शहरं
Join us  
Trending Stories
1
Bacchu Kadu Morcha: मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार, पण नागपुरातील आंदोलन सुरूच राहणार; हायकोर्टाच्या आदेशानंतर काय काय घडलं?
2
हद्दच झाली! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वाक्षरीचे बनावट पत्र केले सादर, आरोपी कोण?
3
मोठी बातमी!बच्चू कडूंना पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील नागपूरकडे रवाना
4
आमदार अनिल कुमार यांच्यावर दगडफेक, दगड-विटा मारत गाड्या फोडल्या; प्रचारादरम्यान घडली घटना
5
इंग्लंडचा खेळ खल्लास! दक्षिण आफ्रिकेच्या संघानं पहिल्यांदाच वर्ल्ड कप फायनल गाठत रचला इतिहास
6
Bacchu Kadu Morcha: मंत्री बच्चू कडूंच्या भेटीला, भरपावसात रस्त्यावरच चर्चा; आंदोलनाबद्दल काय ठरलं?
7
Nilesh Ghaiwal: गँगस्टर निलेश घायवळ 'भू-माफियाही'; ३ वर्षांत जमवली ५८ एकर जमीन
8
योगी सरकारच्या सहकार्याने, उत्तर प्रदेशातील गावा-गावात परिवर्तनाची मशाल पेटवत आहेत 'चेंजमेकर्स'!
9
भारत-चीन सीमा वाद सुटला? लष्करी कमांडर्सच्या बैठकीत दोन्ही देशांचं एकमत; 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर सहमती
10
Sudhir Dalvi: 'साई बाबा' फेम ज्येष्ठ अभिनेते सुधीर दळवी यांची प्रकृती गंभीर; उपचारासाठी १५ लाखांची गरज, मदतीचं आवाहन
11
"ना बिहारमध्ये CM पद, ना दिल्लीत PM पद खाली..."; सोनिया गांधी अन् लालू यादव यांचं नाव घेत अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी!
12
Phaltan Doctor: डॉक्टर तरुणीने प्रशांत बनकरला लटकलेल्या ओढणीसह पाठवला होता फोटो
13
फलटण महिला डॉक्टर मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; मेहबुब शेख यांना मिळालं ३ पानी पत्र, काय लिहिलंय?
14
शेतकऱ्यांचा मोठा आक्रोश! "सुरुवात फडणवीसांनी केली, शेवट आम्ही करणार, आम्हाला जेलमध्ये टाका"
15
"मुंबईतील आंदोलन, जरांगे पाटलांवर कोर्टाच्या माध्यमातून दबाव आणला, तोच पॅटर्न..."; अजित नवलेंचा गंभीर आरोप
16
शेतकऱ्यांची एकजूट! नागपूर आंदोलनासाठी मनोज जरांगेंनी रद्द केली २ नोव्हेंबरची बैठक
17
Most Sixes in T20: टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार, सूर्यकुमारची टॉप-५ मध्ये एन्ट्री, हिटमॅनचा जलवा!
18
Womens World Cup 2025: दक्षिण आफ्रिकेनं उभारली विक्रमी धावसंख्या! इंग्लंडवर दुसऱ्यांदा ओढावली नामुष्की
19
'मोदीजी मतांसाठी स्टेजवर येऊन डान्सही करतील...!', बिहारमध्ये राहुल गांधींचा हल्लाबोल; 'लोकल...', म्हणत भाजपचाही पलटवार
20
ऑफिसमधील महिला मुंबईत आली, व्यवस्थापकाने जेवायला घरी नेले अन् बलात्कार केला; पत्नीने बनवला व्हिडीओ

मागच्या ५ वर्षांत महाराष्ट्रातील राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? राज ठाकरेंनी दोन शब्दात दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 15:41 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केली आहे. 

२०१९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या निकालांनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक नाट्यमय घडामोडींची मालिका सुरू झाली होती. तेव्हापासून मागच्या पाच वर्षांत राज्याच्या राजकारणामध्ये अनेक उलथापालथी घडल्या आहे. बदललेली राजकीय समीकरणं, फोडाफोडी यामुळे राज्याच्या राजकारणाचा चिखल झाला आहे, असं सातत्याने म्हटलं जातंय. दरम्यान, राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला शरद पवार हेच जबाबदार आहेत, अशी टीका मनसेप्रमुखराज ठाकरे यांनी केली आहे. 

राज्याच्या राजकारणात झालेल्या चिखलाला जबाबदार कोण? असा प्रश्न आज एबीपी माझाच्या विशेष कार्यक्रमात राज ठाकरे यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले की, ''शरद पवार , कारण याची सुरुवात त्यांनी १९७८ मध्ये केली नसती तर हा उद्योग कुणाला सुचला नसता. जे १९७८ मध्ये त्यांनी केलं. १९९२ मध्ये त्यांनी केलं. नारायण राणेंच्या वेळी त्यांनी केलं. नारायण राणे हे आधी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाणार होते. ते बाहेर पडल्यावर शरद पवार यांनी हात वर केले. म्हणून ते काँग्रेसमध्ये गेले, असं खुद्द शरद पवार यांनी सांगितलंय'', असा दावा राज ठाकरे यांनी केला. यावेळी राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना तुम्ही विचारा की, तुमचं जर चार भिंतींच्या आड काही बोलणं झालं असेल तर ते तेव्हाच का नाही सांगितले. अमित शाह म्हणतात की, मी असं बोललोच नाही. माझा उद्धव ठाकरे आणि अमित शाह दोघांवरही विश्वास नाही. तुम्ही युतीमध्ये होता. एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी बहुमत दिलं. तुमचे सुमारे १६० आमदार निवडून आले. त्यानंतर तुम्ही सांगता की, आता यांनी आम्हाला अडीच वर्षांसाठी मुख्यमंत्रिपदाचा शब्द दिला होता. ते म्हणतात आम्ही असा शब्द दिलेलाच नाही. ज्यावेळी पंतप्रधान तुमच्यासमोर येऊन आमचा पुढचा मुख्यमंत्री कोण आहे हे सांगत होते, तेव्हाच तुम्ही आक्षेप का नाही घेतलात. त्याचवेळी अमित शाह यांनी दिलेल्या वचनाची चर्चा का सुरू झाली नाही. ज्यावेळी आमच्याशिवाय सरकार बनू शकत नाही याची जाणीव उद्धव ठाकरे यांना  झाली. त्यावेळी त्यांनी ही चर्चा सुरू केली. याला भूमिका बदलणं म्हणतात, असा टोला राज ठाकरे यांनी लगावला.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Raj Thackerayराज ठाकरेSharad Pawarशरद पवारMNSमनसे