शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 19:49 IST

जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची असं उदयनराजेंनी म्हटलं. 

कराड - देवेंद्र फडणवीस आज इतकं काम करतायेत, जो माणूस काम करतो त्याला आज धमक्या मिळतायेत. जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात. माणसांनी काम करायचं नाही का?, मग अशा व्यक्तीच्या मागे, पक्षामागे, युतीमागे आपण उभं राहणार नसेल तर कुणाच्या मागे उभं राहायचं हा प्रश्न प्रत्येकाने स्वत:च्या मनाला विचारला पाहिजे असं खासदार उदयनराजे यांनी म्हटलं. 

कराडच्या जाहीर सभेत उदयनराजे म्हणाले की, पश्चिम महाराष्ट्र पहिल्यापासून काँग्रेसचा बालेकिल्ला समजला जायचा. मात्र इथल्या लोकांना केवळ झुलवत ठेवलं गेले. पश्चिम महाराष्ट्रातील लोकांचे प्रश्न होते, ते सोडवले नाहीत. राजकारणात सगळ्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी फक्त आश्वासने दिली. आश्वासन देताना आपण जेव्हा लोकांसमोर जातो, आशीर्वाद देत आमदार, खासदार बनवतात. मात्र लोकांचं ऋण कधी फेडले गेले नाही. त्यामुळे फार याकडे लक्ष देऊ नका. वर नरेंद्र आणि खाली देवेंद्र अशी म्हण आहे. आधीच्या काळात योजना पूर्ण झाल्या असत्या तर तेव्हाचे तरूण जे आज त्यांचे वय झाले त्यांचे आयुष्य व्यर्थ गेले नसते. लोकांची जास्तीत जास्त प्रगती झाली पाहिजे यादृष्टीने आम्ही कार्यरत असणार आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच महायुती आणि आघाडीतला फरक सांगतो, जेव्हा लोक विचारांनी एकत्र येतात तेव्हा युती होते. लोक कल्याणाचा विचार घेऊन लोकांसमोर जातो. लोकांचे हित पाहतो. त्यांच्या अडीअडचणी सोडवतो. आज देशात अनेक वर्ष काँग्रेसची सत्ता होती. ५० हून अधिक वर्ष देशात सत्ता असताना योजना का राबवल्या गेल्या नाही. वैचारिक दृष्ट्‍या युती केली जाते. जो महाराजांचा विचार होता, तो लोक कल्याण हे मनात ठेवून ध्येय गाठायचे असते. विचारांनी एकत्र आलेले त्यांना कुठल्याही आमिषाची गरज भासत नाही. राज्यात आणि इतर राज्यात जिथे युतीचं भाजपाचं सरकार आहे तिथे चांगल्या योजना राबवल्या गेल्यात असंही उदयनराजे म्हणाले.

दरम्यान, सत्ता मिळवण्यासाठी स्वत:च्या हिंमतीवर काही करू शकत नसते, मग याला पकड, त्याला पकड असं करून बनलेली आघाडी असते. आज आघाडीची अवस्था पाहा. कोल्हापूरात बघा काय घडले, हीच अवस्था राज्यभरात आहे. जो काम करतो त्याला ठेच लागते. जो काम करत नाही त्याला ठेच लागणार कशी, कारण तो एकाच जागेवर बसून असतो. काही करत नाही. स्वत:चं नाकर्तेपण दडवण्यासाठी चिखलफेक करायची. चिखलफेक करून काही होत नाही मग व्यक्ती दोषावर उतरायचं.  एकदा चूक घडली तर ५ वर्ष पश्चातापाची वेळ येते. गेलेली वेळ अन् समुद्राच्या लाटा कुणासाठी थांबत नसतात. आपल्या आयुष्यातील ५ वर्ष, कुटुंबातील जे तरुण उद्याचा भविष्यकाळ आहेत. त्यांचा विचार करून महायुतीच्या मागे राहावे असं आवाहन उदयनराजेंनी जनतेला केले. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४karad-north-acकराड उत्तरwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024Udayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसSharad Pawarशरद पवार