शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत घेतला मोठा निर्णय, रमेश चेन्निथला यांनी केली महत्त्वाची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2024 12:24 IST

Maharashtra Assembly Election 2024: महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा तिढा सुटला नव्हता. दरम्यान, महाविकास आघाडीमध्ये अनेक मतदारसंघात बंडखोरी झाली आहे. त्यात काँग्रेसकडूनही अनेक ठिकाणी बंडखोरी झाली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीमधील मतभेद मिटवून ऐक्य टिकवण्यासाठी काँग्रेसने बंडखोर उमेदवारांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही, पक्षाच्या अधिकृत उमेदवारीशिवाय ज्यांनी कुठे उमेदवारी अर्ज भरले असतील त्यांनी ते मागे घेतले पाहिजेत, असे स्पष्ट आदेश काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला यांनी काँग्रेसच्या बंडखोरांना दिले आहे.

महाविकास आघाडीच्या सगळ्या २८८ उमेदवारांचे अर्ज काल दाखल झाले आहेत. महाविकास आघाडी एकसाथ मजबुतीने निवडणूक लढवण्यासाठी सज्ज झाली आहे. मविआचे सर्व उमेदवार आता जनतेमध्ये आहेत. महायुतीशी तुलना केल्यास महाविकास आघाडीमध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत. महायुतीमध्ये आपापसात भयंकर भांडणं सुरू आहेत. भाजपाचे नेते शिंदे आणि अजित पवार गटातून लढत आहेत. असं मी कधी पाहिलेलं नाही. महायुती ही एक विचित्र आघाडी आहे. महायुतीमधून भाजपाच निवडणूक लढवत आहे. महायुतीचा कुठलाही प्रभाव आणि अस्तित्व दिसत नाही आहे. महायुती संपली आहे. भाजपाने शिंदे आणि अजित पवार यांना या निवडणुकीतून संपवलं आहे, असा दावा चेन्निथला यांनी केला.

पण महाविकास आघाडीमध्ये असं नाही आहे. आम्ही शिवसेना, राष्ट्रवादीसह छोट्या छोट्या पक्षांना  शक्य होईल तेवढं प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न केला आहे. महाविकास आघाडीत असलेल्या सर्व घटक पक्षांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला आहे. पण महायुतीच्या जागावाटपामध्ये भाजपाचं वर्चस्व दिसून येत आहे. उलट महाविकास आघाडी एकसाथ आहे. आमच्यामध्ये कुठलेही मतभेद नाही आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

आमच्याकडून जे कुणी बंडखोर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांचे अर्ज आणि उद्या मागे घेण्यात येतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. आम्ही केवळ हायकमांडने घोषित केलेल्या उमेदवारांनाच एबी फॉर्म दिला आहे. अन्य कुणाला एबी फॉर्म दिलेला नाही. काँग्रेसच्या हायकमांडने उमेदवारी जाहीर केलेल्या उमेदवारांचाच प्रचार करा, असं आवाहन मी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करत आहे. त्याशिवाय ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत, त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतले पाहिजेत. महाविकास आघाडीमध्ये कुठलीही मैत्रिपूर्ण लढत होणार नाही. जिथे कुठे मतभेद असतील ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह बाळासाहेब थोरात, विजय वडेट्टीवार आणि वर्षा गायकवाड सोडवण्याचे प्रयत्न करतील, असेही चेन्निथला यांनी सांगितले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४congressकाँग्रेसMahavikas Aghadiमहाविकास आघाडी