शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
2
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
3
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
4
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
5
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
6
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
7
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
8
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
9
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
10
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
11
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
12
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
13
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
14
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
15
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
16
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
17
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले
18
आयुष्य कसं वळणं घेईल? काहीच सांगता येत नाही; एक स्वप्न तुटलं, सोनम राजला भेटली अन्...! मग त्याच्यासाठी केलं एवढं मोठं कांड!
19
'...तर पाकिस्तानात घुसून हल्ला करू', परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचा पाकिस्तानला थेट इशारा
20
Video - "हनिमूनवरुन जिवंत परतणं ही मोठी कामगिरी..."; सोनम-राजा प्रकरणावर मीम्स व्हायरल

मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. 

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली होती. तेव्हापासून मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, फोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असं सातत्याने म्हटलं जातंय. दरम्यान, राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे. 

राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? असा प्रश्न आज एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ''शरद पवार , कारण याची सुरुवात त्यांनी १९७८ मध्ये केली नसती तर हा उद्योग कुणाला सुचला नसता. जे १९७८ मध्ये त्यांनी केलं. १९९२ मध्ये त्यांनी केलं. नारायण राणेंच्या वेळी त्यांनी केलं. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते. ते बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी हात वर केले. म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले, असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलंय'', असा दावा राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना तुम्ही विचारा की, तुमचं जर चार भिंतींच्या आड काही बोलणं झालं असेल तर ते तेव्हाच का नाही सांगितले. अमित शाह म्हणतात की, मी असं बोललोच नाही. माझा उद्धव ठाकरे आणि अमित शाह दोघांवरही विश्वास नाही. तुम्ही युतीमध्ये होता. एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी बहुमत दिलं. तुमचे सुमारे १६० आमदार निवडून आले. त्यानंतर तुम्ही सांगता की, आता यांनी आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. ते म्हणतात आम्ही असा शब्द दिलेलाच नाही. ज्यावेळी पंतप्रधान तुमच्यासमोर येऊन आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे हे सांगत होते, तेव्हाच तुम्ही आक्षेप का नाही घेतलात. त्याचवेळी अमित शाह यांनी दिलेल्या वचनाची चर्चा का सुरू झाली नाही. ज्यावेळी आमच्याशिवाय सरकार बनू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना  झाली. त्यावेळी त्यांनी ही चर्चा सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसे