शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
5
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
6
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
7
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
8
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
9
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
10
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
11
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
12
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
13
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
14
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
15
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
16
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
17
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
18
Thane Fire: ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
19
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
20
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
Daily Top 2Weekly Top 5

देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:49 IST

जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची असं उदयनराजेंनी म्हटलं. 

कराड - देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. 

कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच महायुती आणि आघाडीतला फरक सांगतो, जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा युती होते. लोक कल्याणाचा विचार घेऊन लोकांसमोर जातो. लोकांचे हित पाहतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवतो. आज देशात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. ५० हून अधिक वर्ष देशात सत्ता असताना योजना का राबवल्या गेल्या नाही. वैचारिक दृष्ट्‍या युती केली जाते. जो महाराजांचा विचार होता, तो लोक कल्याण हे मनात ठेवून ध्येय गाठायचे असते. विचारांनी एकत्र आलेले त्यांना कुठल्याही आमिषाची गरज भासत नाही. राज्यात आणि इतर राज्यात जिथे युतीचं भाजपाचं सरकार आहे तिथे चांगल्या योजना राबवल्या गेल्यात असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठी स्वत:च्या हिंमतीवर काही करू शकत नसते, मग याला पकड, त्याला पकड असं करून बनलेली आघाडी असते. आज आघाडीची अवस्था पाहा. कोल्हापूरात बघा काय घडले, हीच अवस्था राज्यभरात आहे. जो काम करतो त्याला ठेच लागते. जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची. चिखलफेक करून काही होत नाही मग व्यक्ती दोषावर उतरायचं.  एकदा चूक घडली तर ५ वर्ष पश्चातापाची वेळ येते. गेलेली वेळ अन् समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबत नसतात. आपल्या आयुष्यातील ५ वर्ष, कुटुंबातील जे तरुण उद्याचा भविष्यकाळ आहेत. त्यांचा विचार करून महायुतीच्या मागे राहावे असं आवाहन उदयनराजेंनी जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-north-acकराड उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार