शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज

By यदू जोशी | Updated: November 7, 2024 07:05 IST

Maharashtra Assembly Election 2024: लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे.

- यदु जोशीमुंबई - लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे. निवडणुकीनंतर या घोषणांची अंमलबजावणी करायची तर राज्यावरील आर्थिक भार  वाढणार आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार सभांमधून आणि जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोफत घोषणांचा पाऊस पाडणे सुरू केले आहे.  लोकानुनय करणाऱ्या घोषणांवर खर्च करण्याऐवजी उत्पादक खर्चाकडे राज्यांचा कल असावा असे १५ व्या वित्त आयोगाने स्पष्ट म्हटले आहे. मात्र, सत्ताकारणाला प्राधान्य असलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी या सूचनेकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा अनुभव आहे. उत्पादक कामांवर खर्च केला तर त्यातून निर्माण झालेल्या सुविधांद्वारे राज्याच्या उत्पन्नात वाढ होते, पण लोकानुनय हाच उद्देश असलेल्या योजना मोफत राबविल्या जातात आणि राज्याचे उत्पन्न वाढण्यासाठी त्याचा काहीएक उपयोग होत नाही असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

भांडवली खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्केच  राज्याचा भांडवली खर्च हा एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्के इतकाच आहे. त्यातून आपण कर्ज आणि त्यावरील व्याज फेडतो. प्रत्यक्ष उत्पादक कामांवरील खर्चासाठी फारच कमी पैसा हातात उरतो. भांडवली खर्चासाठीच्या राखीव पैशांतून कर्ज फेडावे लागते अशी अवस्था आहे. 

दोन दिवसांत पडलेला मोफत घोषणांचा सर्वपक्षीय पाऊस- महिलांना दरमहा ३ हजार रु. देणार, महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रु. - महाविकास आघाडी- लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रु. देणार -   एकनाथ शिंदे- जीवनावश्यक पाच वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार - एकनाथ शिंदे/उद्धव ठाकरे- १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रु. विद्यावेतन देणार - एकनाथ शिंदे-मुलांना मोफत शिक्षण देणार - उद्धव ठाकरे-लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रु., धान उत्पादकांना २५ हजार रु. बोनस, विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर- अजित पवार..तर असेल कर्जाचाच आधारराज्याची राजकोषीय तूट १ लाख ९० हजार कोटी रुपये इतकी आहे. ती भरून काढायची तर कर्जाचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यातच महायुती सरकारने जाता-जाता १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडेल अशा मोफत घोषणा केलेल्या आहेत. त्यासाठीची तरतूदही आगामी काळात करावी लागणार आहे. कोणतेही सरकार आले तरी लोकानुनयाच्या घोषणा रद्द केल्यास लोकांचा रोष ओढावेल, या भीतीने अशा घोषणा रद्द होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जाते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी