शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

राज्यात विधानसभा निवडणूक केव्हा लागणार? जयंत पाटलांनी तारीख सांगितली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2024 17:39 IST

उद्यापासून पावसाळी अधिवेशन सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. 

महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये आता मोठा युद्ध रंगणार आहे. लोकसभेला महायुतीचा दारुण पराभव झाल्याने मविआमध्ये आनंदाचे वातावरण आहे. याच्या जोरावर विधानसभेलाही सत्ताधाऱ्यांना खाली खेचण्याच्या योजना विरोधकांकडून आखल्या जात आहेत. उद्यापासून पावसाळी अधिवेशन  सुरु होत आहे, अशातच शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करून टाकली आहे. 

महायुतीमध्ये सारे काही आलबेल नसून शिंदे शिवसेना, भाजपा आणि अजित पवार राष्ट्रवादीत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडू लागल्या आहेत. लोकसभा निवडणुकीचे अपयश शिवसेना आणि भाजपा अजित पवारांवर लादत आहेत. तर अजित पवार गटही दोघांना जोरदार प्रत्यूत्तर देत आहे. यामुळे अजित पवार गट महायुतीत राहणार की बाहेर पडणार याचीही चर्चा रंगू लागली आहे.

 अजित पवार गटातील आमदार नाराज असून ते लवकरच शरद पवारांकडे परतण्याची शक्यताही वर्तविली जात आहे. यात छगन भुजबळांचे नावही आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवारांनीच कोणाला परत घेणार कोणाला नाही याची अट जाहीर केली आहे. तसेच मविआच्या मित्रपक्षांनाही विचारणार असल्याचेही म्हटले आहे. यामुळे अजित पवार गटाच्या आमदारांची अवस्था ना घर का ना घाट का अशी होणार असल्याचीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. 

येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्हाला चांगला प्रतिसाद मिळेल. शिवसेनेलाही उद्धव ठाकरे यांच्यामुळे चांगला प्रतिसाद मिळेल. विधानसभा निवडणुकीत तिनही पक्षांना चांगला प्रतिसाद मिळेल, काही दिवसातच जागावाटपावर चर्चा होणार आहे, असंही आमदार जयंत पाटील म्हणाले. आमच्या पक्षाला मधल्या काळात मोठ्या प्रमाणात त्रास झाला. त्यामुळे जे पक्षासाठी योग्य आहे तोच निर्णय घेऊ, असंही पाटील म्हणाले. यावेळी पाटील यांनी विधानसभा निवडणूक २० ऑक्टोबरला होईल असे सांगितले.  

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटीलvidhan sabhaविधानसभाMaharashtraमहाराष्ट्रElectionनिवडणूक 2024