शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
5
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
6
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
7
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
8
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
9
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
10
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
11
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
12
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
13
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
14
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
15
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
16
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
17
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग
18
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
19
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
20
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  

दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी, काय चाललेय? यांना महाशक्तीच पर्याय; संभाजी राजेंची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2024 16:49 IST

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात भाग घेतला.

राज्याचे राजकारण इतके गलिच्छ पद्धतीने सुरु आहे की ७५ वर्षांत एवढे गोंधळाचे राजकारण पहायला मिळाले नाही. विकासावर बोलायचे बाजुलाच राहिले हे लोक हेव्या दाव्यांवर बोलायला लागले आहेत. इगतपुरीचेच उदाहरण बघा ना प्रस्थापित जो आमदार होता त्याने ह्या पक्षातून त्या पक्षात उडी मारली. आपापल्या खुर्च्या सांभाळण्यासाठी हे घाणेरडं राजकारण चालू आहे, असे संभाजी राजे छत्रपती म्हणाले. 

स्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संभाजी राजे यांनी आज नाशिक जिल्ह्यामध्ये तिसऱ्या आघाडीच्या प्रचारात भाग घेतला. यावेळी त्यांनी महायुती आणि मविआमध्ये सुरु असलेल्या घाणेरड्या राजकारणाचा उल्लेख केला. काय चाललय हे सगळं ? दोन शिवसेना, दोन राष्ट्रवादी. हे सर्व पुसून काढण्यासाठी परिवर्तन महाशक्ती हाच पर्याय आहे, असे ते म्हणाले. 

सुसंस्कृत, सुशिक्षित अभ्यासू व्यक्तिमत्त्व आसलेल्या डॉ. शरद तळपाडे याना आम्ही उमेदवारी दिली आहे. आपल्या भागाचा विकास कसा करता येईल याबरोबर आपल्या मतदार संघातील प्रश्न ते विधानसभेत चांगल्या प्रकारे मांडू शकतील. इगतपुरीत प्राथमिक आरोग्य केंद्र चांगले नाहीत. इथे रोजगार व चांगल्या शिक्षण संस्था नाहीत. हा आदिवासी बहुल भाग आहे बहुजन समाजही आहे. त्यांचा फायदा घ्यायचा मोठ मोठ्या पुढाऱ्यांनी असे इथून पुढे चालणार नाही, असे संभाजी राजे म्हणाले. 

टॅग्स :Sambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४igatpuri-acइगतपुरी