शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही; भुजबळांचा जरांगेंना टोला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2024 17:01 IST

सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात उभे आहेत. त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. - भुजबळ

मनोज जरांगे यांनी मराठा आंदोलकांनी कोणाला पाडायचे याची यादी जाहीर केली आहे. यामुळे राज्यातील राजकारणाला वेगळे वळण लागणार आहे. दुसरीकडे ओबीसी आंदोलक देखील १०० च्या वर उमेदवार जाहीर करणार आहेत. अशातच मंत्री छगन भुजबळ यांनी पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही, अशा शब्दांत जरांगे यांच्यावर टोला लगावला आहे. 

बंडखोरी हा निवडणुकीचा एक भाग आहे. जिल्हा परिषद, नगर पालिका यासह सर्वच निवडणुकीत देखील बंडखोरी होत असते. प्रत्येक मतदार संघात महायुती, महाविकास आघाडीत बंडखोरी आहे. सरासरी 30 उमेदवार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात आहेत. उद्या 4 वाजता खरे चित्र स्पष्ट होईल. त्यानंतर खऱ्या अर्थाने निवडणुकीला सुरुवात होईल, असे भुजबळ म्हणाले. 

सर्वच समाजाचे उमेदवार माझ्या विरोधात रिंगणात उभे आहेत. त्यामुळे एकट्या मराठा समाजाला टार्गेट करण्यात काही अर्थ नाही. माझ्या सर्व विकासकामांमध्ये मराठा, दलित, आदिवासी, ओबीसी सर्व समाज सोबत आहेत. सर्वच जाती धर्माचे लोक मला मतदान करतील अशी केलेल्या विकास कामांमुळे मला खात्री आहे. त्यापुढे जावून सर्व पक्षाचे लोक देखील छगन भुजबळ म्हणून मला मतदान करतील असेही भुजबळ म्हणाले. 

जरांगे-झिरवाळ भेटीवर बोलताना भुजबळ म्हणाले की, त्यांना वाटते भेटल्याने आपल्याला फायदा होईल पण आता पूर्वीसारखी कोणाची मक्तेदारी राहिली नाही. आता एका घरात चार वेगवेगळ्या विचाराचे, पक्षाचे लोक काम करत असतात. मतदार हे वैचारिक झाले आहेत. विचारधारा ही पक्षाच्या स्तरावर असते, तिथे सर्व गोष्टी तपासल्या जातात. याचा विचार करून लोक योग्य ठिकाणी मतदान करतात. त्यांना सर्व कळते मत कोणाला दिले पाहिजे, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :Chagan Bhujbalछगन भुजबळManoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४