शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 21:19 IST

Narendra Modi Speech on Maharashtra Victory: छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत, असे नरेंद्र मोदी म्हणाले.

महाराष्ट्रात विभाजनवादी शक्तींचा पराभव. मी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची स्तुती करतो. महाराष्ट्रात सुशासनाचा, सत्याचा विजय झाला आहे. देशात अन्य ठिकाणी देखील पोटनिवडणुका झाल्या. सर्वच राज्यांत भाजपाला मोठे यश मिळाले आहे. देश फक्त आणि फक्त विकासाची मागणी करत आहे. मी देशाच्या जनतेला नमस्कार करतो. मी झारखंडच्या जनतेलाही नमस्कार करतो. झारखंडच्या वेगाने विकास करण्यासाठी आम्ही आणखी ताकदीने काम करणार. भाजपाचा एकेक कार्यकर्ता काम करणार, असल्याचे मोदी यांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राने तुष्टीकरणाचा सामना कसा करायचा हे आज दाखवून दिले. शाहू महाराज, महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर, बाळासाहेब ठाकरे अशा महान व्यक्तीमत्वांच्या भूमीने जुने सर्व रेकॉ़र्ड तोडले आहेत. गेल्या ५० वर्षांत कोणत्याही पक्षाला किंवा कोणत्याही आघाडी-युतीसाठी हा सर्वात मोठा विजय आहे, असे मोदी म्हणाले.  

सतत तिसऱ्यांदा भाजपाच्या नेतृत्वात कोणत्या युतीला विजयी केले. तसेच भाजपा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष बनण्याची सलग तिसरी वेळ आहे. महाराष्ट्र देशातील सहावे राज्य आहे ज्याने भाजपाला सतत तीनवेळा जनादेश दिला आहे. यापूर्वी गोवा, गुजरात, छत्तीसगढ, हरियाणा आणि मध्य प्रदेशात सतत तीनवेळा जिंकलो आहोत. बिहारमध्येही एनडीएला तीनवेळा जनादेश मिळाला आहे. आणि ६० वर्षांनी तुम्ही मला तिसऱ्यांदा संधी दिली, असे मोदी म्हणाले. 

या जनतेची सेवा करण्यात कोणतीही कसर बाकी ठेवली जाणार नाही. सतत तिसऱ्यांदा स्थिरतेला निवडणे महाराष्ट्राच्या जनतेच्या सामंजस्यातून दिसते. मध्ये काही लोकांनी धोकेबाजी करून अस्थिरता निर्माण केली. महाराष्ट्राने त्यांना नाकारले आहे. त्याची शिक्षा त्यांना संधी मिळताच जनतेने दिली आहे. या जनतेने जे दिलेय ते विकसित भारतासाठी मोठा आधार ठरणार आहे. हरियाणानंतर महाराष्ट्राच्या जनतेने एकजुटतेचा संदेश दिला आहे, असे मोदी म्हणाले. 

काँग्रेस आणि त्यांच्या साथीदारांच्या कटाला या राज्याने एक है तो सेफ हैने उत्तर दिले. जाती धर्म भाषा आणि क्षेत्राच्या नावावर लढविणाऱ्या लोकांना चांगला धडा शिकविला आहे. आदिवासींनी, ओबीसी, दलितांनी भाजपाला मतदान केले. आमच्या सरकारने मराठीला सांस्कृतीक भाषेचा दर्जा दिला. मातृभाषेचा सन्मान आमच्या संस्कारात आहे, असे मोदी म्हणाले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024 resultमहाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४