शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
4
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
5
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
6
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
7
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
8
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
9
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
10
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
11
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
12
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
13
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
14
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
15
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
16
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
17
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
18
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
19
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
20
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक

उपमुख्यमंत्री बनवून भाजपानं अन्याय केला का?; देवेंद्र फडणवीसांनी आभारच मानले, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2024 20:09 IST

माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

मुंबई - राज्यातील राजकारणात २०१९ नंतर बरीच उलथापालथ झाली. सर्वाधिक जागा मिळूनही भाजपाला विरोधी बाकांवर बसावे लागले. २०२२ मध्ये शिवसेनेतील एक गट भाजपासोबत आला. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री बनतील अशी अपेक्षा सगळ्यांना होती. मात्र पक्षाने धक्कातंत्र वापरत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणवीसांना शपथ घेण्याची सूचना केली. यात पक्षाने तुमच्यावर अन्याय केला का, असा प्रश्न मुलाखतीत देवेंद्र फडणवीसांना विचारण्यात आला. तेव्हा पक्षाने माझ्यावर अन्याय केला असं कधी वाटत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं आणि त्यामागचं कारणही सांगितलं.

मुलाखतीत ते म्हणाले की, देवेंद्र फडणवीस कोण होता, एक साधा कार्यकर्ता होता. ज्याला पक्षाने नगरसेवक केलं, महापौर केलं, आमदार केलं, मुख्यमंत्री केलं, त्यानंतर विरोधी पक्षनेता केलं, उपमुख्यमंत्री केलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीसला पक्षाने खूप काही दिले आहे. त्या-त्या वेळेला परिस्थिती पाहून पक्षासाठी दोन पावलं मागे जाणं किंवा पक्षाने सांगितलेली भूमिका स्वीकारणं यात कुठलाही अन्याय नाही. आज मी मोठा होऊ शकलो, चार लोक मला ओळखतात हे फक्त भारतीय जनता पार्टीमुळे. हा पक्ष माझ्या पाठीशी नसता तर नागपूरातील एखादा वकील म्हणून मला फार तर मला ओळख मिळाली असती, असं त्यांनी सांगितले.  लोकमत मुंबईचे संपादक अतुल कुलकर्णी आणि वरिष्ठ सहायक संपादक यदू जोशी यांनी देवेंद्र फडणवीस यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी विविध विषयांवर भूमिका मांडली. 

मुख्यमंत्री झालो असतो तर...

मी सुरुवातीला पक्षाला सांगितले होते, आपण जे काही परिवर्तन करतोय त्यात मला सत्तेबाहेर राहू द्या. त्यामागे माझी भूमिका अशी होती की, लोकांना काय सांगायचे? कालपर्यंत मुख्यमंत्री राहिला आणि सत्तेसाठी हा उपमुख्यमंत्रिपद घेतोय. या माणसाला सत्तेपलीकडे काहीच नाही, याचं माझ्यावर मानसिक दडपण होते. पक्षाने मला परवानगीही दिली होती. पण नंतर पक्षाला वाटले सरकार चालवायचे असेल आपल्याकडून प्रमुख व्यक्ती आत हवा, नंतर पक्षाने मला सांगितले. मला खूप दडपण होते, आपण जे करतोय ते बरोबर आहे की नाही. मात्र त्यानंतर देशभरातील कार्यकर्त्यांनी डोक्यावर घेतले, मुख्यमंत्री झालो असतो तरी एवढी आपुलकी आणि जिव्हाळा मिळाला नसता. देशातील सगळ्या भाजपा नेत्यांचे, मुख्यमंत्र्यांचे फोन आले. आम्हाला तुमच्यावर गर्व आहे असं म्हटलं. अशा प्रकारची संवेदना व्यक्त करणे हे देखील मोठे आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घोषित होतील हे कार्यकर्त्यांना कल्पना नसल्याने त्यांना धक्का बसला. परंतु काही काळाने ते स्वीकारले गेले, असा खुलासा देवेंद्र फडणवीसांनी केला. 

दरम्यान, कार्यकर्त्यांची अपेक्षा असणे गैर नाही. २०१४-१९ काम करण्याची मला संधी मिळाली. महाराष्ट्राला नवीन चेहरा दिला. नवीन कार्यसंस्कृती रुजवली. जलसंवर्धन, विकास, औद्योगिक क्षेत्रात प्रगती केली. २०१९ साली आमच्याविरोधात राजकीय खेळी झाली. त्यानंतर पुन्हा राजकीय पटलावर आणण्यासाठी दोन पावलं मागे जाणं गरजेचं होते. महायुतीसाठी मुख्यमंत्रिपद टप्प्यात दिसते. माझे टार्गेट महायुतीचं सरकार आणणं, सत्ता आणणे. जी कामे आता सुरू केलीत, ज्या योजना आणल्यात त्या थांबू नये यासाठी पुन्हा एकदा महायुती सरकार आणणं हे माझे ध्येय आहे असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

पाहा व्हिडिओ

माझ्याविरोधात षड्यंत्र

महाराष्ट्रात केंद्रस्थानी मीच आहे याचा आनंद व्यक्त करायचा की दु:ख कळत नाही. दिवसातून तीनदा माझे नाव घेतल्याशिवाय महाविकास आघाडीचा दिवस पूर्ण होत नाही. कुणी किती व्हिलन करण्याचा प्रयत्न केला तरी राजकारणात जनता एखाद्याला व्हिलनही करते आणि हिरोही करते. इतके सगळे लोक सातत्याने माझ्यामागे राजकीय चिखलफेक करतात. वैयक्तिक चिखलफेक करतात. कुटुंबावर चिखलफेक करतात. सगळ्या प्रकारचे हातखंडे वापरण्याचा प्रयत्न होतो. माझ्याविरोधात षड्यंत्र रचली जातायेत ते पुढे पाहायला मिळेल. जनतेचा विश्वास माझ्यामागे आजही दिसून येतो. त्यामुळे जे बोलतायेत त्यांची विश्वासार्हता नाही हे दिसून येते, असं फडणवीस म्हणाले.

राज ठाकरेंच्या विधानाशी सहमत

मराठा आणि ओबीसी असा संघर्ष होण्यामागे संकुचित राजकारण कारणीभूत आहे. महाराष्ट्रात असं राजकारण सुरू करणारे नेते कोण हे सर्वांना ठाऊक आहे. मराठा आरक्षणाची मागणी १९८० पासून सुरू होती. १९८२ साली अण्णासाहेब पाटलांनी मराठा आरक्षण दिले नाही तर माझं जीवन संपवेन असं सांगितले. ते दिले नाही आणि त्यांनी स्वत:ला गोळी मारून घेतली. तेव्हापासून २०१४ पर्यंत साडे चार वर्षाचा अपवाद वगळता काँग्रेस आणि शरद पवारांचा पक्ष यांचे सरकार राहिले. ४ वेळा शरद पवार मुख्यमंत्री झाले. कधीही मराठा आरक्षण दिले नाही. मराठा मागास असलेला रिपोर्टही त्यांनी घेतला नाही. आमचे सरकार आल्यानंतर आम्ही आयोगाची शिफारस घेऊन मराठा समाजाला आरक्षण दिले. हायकोर्टात टिकवले. सुप्रीम कोर्टातही मी मुख्यमंत्री असेपर्यंत टिकवून ठेवले. माझं मुख्यमंत्रिपद गेले. त्यानंतर मविआ सरकारमध्ये काय झाले हे पाहिले. माझ्या काळात अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून १ लाख मराठा उद्योजक घडवले. सारथीमुळे अनेक मराठा तरूण आयएएस, आयपीएस झाले. वंचित मराठा समाजासाठी आम्ही काम केले पण दुसरीकडे मराठा समाजाचा मतासाठी वापर करणारे ते लोक आहेत. मी राज ठाकरेंच्या प्रत्येक विधानाशी सहमत नाही. परंतु, जातीयवादाच्या विधानाशी पूर्ण सहमत आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा