शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2024 22:22 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls:शरद पवार, अजित पवार, जयंत पाटील, नाना पटोले, प्रकाश आंबेडकर यांना किती टक्के जनतेने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून पसंती दिली आहे?

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Exit Polls: यंदा महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेक कारणांमुळे चांगलीच गाजल्याचे पाहायला मिळाले. मतदानाची प्रक्रिया पार पडली असून, आता संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष २३ नोव्हेंबर रोजी लागणाऱ्या निकालांकडे लागले आहे. मतदान संपताच एकामागोमाग एक असे जवळपास १० एक्झिट पोलचे अंदाज आले. यात बहुतांश एक्झिट पोलमध्ये भाजपाच्या नेतृत्वातील महायुतीचे सरकार येत असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. यानंतर आता अ‍ॅक्सिस माय इंडियाचा एक्झिट पोल आला आहे. यामध्ये महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री म्हणून कोणाला जनतेने पसंती दिली आहे, याबाबतचा एक सर्व्हे समोर आणला आहे. 

१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, महायुतीला १७८ ते २०० जागा मिळू शकतील. तर महाविकास आघाडीला ८२ ते १०२ जागा मिळतील. तर अन्य आणि अपक्षांना ०६ ते १२ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच यामध्ये भाजपाला ९८ ते १०७ जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर शिवसेना शिंदे गटाला ५३ ते ५८ जागा, अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांना २ ते ५ जागा मिळतील, असा अंदाज यात देण्यात आला आहे. महाविकास आघाडीचा विचार केल्यास काँग्रेस मोठा पक्ष ठरेल. काँग्रेसला २८ ते ३६ जागा, शिवसेना ठाकरे गटाला २६ ते ३२ जागा, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २६ ते ३० जागा आणि मविआतील अन्य पक्षांना २ ते ४ जागा मिळतील, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?

CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते

अ‍ॅक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री म्हणून सर्वाधिक मते मिळाली आहेत. एकनाथ शिंदे यांना ३१ टक्के जनतेने पुढचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून किंवा तेच मुख्यमंत्री असावेत, यासाठी कौल दिला आहे. तर, १८ टक्के जनतेने उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असावेत, असे म्हटले आहे. उद्धव ठाकरे या यादीत दुसऱ्या क्रमांकाचे नेते ठरले आहेत. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा मुख्यमंत्री म्हणून १२ टक्के जनतेने पसंती दिलेली आहे. त्यानंतर काँग्रेसमधील कोणताही नेता मुख्यमंत्री म्हणून चालेल, असे मत असणाऱ्यांची संख्या १० टक्के आहे. तर, भाजपामधून अन्य कुणीही मुख्यमंत्री झालेला चालू शकेल, असे ५ टक्के जनतेला वाटते. तसेच मुख्यमंत्री म्हणून शरद पवार यांना ५ टक्के, नितीन गडकरी यांना २ टक्के, अजित पवार यांना २ टक्के, नाना पटोले यांना २ टक्के, पृथ्वीराज चव्हाण यांना एक टक्का, जयंत पाटील यांना एक टक्का मते देण्यात आलेली आहे. 

दरम्यान, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून ३ टक्के लोकांनी पसंती दिली आहे. तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना २ टक्के जनतेने मुख्यमंत्री म्हणून पसंती दिली आहे. तसेच अन्य किंवा सांगता येत नाही, असे म्हणणाऱ्यांची संख्या ६ टक्के असल्याचे अ‍ॅक्सिस माय इंडिया एक्झिट पोलमध्ये सांगण्यात आले आहे. 

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४exit pollमतदानोत्जतर जनमत चाचणीexit pollमतदानोत्तर जनमत चाचणीChief Ministerमुख्यमंत्री