शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast : मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
3
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
4
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
5
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
6
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
7
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
8
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
9
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
10
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
11
सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या
12
गौतम गंभीरच्या आईला हृदयविकाराचा झटका; इंग्लंड सीरीज सोडून भारतात परतला...
13
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
14
तात्काळ तिकीट बुकिंगचे नियम बदलले! १ जुलैपासून आधारशिवाय तिकीट नाही, असे करा लिंक!
15
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
16
एअर इंडियाच्या क्रॅश झालेल्या विमानाची किंमत किती होती? पहिल्यांदाच बोईंग ड्रिमलायनरचा झाला अपघात
17
अपघातानंतर परिसरातील तापमान 1000 अंशांपर्यंत पोहोचले...कुत्रे-पक्षीही जळून खाक झाले!
18
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
19
Recruitment 2025: भारतीय तटरक्षक दलात दहावी- बारावी उत्तीर्ण उमेदवारांसाठी नोकरी!
20
Wedding Insurance Guide : लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!

Maharashtra: लोकसभेसोबतच होणार महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक? भाजपाने आखली अशी रणनीती 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2023 11:59 IST

Maharashtra Assembly Election : नऊ महिने उलटल्यानंतरही या सरकारला म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाने वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

गतवर्षी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या ४० आमदारांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली होती. तसेच उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील मविआ सरकार कोसळून शिंदे गट आणि भाजपा अशी युती होऊन नवे सरकार स्थापन झाले होते. दरम्यान, नऊ महिने उलटल्यानंतरही या सरकारला म्हणावा तसा जम बसवता आलेला नाही. दरम्यान, महाविकास आघाडीचेही कडवे आव्हान या सरकारसमोर असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर पुढील विधानसभा निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी भाजपाने वेगळी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

दरम्यान, महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक ही पुढील वर्षी एप्रिल-मे महिन्यात होणाऱ्या लोकसभेच्या निवडणुकीसोबतच घेण्याचा विचार भाजपाच्या नेतृत्वाकडून सुरू आहे. राज्यातील विधानसभेची निवडणूक लोकसभेसोबतच घ्यावी असा प्रस्ताव प्रदेश भाजपाने केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवला आहे. आता केंद्रीय नेतृत्वाकडून या प्रस्तावावर विचार सुरू आहे.

राज्यात सत्तांतर झाले असले तरी कोर्टकचेरी आणि रखडलेला मंत्रिमंडळ विस्तार यामुळे नव्या सरकारचा म्हणावा तसा जम अद्याप बसलेला नाही. त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत युती करून स्थापन झालेल्या सरकारच्या कारभाराचा प्रभाव पडण्यास वेळ लागू शकतो, असे प्रदेश भाजपाला वाटते. त्यातच महाविकास आघाडीमधील ठाकरे गट दुबळा झाला असला तरी मविआ म्हणावी तशी दुबळी झालेली नाही. त्यातच आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने जागावाटप निश्चित केल्याचेही वृत्त आहे. त्यामुळे मविआ एकत्र लढल्यास शिवसेना-भाजपाची डोकेदुखी वाढू शकते, असा भाजपाचा अंदाज आहे. त्या पार्श्वभूमीवर लोकसभा निवडणुकीसोबत विधानसभेची निवडणूक घेतल्यास ते अधिक फायदेशीर ठरेल, असे भाजपाला वाटते.

त्याबरोबरच महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक ही लोकसभा निवडणुकीसोबत घेतल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या चेहऱ्याचा मतदारांवर प्रभाव पडेल. तसेच या निवडणुकीत राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांमुळेही मतदारांना प्रभावित करता येईल, असा प्रदेश भाजपाचा होरा आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीसोबतच विधानसभेची निवडणूक लढण्याचा प्रस्ताव देण्यात आला असून, भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वाकडून त्यावर विचार सुरू आहे.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रBJPभाजपाShiv SenaशिवसेनाElectionनिवडणूक