शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 21:23 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: एकनाथ शिंदे, अजित पवार आणि अशोक चव्हाण यांनी पाठीत खंजीर खुपसला, धोकेबाजांना निवडणुकीत धडा शिकवायचा आहे, अशी टीका तेलंगणचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी केली

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. यातच काँग्रेसचे तेलंगणधील मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी नांदेड येथील प्रचारसभेत बोलताना अजब आवाहन केल्याचे पाहायला मिळत आहे. 

ऑटोरिक्षा चालवणाऱ्या एकनाथ शिंदे यांना बाळासाहेब ठाकरे यांनी मंत्रिपद दिले. परंतु, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्या पाठीत खंजीर खुपसला, अजित पवार यांनी शरद पवारांच्या पाठीत खंजीर खुपसला. ज्या काँग्रेसने अशोक चव्हाण यांना दोन वेळा मुख्यमंत्री केले त्यांनी काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेड्डी यांनी केली. पुढे बोलताना ते म्हणाले की, तुम्ही येथील स्थानिक आहात. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती आहे. त्यांनी किती अमाप संपत्ती कमावली आहे हे त्यांनाही माहिती नसेल. त्यांचे मेहनतीचे पैसे नाहीत.  त्यांचे पैसे घ्या पण मत काँग्रेसच्या उमेदवारालाच करा. त्यांनी काही घाम गाळून पैसे कमावले नाहीत. त्यांच्या खिशातूनही पैसे काढून घ्या, ते ही कमी पडले तर त्यांच्या घरी जाऊन ज्या वस्तू आहेत त्या घेऊन टाका, परंतु मतदान काँग्रेसच्या उमेदवाराला करा, असे आवाहन प्रचारसभेत बोलताना केले. 

धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे

आता विधानसभा निवडणुकीत धोकेबाजांना धडा शिकवायचा आहे. अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्री केले. खासदार केले, अशोक चव्हाण यांच्या वडिलांनाही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले. दिल्लीपासून ते दिल्लीपर्यंत जी जी म्हणून पदे होती, ती सगळी अशोक चव्हाण यांना काँग्रेसने दिली. अशोक चव्हाण यांना गांधी परिवाराने सगळे काही दिले. परंतु, त्यांनी गांधी परिवाराला फसवले. पाठीत खंजीर खुपसला, अशी टीका रेवंथ रेड्डी यांनी केली. 

दरम्यान, निवडणुकीत प्रामाणिक उमेदवार जिंकणे महत्त्वाचा आहे. खोटारड्यांची देशाचा स्पर्धा आहे. मोदींना पराभूत करायचे आहे , अशोक चव्हाण यांना हरवायचे आहे, राजकारणात अशोक चव्हाण दिसू नये, कारण त्यांनी तुमचे नाव खराब केले, या शब्दांत निशाणा साधत, तेलंगण सरकारने दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या , आम्ही कर्जमाफी केली, नोकऱ्या दिल्या. ५० हजार नोकऱ्या दिल्या. भाजपाला आव्हान आहे, येऊन मोजा. एक नोकरी तरी कमी दिसली तर मी जाहीर माफी मागतो, असे आव्हान रेवंथ रेड्डी यांनी केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी