शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2024 18:36 IST

BRS Party Likely to Merge In NCP Sharad Pawar Group: महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.

BRS Party Likely to Merge In NCP Sharad Pawar Group: एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीत जागावाटपांवरून बैठकांचे, चर्चांचे सत्र सुरू आहे. तर दुसरीकडे संभाजीराजे छत्रपती, राजू शेट्टी आणि बच्चू कडू एकत्रितपणे परिवर्तन महाशक्ती तिसरी आघाडी करत सक्षम पर्याय देण्यासाठी कंबर कसून तयारीला लागले आहेत. यातच मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापताना पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल, यावरून महायुती आणि महाविकास आघाडीत चढाओढ असल्याचे दिसत आहे. यातच आता लाखो कार्यकर्ते असलेला एक पक्षच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विलीन होणार असल्याचे सांगितले जात आहे.

तेलंगणचे माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात भारत राष्ट्र समितीची बीजे रोवली. परंतु, तेलंगण येथे झालेल्या विधानसभा निवडणुकीत बीआरएसचा दारूण पराभव झाला. महाराष्ट्रात प्रचंड मोठा ताफा घेऊन येऊन के. चंद्रशेखर राव यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले होते. अनेक नेते, पदाधिकारी आणि लाखोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी या पक्षात पटापट प्रवेश केले. परंतु, याच पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी आता सगळे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यासाठी तारीखही ठरवण्यात आली आहे. महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड मानली जात आहे.

बीआसएसचे महाराष्ट्रातील काम थांबलेले आहे

शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट काम तेलंगण राज्यात झाले. तसेच बाकीच्या घटकांसाठी झालेले काम पाहून आम्ही महाराष्ट्रात बीआरएस पक्षाचे काम हाती घेतले. राज्यात पक्ष वाढावा, यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. गेल्या दोन वर्षात पक्ष वाढवण्यासाठी खूप प्रयत्न केले. के. चंद्रशेखर राव यांच्या नेतृत्वाखाली घराघरात बीआरएस पक्ष पोहोचवला. परंतु, तेलंगणमधील बीआरएसचे सरकार गेले. तसेच आणखी काही कारणांमुळे महाराष्ट्रातील काम थांबलेले आहे, असे बाळासाहेब देशमुख यांनी म्हटले आहे. 

२२ लाख लोक सभासद म्हणून नोंदवले

महाराष्ट्रात आता निवडणुका होत आहेत. २२ लाख लोक सभासद म्हणून नोंदवले होते. पक्षाची भूमिका आम्ही लोकांपर्यंत पोहोचवले. तेलंगणात ज्या धर्तीवर काम झाले, तशाच पद्धतीने राज्यात काम करणारा शरद पवार यांचा पक्ष आहे. शरद पवार मोठे नेते आहेत. आता आमचे सगळ्यांचे एकमत झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी चर्चा केली. यानंतर कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला, अशी माहिती बाळासाहेब देशमुख यांनी दिली.

शरद पवार यांच्याशी ४० ते ४२ मिनिटे चर्चा

यासंदर्भात शरद पवार यांच्याशी ४० ते ४२ मिनिटे चर्चा झाली. अनेक विषयांवर चर्चा झाली. या बैठकीनंतर असे ठरवण्यात आले की, ०६ ऑक्टोबर रोजी एक मोठा मेळावा घेऊन शरद पवार यांच्या नेतृत्वखाली आम्ही सगळे कार्यकर्ते, नेते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करणार आहोत. आमचा धागा आणि आमचा उद्देश समान आहे, असे बाळासाहेब देशमुख यांनी सांगितले.

दरम्यान, राज्यभरात भारत राष्ट्र समितीच्या वतीने अधिकृतपणे नेमलेले पदाधिकारी यांनी एकत्रितपणे शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. त्यानुसार आम्ही शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश करणार आहोत, असे बाळासाहेब देशमुख यांनी स्पष्टपणे सांगितले.

 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Sharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBRS-Bharat Rashtra Samitiभारत राष्ट्र समितीPoliticsराजकारण