' खेळाडूला डच्चू?
6
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
7
Israel-Iran War : भारताला अडकवण्याचा प्रयत्न करणारा चीनच स्वत:च अडकला, इस्रायलच्या इराणवरील हल्ल्यानं ड्रॅगनलाही फटका
8
"आई कुठे काय करते मला सोडायची नव्हती पण...", संजनाची भूमिका साकारलेल्या दिपाली पानसरेने सांगितलं नेमकं कारण
9
"मंत्रालयातून उडी मारावी लागेल अशी वेळ.."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याची बिकट अवस्था, म्हणाला- "वय झाल्यामुळे.."
10
तुमचा पैसा तयार ठेवा! 'या' आठवड्यात ६ नवे IPO बाजारात, बंपर कमाईची संधी?
11
Navi Mumbai Suicide: १२ हजार रुपयांत संपूर्ण कुटुंबाचा खर्च चालवायचा कसा? तरुणीने संपवले जीवन
12
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
13
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
14
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
15
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
16
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
17
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
18
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
19
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
20
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण

Maharashtra Bandh : मराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2018 16:43 IST

आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.

ठळक मुद्देमराठ्यांचा आवाज आता दिल्लीत घुमणार : शाहू छत्रपतीजाहीर यल्गार सभेत निर्वाणीचा इशारा

कोल्हापूर : आरक्षण मिळाल्याशिवाय लढा थांबणार नाही. आता मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शाहू छत्रपती यांनी गुरूवारी येथे दिला.

कोल्हापूरात सकल मराठा क्रांती ठोक मोर्चातर्फे आयोजित जाहीर यल्गार सभेत ते बोलत होते.दसरा चौकात सकाळी नऊ वाजल्यापासूनच युवक गावागावातून हातात भगवे झेंडे घेतलेले युवक मोटारसायकल वरुन यायला सुरुवात झाली.सकाळी अकरा वाजता राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर चार वीरमातांच्या हस्ते आॅगस्ट क्रांतिदिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर राष्ट्रगीत, शाहू गौरवगीत, महाराष्ट्र गीत व मराठा आरक्षण गीताने जाहीर सभेचा प्रारंभ झाला.

अध्यक्षस्थानी शाहू छत्रपती होते. प्रमुख उपस्थिती महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक प्रतापसिंह जाधव, ‘लोकमत’चे संपादक वसंत भोसले, नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात, ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार, खासदार धनंजय महाडिक, आमदार सर्वश्री सतेज पाटील, राजेश क्षीरसागर, चंद्रदीप नरके, सत्यजीत पाटील-सरुडकर, माजी आमदार मालोजीराजे, समन्वयक दिलीप देसाई, इंद्रजीत सावंत, वसंतराव मुळीक, प्रा. जयंत पाटील आदींची होती.

शाहू छत्रपती म्हणाले, आरक्षणाच्या मागणीसाठी जमलेल्या मराठ्यांचा आवाज दिल्लीत घुमल्याशिवाय राहणार नाही. हा आवाज पंतप्रधान व मुख्यमंत्र्यांपर्यंत व्यवस्थितपणे पोहोचवावा लागेल. कारण केंद्रात व राज्यात एकाच पक्षाचे सरकार आहे. त्यामुळे कोणतेही कारण न सांगता सरकारने लवकरात लवकर आरक्षण द्यावे.

 

डॉ. थोरात म्हणाले, मराठा आरक्षणासाठी सुरु असलेला लोकांचा आवाज सरकारने ऐकावा. या सरकारने काहीच केले नाही असे म्हणता येणार नाही. परंतु आरक्षणाचा प्रश्न अजून मार्गी लावलेला नाही. मराठा समाजातील दुर्बल घटकाला शिक्षण व रोजगाराची हमी मिळेल तेव्हाचे खऱ्या अर्थाने युध्द जिंकले जाईल.जयसिंगराव पवार म्हणाले, आरक्षणाचे आंदोलन हे असेच धगधगत ठेवले पाहीजे. त्या शिवाय सरकार नमणार नाही. आंदोलकांनी या सरकारला चांगलेच वठणीवर आणले आहे. मराठा तरुणांनी आततायीपणा करुन आत्महत्या करु नये. कारण ही लढाई तुमच्यासाठीच सुरु आहे.प्रतापसिंह जाधव म्हणाले, तामिळनाडूत जयललितांनी खंबीरपणे पेरियार समाजला आरक्षण मिळवून दिले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सारखी हातात काकणं भरली नव्हती. यावेळी दिलीप देसाई, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत, प्रा. जयंत पाटील, सचिन तोडकर, हर्षल सुर्वे यांचे भाषण झाले. पंडीत कंदले यांनी सुत्रसंचालन केले.

निर्वाणीचा इशाराचार वर्षे उलटूनही सरकार आरक्षणाबाबत सकारात्मक नाही. त्यामुळे आमचा संयम आता संपत चालला आहे. केंद्रात व राज्यात तुमचे सरकार असल्याने घटनेत दुरुस्ती करा व लवकरात लवकर आरक्षण द्या, असा निर्वाणीचा इशारा या जाहीर यल्गार सभेत मराठा नेत्यांनी दिला. 

 

टॅग्स :Maharashtra Bandhमहाराष्ट्र बंदkolhapurकोल्हापूरMaratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चाShahu Maharaj Chhatrapatiशाहू महाराज छत्रपती