शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

देवेंद्र फडणवीसांच्या सुरक्षेत अचानक वाढ, तपास यंत्रणा अलर्ट; नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 17:31 IST

विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय केंद्रीय गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या सूचनेनंतर घेण्यात आला आहे. 

मुंबई - महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. त्यात अचानक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय गुप्तचर यंत्रणेच्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेसाठी अतिरिक्त फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभागाने दिली. फडणवीसांविरोधात कट रचला जात असल्याची सूचना गुप्तचर विभागाला मिळाल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय गुप्तचर विभागाने राज्य तपास यंत्रणांना हा अलर्ट दिला. त्यामुळे राज्य पोलीस दल सतर्क झालं आहे. फडणवीसांच्या जीवाचा धोका असल्याचं कळताच त्यांची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली आहे. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होईल. त्यात गुप्तचर विभागाकडून आलेल्या सूचनेनंतर फडणवीसांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबई, नागपूर निवासस्थानी आणि त्यांच्या कार्यक्रमांना ही सुरक्षा दिली जाईल. 

राज्यात दसऱ्याच्या दिवशी बाबा सिद्दीकी यांची हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येचे धागेदोरे लॉरेन्स बिश्नोई गँगशी जोडले आहेत. सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पाहता मुंबई पोलिसांनी हायप्रोफाईल लोकांच्या सुरक्षेचा आढावा घेतला आहे. अशावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत फोर्स वनचे १२ जवान तैनात करण्यात आले आहेत. याआधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना झेड प्लस सुरक्षा दिली होती. त्यानंतर आता सुरक्षा यंत्रणेकडून मिळालेल्या अलर्टनंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. 

संजय राऊतांची फडणवीसांवर खोचक टीका

दरम्यान, राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सुरक्षेत वाढ झाल्याचं कळालं, हे धक्कादायक आणि चिंतेची बाब आहे. राज्याच्या गृहमंत्र्यांना स्वत:ची सुरक्षा स्वत:चाच वाढवावी लागली. फोर्स वनचे जवान त्यांच्या घराला गराडा घालून बसलेत. हा काय प्रकार आहे..? राज्याचा गृहमंत्री सुरक्षित नाही. या राज्यात कायदा सुव्यवस्था नाही किंवा अघटित घडू शकेल का अशी चिंता आहे. फडणवीसांना कुणापासून धोका आहे. ते राज्याचे गृहमंत्री, नक्की कोणापासून सुरक्षा हवी, मुख्यमंत्र्‍यांपासून धोका आहे का...भविष्यात मुख्यमंत्रि‍पदासाठी जो संघर्ष आहे तो पुढच्या १५ दिवसांत वाढणार आहे. फोर्स वन दहशतवाद्यांसाठी लढण्यासाठी स्थापन केला होता. त्या फोर्स वनचे जवान सुरक्षेत तैनात आहेत. फडणवीसांनी ज्यांना आश्वासने दिली ते हल्ला करणार आहेत, युक्रेन हल्ला करणार, रशिया करणार नेमकं काय झालंय असा खोचक सवाल ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी फडणवीसांची सुरक्षा वाढवण्यावर केला. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSanjay Rautसंजय राऊतBJPभाजपा