शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

स्वबळाच्या डरकाळ्या! विधानसभेला मविआ, महायुतीचे समीकरण फिसकटणार? सर्वांकडून स्वतंत्र चाचपणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2024 09:13 IST

Maharashtra Assembly Election 2024: विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार,  याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

 मुंबई - लोकसभा निवडणूक निकालानंतर महाविकास आघाडी आणि महायुतीतील घटकपक्षांनी स्वबळाची चाचपणी सुरू केली आहे. उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी २८८ मतदारसंघात विधानसभा तयारीचे आदेश संपर्कप्रमुखांना दिल्यानंतर त्यापाठोपाठ मनसेनेही गुरुवारी स्वबळावर २२५ जागा लढण्याची तयारी केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेसाठी २८८ जागांच्या संघटनात्मक बांधणीवर भर देणार असल्याचे सांगत स्वबळाचे संकेत दिले. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी तसेच महायुतीचे समीकरण जुळणार की फिसकटणार,  याची चर्चा आता सुरू झाली आहे. 

महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निकालानंतर मुंबईत रंगशारदा सभागृहात घेतलेल्या पहिल्याच बैठकीत कार्यकर्त्यांना २०० ते २२५ जागांवर निडणूक लढवण्याची तयारी करा, असे आदेश दिले. जागांसाठी महायुतीवर अवलंबून न राहता स्वबळावर लढण्याची मानसिकता मनसेकडून करण्यात आली आहे.  

जिथे चांगली मते, तिथे उमेदवार- आगामी विधानसभेसाठी आमची युतीसाठी कोणाशीही चर्चा सुरू नाही. आतापर्यंत आम्ही स्वबळावर निवडणूक लढवल्या आहेत. ज्या मतदारसंघात आम्हाला आजपर्यंत चांगली मते मिळाली आहेत, तिथे निश्चित आमचे उमेदवार देऊ. मनसेचे निरीक्षक लवकरच राज्याचा दौरा करतील.  त्यासंदर्भातील अहवाल राज यांना सादर केला जाईल, असे मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी सांगितले. 

बच्चू कडूंचाही स्वबळाचा नारा- प्रहार जनशक्ती पार्टीचे प्रमुख आमदार बच्चू कडू यांनीही राज्यात स्वतंत्रपणे विधानसभेच्या २० जागा लढविणार असल्याची घोषणा केली आहे.- संभाव्य उमेदवारांसोबत बैठक घेऊन विचारविनिमय केला जाईल. त्यानंतर आम्ही पुढील पाऊल टाकणार आहोत, असे कडू यांनी सांगितले.  

उद्धवसेना अजमावत आहे ताकदउद्धव ठाकरे यांच्याकडूनही संपर्कप्रमुख, विभागप्रमुख, आमदारांच्या बैठका सुरू आहेत. एकत्र निवडणुकांना सामोरे जाऊन भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी तयारी करा, असे सांगितले जात आहे तर दुसरीकडे मतदारसंघनिहाय पक्षाची ताकद तपासली जात आहे. 

पक्षसंघटना मजबूत करणार : पटोले- लोकसभेला काँग्रेसने राज्यातील सर्व ४८ जागांवर संघटनात्मक बांधणी केली होती, त्याचा फायदा काँग्रेसबरोबरच महाविकास आघाडीला झाला. - आताही विधानसभेसाठी २८८ जागांवर पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.  - एकत्रित लढायचे असले तरी संघटनात्मक तयारी करायला लागते. त्याचा फायदा मित्र पक्षांनाही होतो, असेही ते म्हणाले. 

आम्हाला चुरा तरी राहू द्या : सदाभाऊ  खोत महायुतीतील घटक पक्ष असलेल्या रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनीही आपली खदखद व्यक्त केली. महायुतीतील बड्या मित्र पक्षांनीही समजून घ्यायला हवे, आम्ही काय बैलगाड्यांना फक्त वंगण घालायला बसलोय का? बुंदीचे लाडू तुम्ही खात असाल, तर चुरा तरी आमच्या नशिबी राहू द्या, अशा शब्दात त्यांनी मन मोकळे केले.  

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रvidhan sabhaविधानसभाMahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी