शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

“राहुल गांधी शहरी नक्षलवाद्यांचे समुपदेशन करण्यासाठी महाराष्ट्रात आले”: चंद्रशेखर बावनकुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 13:57 IST

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. राहुल गांधी स्वतःच म्हणालेत की, या देशात आरक्षणाची गरज नाही, असे सांगत चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024: हरियाणातून राहुल गांधी यांना नाकारले. तसेच आता महाराष्ट्रातील जनताही मतदानाच्या माध्यमातून राहुल गांधी यांना नाकारेल, धडा शिकवेल. राहुल गांधी हे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या विरोधात आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर कधी काँग्रेस पक्ष चालला नाही. महाराष्ट्रातील जनता राहुल गांधी यांच्या नौटंकीला आणि विकृत मानसिकतेला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही, या शब्दांत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला. 

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. जाहीरनामे प्रसिद्ध करत आश्वासने दिली जात आहेत. यातच काँग्रेस आणि महाविकास आघाडीही जाहीरनामा प्रसिद्ध करत आहेत. यातच राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांच्या महाराष्ट्र दौऱ्यावरून चंद्रशेखर बावनकुळे यांनी टीका केली.

राहुल गांधी संविधान बचावाचे ढोंग करत आहेत

मीडियाशी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राहुल गांधी संविधान बचावाचे ढोंग करत आहेत. काँग्रेसने बाबासाहेबांना दोन वेळा निवडणुकीत पराभूत केले आहे. काँग्रेसला बाबासाहेबांचे विचार कधीच रुचले नाहीत. राहुल गांधी शहरी नक्षलवादाला पाठिंबा देण्यासाठीच आले आहेत. राष्ट्रविरोधी कारवाया करण्यासाठी, त्यांचे समुपदेशन करण्यासाठीच इथे आले आहेत. प्रसारमाध्यमांना तिथे जाऊ दिले जात नाही. अशा कोणत्या चर्चा तिथे होणार आहेत, ज्या तुमच्यापासून लपवून ठेवल्या जात आहेत, असा प्रश्न चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित केला.

शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत

शहरी नक्षलवादी विचारांचे लोक राहुल गांधींबरोबर आहेत. देवेंद्र फडणवीस बोलले ते खरे आहे. तब्बल १६५ च्या वर शहरी नक्षलवादी विचार असलेल्या संघटना, जनतेच्या मनात देशाबद्दल, समाजाबद्दल द्वेष पसरवणाऱ्या, समाजातील वातावरण गढूळ करणाऱ्या शहरी नक्षलवादी संघटना तयार करण्यात आल्या आहेत. १६५ हून अधिक संघटना कामाला लागल्या आहेत. एका बाजूला संविधानाच्या गोष्टी करायच्या आणि संविधानाने मीडियाला दिलेल्या स्वातंत्र्याचा गळा घोटण्याचे काम करायचे, असे त्यांचे सुरू आहे. ते पुन्हा एकदा जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल गांधी स्वतःच म्हणालेत की, या देशात आरक्षणाची गरज नाही. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान ८० वेळा तोडण्याचे काम त्यांच्याच काँग्रेसने केले आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली. 

दरम्यान, एकीकडे घटनेची प्रत उंचावून दाखवायची आणि दुसरीकडे अराजकतावादी शक्तींच्या पाशात अडकायचे, संविधानाचा आग्रह एकीकडे धरायचा आणि दुसरीकडे या संविधानाला मूठमाती देऊ पाहणाऱ्या शक्तींना गोंजारायचे अशी बेगडी वृत्ती त्यातून दिसते. राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या विचारांना केव्हाच बगल दिली असून ते पूर्णपणे अर्बन नक्षल्यांच्या अविचाराने घेरले गेले आहेत. घटनेची प्रत ते अनेक प्रसंगांमध्ये दाखवतात. नेहमीच्या निळ्या रंगाऐवजी त्या घटनेच्या प्रतीला लाल कव्हर लावलेले असते. अराजकतावादी आणि अर्बन नक्षलवाद्यांनी राहुल गांधी यांना घेरले आहे. त्यांनी भारत जोडो यात्रा काढली तेव्हा असे वाटले होते की चला! काही नाही तर भारत जोडायला तरी निघाले आहेत पण प्रत्यक्षात काय घडले? त्यांच्या यात्रेमध्ये १८० संघटना अशा होत्या, ज्या विध्वंसक मानल्या जातात, हे मी म्हणतो म्हणून नाही तर ते रेकॉर्डवर आहे, या शब्दांत देवेंद्र फडणवीस यांनी निशाणा साधला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Chandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेChandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेRahul Gandhiराहुल गांधी