शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

Maharashtra Assembly: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार का? संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 11:06 IST

'राज्यपाल विद्वान आहेत, पण विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो.'

मुंबईः विधीमंडळाच्या अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजर राहिले. पण, अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. 

'मुख्यमंत्र्यांच सभागृहावर नियंत्रण'आज संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, 'अधिवेशन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री आहेत जिथूनच अधिवेशन नियंत्रित करत आहेत, त्यांचे सभागृहाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष आहे. ते सरकारच्या कामकाजातही सहभागी होत आहेत',अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली. 

'विद्वतेचे अजीर्ण होऊ नये...'विधानसभा अध्यक्षाच्या निवडीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून निशाणा साधला. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. 'राज्यपाल हुशार आहेत, विद्वान आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचे आरोग्य खाते उपचार करायला सक्षम आहे,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी मारला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी