शहरं
Join us  
Trending Stories
1
"बंकरमध्येच थांबा..."; पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात भीतीचं वातावरण, सीमेवरही सैनिक वाढवले
2
"अष्टभुजा शक्तीने राक्षसांचा सर्वनाश व्हायला हवा...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
3
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
4
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
5
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
6
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
7
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
8
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
9
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
10
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
11
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
12
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
13
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
14
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
15
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
16
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
17
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
18
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
19
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
20
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव

घासून निघालेल्या जागांचे काय? पाच हजार मताधिक्यांच्या आतील ३७ मतदारसंघांचे निकाल ठरणार अधिक महत्त्वाचे

By यदू जोशी | Updated: October 19, 2024 11:26 IST

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी  लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत.

यदु जोशी -

मुंबई : विधानसभेच्या २०१९ मधील निवडणुकीत ३७ विधानसभा मतदारसंघांतील विजयी उमेदवारांचे मताधिक्य हे पाच हजारहून कमी होते. यावेळी हे मतदारसंघ कोणाला साथ देतात हे महत्त्वाचे असेल. घासून आलेल्या जागांवरील निकाल एकूणच जय-पराजयासाठी निर्णायक ठरतील.

२०१९ मध्ये भाजप-शिवसेना युती विरुद्ध काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी अशी  लढत झाली होती. या ३७ मतदारसंघांपैकी काही मतदारसंघांमध्ये बरेच उलटफेर झाले आहेत. गेल्यावेळी आमने-सामने असलेले दोघेही आज महायुतीत किंवा महाविकास आघाडीत आहेत. युती वा आघाडीला बंडखोरीचा फटका कमी मताधिक्याने निकाल दिलेल्या मतदारसंघात बसू शकतो. कमी फरकाने जिंकलेले आणि हरलेले दोघेही महायुतीत वा महाविकास आघाडीत आहेत, अशा ठिकाणी बंडखोरीची शक्यता अधिक असेल. 

५ उमेदवार एक हजारापेक्षाही कमी मतांनी झाले होते विजयी४ उमेदवारांना मिळाले होते एक ते दोन हजार दरम्यानचे मताधिक्य   १२ उमेदवारांचे मताधिक्य होते दोन हजार ते तीन हजार दरम्यान ८ उमेदवारांचे मताधिक्य होते तीन हजार ते चार हजार दरम्यान ८ उमेदवारांनी चार ते पाच हजार दरम्यानचे मताधिक्य घेत गाठली होती विधानसभा 

समीकरणे बदलली, चुरस वाढली सर्वात कमी मतांनी जिंकलेले शिवसेनेचे दिलीप लांडे आता शिंदेसेनेत आहेत. आता तेच शिंदेसेनेचे म्हणजे महायुतीचे उमेदवार असतील असे चित्र आहे. गेल्यावेळी त्यांच्याकडून पराभूत झालेले माजी मंत्री नसीम खान (काँग्रेस) हे आता उद्धवसेनेचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीत आहेत. त्यांना उमेदवारी मिळाली तर उद्धवसेना त्यांच्या प्रचारात उतरेल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगावमध्ये मोठा पेच आहे. गेल्यावेळी तिथे भाजपचे राजकुमार बडोले यांचा राष्ट्रवादीच्या मनोहर चंद्रिकापुरे यांनी ७१८ मतांनी पराभव केला होता. चंद्रिकापुरे आता अजित पवार गटात आहेत आणि ते महायुतीचा भाग आहेत. त्यामुळे उमेदवारीवरून तिथे नाराजीनाट्य रंगू शकते. कोपरगावमध्ये जिंकलेले राष्ट्रवादीचे आशुतोष काळे (आता अजित पवार गट) आणि पराभूत झालेल्या स्नेहलता कोल्हे (भाजप) हे दोघेही आता महायुतीचा भाग आहेत. तिथेही संघर्षाची चिन्हे आहेत.माळशिरसमध्ये गेल्यावेळी भाजपचे राम सातपुते केवळ २,५९० मतांनी जिंकले होते. त्यावेळी मोहिते पाटील घराणे त्यांच्या पाठीशी होते. आता हे घराणे भाजपच्या विरोधात आणि शरद पवार यांच्यासोबत आहे. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४PoliticsराजकारणElectionनिवडणूक 2024