शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यासाठी १०० अन् कॉफीसाठी ७०० रुपये घेतल्यास मल्टिप्लेक्स बंद होतील : सुप्रीम कोर्ट
2
हरयाणा निवडणुकांत चोरी, २५ लाख बनावट मतदार; राहुल गांधींनी काढली ‘एच फाइल’
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
आचारसंहिता लागू तरीही सरकारला ४ दिवस घेता येणार धोरणात्मक निर्णय; आयोगाची पूर्वपरवानगी हवी
5
‘मोनो रेल’ला पुन्हा अपघात; तीन कर्मचारी जखमी; चाचणी करताना नवी गाडी बिमवरून घसरली
6
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
7
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
8
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
9
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
10
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
11
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
12
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
13
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
14
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
15
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
16
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
17
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
18
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
19
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
20
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:09 IST

माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील राजकारणात २०१९ नंतर बरीच उलथापालथ झाली. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. २०२२ मध्ये शिवसेनेतील एक गट भाजपासोबत आला. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र पक्षाने धक्कातंत्र वापरत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांना शपथ घेण्याची सूचना केली. यात पक्षाने तुमच्यावर अन्याय केला का, असा प्रश्न मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. तेव्हा पक्षाने माझ्यावर अन्याय केला असं कधी वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामागचं कारणही सांगितलं.

मुलाखतीत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कोण होता, एक साधा कार्यकर्ता होता. ज्याला पक्षाने नगरसेवक केलं, महापौर केलं, आमदार केलं, मुख्यमंत्री केलं, त्यानंतर विरोधी पक्षनेता केलं, उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसला पक्षाने खूप काही दिले आहे. त्या-त्या वेळेला परिस्थिती पाहून पक्षासाठी दोन पावलं मागे जाणं किंवा पक्षाने सांगितलेली भूमिका स्वीकारणं यात कुठलाही अन्याय नाही. आज मी मोठा होऊ शकलो, चार लोक मला ओळखतात हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे. हा पक्ष माझ्या पाठीशी नसता तर नागपूरातील एखादा वकील म्हणून मला फार तर मला ओळख मिळाली असती, असं त्यांनी सांगितले.  लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि वरिष्ठ सहायक संपादक यदू जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री झालो असतो तर...

मी सुरुवातीला पक्षाला सांगितले होते, आपण जे काही परिवर्तन करतोय त्यात मला सत्तेबाहेर राहू द्या. त्यामागे माझी भूमिका अशी होती की, लोकांना काय सांगायचे? कालपर्यंत मुख्यमंत्री राहिला आणि सत्तेसाठी हा उपमुख्यमंत्रिपद घेतोय. या माणसाला सत्तेपलीकडे काहीच नाही, याचं माझ्यावर मानसिक दडपण होते. पक्षाने मला परवानगीही दिली होती. पण नंतर पक्षाला वाटले सरकार चालवायचे असेल आपल्याकडून प्रमुख व्यक्ती आत हवा, नंतर पक्षाने मला सांगितले. मला खूप दडपण होते, आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही. मात्र त्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले, मुख्यमंत्री झालो असतो तरी एवढी आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला नसता. देशातील सगळ्या भाजपा नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे फोन आले. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे असं म्हटलं. अशा प्रकारची संवेदना व्यक्त करणे हे देखील मोठे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित होतील हे कार्यकर्त्यांना कल्पना नसल्याने त्यांना धक्का बसला. परंतु काही काळाने ते स्वीकारले गेले, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. 

दरम्यान, कार्यकर्त्यांची अपेक्षा असणे गैर नाही. २०१४-१९ काम करण्याची मला संधी मिळाली. महाराष्ट्राला नवीन चेहरा दिला. नवीन कार्यसंस्कृती रुजवली. जलसंवर्धन, विकास, औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली. २०१९ साली आमच्याविरोधात राजकीय खेळी झाली. त्यानंतर पुन्हा राजकीय पटलावर आणण्यासाठी दोन पावलं मागे जाणं गरजेचं होते. महायुतीसाठी मुख्यमंत्रिपद टप्प्यात दिसते. माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ

माझ्याविरोधात षड्यंत्र

महाराष्ट्रात केंद्रस्थानी मीच आहे याचा आनंद व्यक्त करायचा की दु:ख कळत नाही. दिवसातून तीनदा माझे नाव घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचा दिवस पूर्ण होत नाही. कुणी किती व्हिलन करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणात जनता एखाद्याला व्हिलनही करते आणि हिरोही करते. इतके सगळे लोक सातत्याने माझ्यामागे राजकीय चिखलफेक करतात. वैयक्तिक चिखलफेक करतात. कुटुंबावर चिखलफेक करतात. सगळ्या प्रकारचे हातखंडे वापरण्याचा प्रयत्न होतो. माझ्याविरोधात षड्यंत्र रचली जातायेत ते पुढे पाहायला मिळेल. जनतेचा विश्वास माझ्यामागे आजही दिसून येतो. त्यामुळे जे बोलतायेत त्यांची विश्वासार्हता नाही हे दिसून येते, असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंच्या विधानाशी सहमत

मराठा आणि ओबीसी असा संघर्ष होण्यामागे संकुचित राजकारण कारणीभूत आहे. महाराष्ट्रात असं राजकारण सुरू करणारे नेते कोण हे सर्वांना ठाऊक आहे. मराठा आरक्षणाची मागणी १९८० पासून सुरू होती. १९८२ साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण दिले नाही तर माझं जीवन संपवेन असं सांगितले. ते दिले नाही आणि त्यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. तेव्हापासून २०१४ पर्यंत साडे चार वर्षाचा अपवाद वगळता काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष यांचे सरकार राहिले. ४ वेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले. कधीही मराठा आरक्षण दिले नाही. मराठा मागास असलेला रिपोर्टही त्यांनी घेतला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही आयोगाची शिफारस घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात टिकवले. सुप्रीम कोर्टातही मी मुख्यमंत्री असेपर्यंत टिकवून ठेवले. माझं मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर मविआ सरकारमध्ये काय झाले हे पाहिले. माझ्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून १ लाख मराठा उद्योजक घडवले. सारथीमुळे अनेक मराठा तरूण आयएएस, आयपीएस झाले. वंचित मराठा समाजासाठी आम्ही काम केले पण दुसरीकडे मराठा समाजाचा मतासाठी वापर करणारे ते लोक आहेत. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक विधानाशी सहमत नाही. परंतु, जातीयवादाच्या विधानाशी पूर्ण सहमत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा