शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

‘मोफत’ घोषणांचा सपाटा; वित्तीय भार पेलणार कसा? राज्यावर आताच आहे साडेसात लाख कोटींचे कर्ज

By यदू जोशी | Updated: November 7, 2024 07:05 IST

Maharashtra Assembly Election 2024: लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे.

- यदु जोशीमुंबई - लाडकी बहीण योजनेमुळे राज्यातील अन्य विकासकामांसाठी निधी मिळत नसल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून सातत्याने होत असताना उद्याच्या विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने सर्वच मोठ्या पक्षांनी मोफत घोषणांचा सपाटा लावला आहे. निवडणुकीनंतर या घोषणांची अंमलबजावणी करायची तर राज्यावरील आर्थिक भार  वाढणार आहे. 

महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रचार सभांमधून आणि जाहीरनामा प्रसिद्ध करताना मोफत घोषणांचा पाऊस पाडणे सुरू केले आहे.  लोकानुनय करणाऱ्या घोषणांवर खर्च करण्याऐवजी उत्पादक खर्चाकडे राज्यांचा कल असावा असे १५ व्या वित्त आयोगाने स्पष्ट म्हटले आहे. मात्र, सत्ताकारणाला प्राधान्य असलेल्या सर्वपक्षीय राज्यकर्त्यांनी या सूचनेकडे वेळोवेळी दुर्लक्ष केल्याचा अनुभव आहे. उत्पादक कामांवर खर्च केला तर त्यातून निर्माण झालेल्या सुविधांद्वारे राज्याच्या उत्पन्नात वाढ होते, पण लोकानुनय हाच उद्देश असलेल्या योजना मोफत राबविल्या जातात आणि राज्याचे उत्पन्न वाढण्यासाठी त्याचा काहीएक उपयोग होत नाही असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे.

भांडवली खर्च एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्केच  राज्याचा भांडवली खर्च हा एकूण अर्थसंकल्पाच्या केवळ १० टक्के इतकाच आहे. त्यातून आपण कर्ज आणि त्यावरील व्याज फेडतो. प्रत्यक्ष उत्पादक कामांवरील खर्चासाठी फारच कमी पैसा हातात उरतो. भांडवली खर्चासाठीच्या राखीव पैशांतून कर्ज फेडावे लागते अशी अवस्था आहे. 

दोन दिवसांत पडलेला मोफत घोषणांचा सर्वपक्षीय पाऊस- महिलांना दरमहा ३ हजार रु. देणार, महिलांना मोफत प्रवास, शेतकऱ्यांना तीन लाखापर्यंत कर्जमाफी, बेरोजगारांना दरमहा ४ हजार रु. - महाविकास आघाडी- लाडक्या बहिणींना १५०० ऐवजी २१०० रु. देणार -   एकनाथ शिंदे- जीवनावश्यक पाच वस्तूंचे दर पाच वर्षे स्थिर ठेवणार - एकनाथ शिंदे/उद्धव ठाकरे- १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रु. विद्यावेतन देणार - एकनाथ शिंदे-मुलांना मोफत शिक्षण देणार - उद्धव ठाकरे-लाडक्या बहिणींना दरमहा २१०० रु., धान उत्पादकांना २५ हजार रु. बोनस, विद्यार्थ्यांना मासिक विद्यावेतन, ४४ लाख शेतकऱ्यांना मोफत वीज, ५२ लाख कुटुंबांना तीन मोफत गॅस सिलिंडर- अजित पवार..तर असेल कर्जाचाच आधारराज्याची राजकोषीय तूट १ लाख ९० हजार कोटी रुपये इतकी आहे. ती भरून काढायची तर कर्जाचाच आधार घ्यावा लागणार आहे. त्यातच महायुती सरकारने जाता-जाता १ लाख १२ हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त भार राज्याच्या तिजोरीवर पडेल अशा मोफत घोषणा केलेल्या आहेत. त्यासाठीची तरतूदही आगामी काळात करावी लागणार आहे. कोणतेही सरकार आले तरी लोकानुनयाच्या घोषणा रद्द केल्यास लोकांचा रोष ओढावेल, या भीतीने अशा घोषणा रद्द होण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हटले जाते.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी