शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 19:21 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेचा समाचार घेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना खुले आव्हान दिल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आव्हान-पलटवार केला जात आहे. यातच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 

प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यातच प्रियंका गांधी यांच्या रोड-शोच्या वेळी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपा कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना कमळ दाखवले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तत्पूर्वी प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत थेट खुले आव्हान दिले आहे. 

एकदा जाहीर करून दाखवा की...

काँग्रेसच्या काळात कपाशीला ८ हजार भाव मिळत होता, आता ६ हजार रुपये मिळतो, तेच सोयाबीनचे झाले आहे. दूध उत्पादक, कांदा उत्पादक अडचणीत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे महाग करुन ठेवली आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला. आपण पुढे जायच्याऐवजी मागे जात आहोत. राहुल गांधी यांनी जातिजनगणना व्हायला हवी, सगळ्यांना न्याय मिळायला हवा, असे म्हटले की, त्यांच्यावर टीका केली जाते. मोदींनी दहा वर्षात काही केले नाही, पण माझ्या भावाने आरक्षणाची मर्यादा हटवणार म्हटले की, त्याला आरक्षणविरोधी ठरविले जाते. तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरुन ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जातिजनगणना करणार असे जाहीर करुन दाखवा, असे खुले आव्हान प्रियंका गांधी यांनी दिले.

दरम्यान, भाजपाने उद्योगपतींची कर्जे माफ केली पण शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, आदिवासींना सोयी सुविधा सवलती मिळाल्या नाहीत. भाजपाकडून छत्रपती शिवरायांचाही अपमान झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पंचसूत्री लागू करु तसेच राज्यातील रिक्त अडील लाख सरकारी जागा भरु, असा शब्द प्रियंका गांधी यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस