शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 17:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या सूचनेनंतर घेण्यात आला आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. फडणवीसांविरोधात कट रचला जात असल्याची सूचना गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय गुप्तचर विभागाने राज्य तपास यंत्रणांना हा अलर्ट दिला. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झालं आहे. फडणवीसांच्या जीवाचा धोका असल्याचं कळताच त्यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यात गुप्तचर विभागाकडून आलेल्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई, नागपूर निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यक्रमांना ही सुरक्षा दिली जाईल. 

राज्यात दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पाहता मुंबई पोलिसांनी हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहेत. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या अलर्टनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. 

संजय राऊतांची फडणवीसांवर खोचक टीका

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्‍यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसाठी लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावर केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा