शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
2
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
3
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
4
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
5
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
6
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
7
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
8
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
9
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
10
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
11
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
12
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
13
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
14
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?
15
एअर इंडिया विमान अपघातानंतर टाटा ग्रुपचे ट्विट; आपत्कालीन सेंटर, मदत पथकाची स्थापना
16
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
17
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
18
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
19
Ahmedabad Plane Crash: विमान अपघातानंतर रितेश देशमुख हळहळला, म्हणाला- "मला मोठा धक्का..."
20
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?

Maharashtra Assembly: अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार का? संजय राऊत म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2021 11:06 IST

'राज्यपाल विद्वान आहेत, पण विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो.'

मुंबईः विधीमंडळाच्या अधिनेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. अधिवेशन सुरू होण्याच्या आधीपासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवरुन प्रश्न उपस्थित करण्यात येत होते. प्रकृतीच्या कारणास्तव मुख्यमंत्री अधिवेशनात गैरहजर राहिले. पण, अधिवेशनच्या शेवटच्या दिवशी तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे येतील का? असा प्रश्न शिवसेना नेते संजय राऊत यांना विचारण्यात आला. 

'मुख्यमंत्र्यांच सभागृहावर नियंत्रण'आज संजय राऊत यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. यावेळी त्यांना मुख्यमंत्र्यांच्या अधिवेशनातील उपस्थितीवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले की, 'अधिवेशन चांगल्या पद्धतीने सुरू आहे. आज अधिवेशनाचा अखेरचा दिवस आहे. मुख्यमंत्री आहेत जिथूनच अधिवेशन नियंत्रित करत आहेत, त्यांचे सभागृहाच्या कामकाजावर बारकाईने लक्ष आहे. ते सरकारच्या कामकाजातही सहभागी होत आहेत',अशी प्रतिक्रिया राऊतांनी दिली. 

'विद्वतेचे अजीर्ण होऊ नये...'विधानसभा अध्यक्षाच्या निवडीला राज्यपाल भगत सिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी हरकत घेतल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पत्र लिहून निशाणा साधला. त्यावरही संजय राऊतांनी भाष्य केले. 'राज्यपाल हुशार आहेत, विद्वान आहेत. पण अभ्यास आणि विद्धतेचे अजीर्ण होऊ नये, नाही तर पोटाचा त्रास होतो. सध्या राज्याच्या राजभवनात अभ्यासाचे अजीर्ण झाले आहे. अजीर्ण झालं की पोटाचा त्रास होतो. असा त्रास काही लोकांना होत असेल तर राज्याचे आरोग्य खाते उपचार करायला सक्षम आहे,' असा खोचक टोला संजय राऊत यांनी मारला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतUddhav Thackerayउद्धव ठाकरेbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारी