शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:49 IST

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात भाग घेतला.

राज्याचे राजकारण इतके गलिच्छ पद्धतीने सुरु आहे की ७५ वर्षांत एवढे गोंधळाचे राजकारण पहायला मिळाले नाही. विकासावर बोलायचे बाजुलाच राहिले हे लोक हेव्या दाव्यांवर बोलायला लागले आहेत. इगतपुरीचेच उदाहरण बघा ना प्रस्थापित जो आमदार होता त्याने ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारली. आपापल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी हे घाणेरडं राजकारण चालू आहे, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. 

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात भाग घेतला. यावेळी त्यांनी महायुती आणि मविआमध्ये सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा उल्लेख केला. काय चाललय हे सगळं ? दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी. हे सर्व पुसून काढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले. 

सुसंस्कृत, सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्त्व आसलेल्या डॉ. शरद तळपाडे याना आम्ही उमेदवारी दिली आहे. आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याबरोबर आपल्या मतदार संघातील प्रश्न ते विधानसभेत चांगल्या प्रकारे मांडू शकतील. इगतपुरीत प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले नाहीत. इथे रोजगार व चांगल्या शिक्षण संस्था नाहीत. हा आदिवासी बहुल भाग आहे बहुजन समाजही आहे. त्यांचा फायदा घ्यायचा मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी असे इथून पुढे चालणार नाही, असे संभाजी राजे म्हणाले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४igatpuri-acइगतपुरी