शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 07:59 IST

Maharashtra Assembly Election 2024: रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

मुंबई : रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालकपदावरून उचलबांगडी होण्यासाठी अहिल्यानगरचे प्रकरण कारणीभूत ठरल्याचे सांगितले जात आहे.

अहिल्यानगरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांची कन्या जयश्री थोरात यांच्याविरोधात भाजपचे नेते आणि विखे-पाटील समर्थक वसंत देशमुख यांनी जाहीर भाषणात अपशब्द वापरले होते. याप्रकरणी जयश्री थोरात यांनी पोलीस ठाण्यावर मोर्चा काढत कारवाईची मागणी केली. मात्र पोलिसांनी जयश्री आणि सोबतच्या महिलांना बराच काळ ठाण्याबाहेर थांबवले. तसेच जयश्री यांच्याविरोधातच गुन्हा दाखल केला. याप्रकरणी विरोधकांनी पोलिसांवर पक्षपातीपणाचा आरोप केल्यानंतर निवडणूक आयोगाने दीपक मिश्रा, बी. आर. बालकृष्णन व राम मोहन मिश्रा या तीन वरिष्ठ अधिकाऱ्यांना तेथे निरीक्षक म्हणून पाठवले. या अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून याप्रकरणी राज्य पातळीवरून दबाव आल्याचे नमूद केले होते.

फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर चर्चेत ■ शुक्ला यांच्यावर विरोधकांनी फोन टेंप केल्याचा आरोप सातत्याने केला आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा फोन टॅप केल्याच्या आरोपांनंतर शुक्ला चर्चेत आल्या होत्या.• राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी शुक्ला अवैध फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप केला होता.• त्यामुळे निवडणुकीच्या काळात अशा व्यक्तीने राज्याच्या पोलीस महासंचाल कपदी राहू नये अशी मागणी काँग्रेस- कडून करण्यात आली होती.

मुदतवाढीतही अपवाद सहा महिन्यांपेक्षा कमी काळ शिल्लक असताना शुक्ला यांना २ वर्षे मुदतवाढ दिली. एखाद्या महासंचालकाला किमान सहा महिने निवृत्तीसाठी शिल्लक असतील तर दोन वर्षे मुदतवाढीचा लाभ मिळू शकतो. शुक्ला मात्र त्यास अपवाद ठरल्या होत्या. मविआने याबाबत आक्षेप घेतला होता.

नवे पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या जागी आलेले नवे पोलिस महासंचालक संजय वर्मा हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून ते १९९० च्या तुकडीचे महाराष्ट्र कॅडरचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते राज्याच्या कायदा आणि तंत्रज्ञान विभागाचे महासंचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे तीन दशकाहून अधिक काळ पोलीस सेवेत काम करण्याचा अनुभव आहे. वर्मा न्यायवैद्यक विज्ञानातील त्यांच्या कौशल्यांसाठी ओळखले जातात. माझ्यावर जो विश्वास दाखवून जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल आभारी आहे. राज्यातील निवडणुका शांततापूर्ण मार्गाने पार पडतील या दृष्टीने काटेकोर नियोजन करण्यात येईल, असे संजय वर्मा यांनी सांगितले.

टॅग्स :Rashmi Shuklaरश्मी शुक्लाPoliceपोलिसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४