शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 19:21 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: राहुल गांधी यांच्यावर भाजपाकडून केल्या जात असलेल्या टीकेचा समाचार घेत प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान मोदींना खुले आव्हान दिल्याचे सांगितले जात आहे.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. विधानसभा निवडणूक २० नोव्हेंबरला होणार आहे तर २३ नोव्हेंबरला महाराष्ट्र विधानसभेचा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. प्रचारासाठी शेवटचे काही तास राहिले आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीचे राज्यातील आणि केंद्रातील नेते जोरदार प्रचार करताना पाहायला मिळत आहे. आव्हान-पलटवार केला जात आहे. यातच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आव्हान दिले आहे. 

प्रियंका गांधी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, काँग्रेससह महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करत आहेत. यातच प्रियंका गांधी यांच्या रोड-शोच्या वेळी भाजपा आणि काँग्रेस कार्यकर्ते आमने-सामने आले. भाजपा कार्यकर्त्यांनी प्रियंका गांधी यांना कमळ दाखवले. यावेळी काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तत्पूर्वी प्रियंका गांधी यांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करत थेट खुले आव्हान दिले आहे. 

एकदा जाहीर करून दाखवा की...

काँग्रेसच्या काळात कपाशीला ८ हजार भाव मिळत होता, आता ६ हजार रुपये मिळतो, तेच सोयाबीनचे झाले आहे. दूध उत्पादक, कांदा उत्पादक अडचणीत आहे. शेतीसाठी लागणाऱ्या वस्तू, औषधे महाग करुन ठेवली आहेत. प्रत्येक गोष्टीवर जीएसटी लावला. आपण पुढे जायच्याऐवजी मागे जात आहोत. राहुल गांधी यांनी जातिजनगणना व्हायला हवी, सगळ्यांना न्याय मिळायला हवा, असे म्हटले की, त्यांच्यावर टीका केली जाते. मोदींनी दहा वर्षात काही केले नाही, पण माझ्या भावाने आरक्षणाची मर्यादा हटवणार म्हटले की, त्याला आरक्षणविरोधी ठरविले जाते. तुम्ही माझ्या भावाला आरक्षण विरोधी म्हणत आहात तर तुम्ही एकदा मंचावरुन ५० टक्के आरक्षणाची मर्यादा तोडणार आणि जातिजनगणना करणार असे जाहीर करुन दाखवा, असे खुले आव्हान प्रियंका गांधी यांनी दिले.

दरम्यान, भाजपाने उद्योगपतींची कर्जे माफ केली पण शेतकऱ्यांची कर्जे माफ केली नाहीत, आदिवासींना सोयी सुविधा सवलती मिळाल्या नाहीत. भाजपाकडून छत्रपती शिवरायांचाही अपमान झाला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यास आम्ही पंचसूत्री लागू करु तसेच राज्यातील रिक्त अडील लाख सरकारी जागा भरु, असा शब्द प्रियंका गांधी यांनी दिला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Priyanka Gandhiप्रियंका गांधीcongressकाँग्रेस