शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीरमध्ये हिंदूंचे टार्गेट किलिंग; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
2
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
5
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
6
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
7
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
8
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
9
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
10
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
11
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
12
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
13
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
14
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
15
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
16
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
17
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
18
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
19
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
20
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?

अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 15, 2024 07:51 IST

Maharashtra Politics: अखिलेश यादव महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. काहीही नसताना सपाचे महाराष्ट्रात दोन आमदार आहेत. सपा महाराष्ट्रात ताकदीने आली तर त्याचा फटका शरद पवार, ओवेसी, काँग्रेसलाच सर्वाधिक बसणार...

लखनऊ : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा कोणत्याही क्षणी होण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडी, महायुती आणि महाशक्ती अशा तीन आघाड्यांमध्ये फाईट होणार आहे. यामुळे एकतर त्रिशंकू स्थिती किंवा तिसऱ्या आघाडीने मते फोडल्यामुळे सर्वच जागांवर अटीतटीची लढत होऊन मविआ आणि महायुती सत्तास्थापनेसाठी देखील काठावर पास होण्याची शक्यता आहे. एकंदरीतच महायुती आणि आघाडी या दोघांनाही ५०-५० टक्के संधी दिसत आहे. यातच या परिस्थितीचा फायदा उठविण्यासाठी उत्तर प्रदेशचा समाजवादी पक्ष या निवडणुकीला साधण्याच्या प्रयत्नात आहे. 

यंदा झालेल्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक जागा मिळविणाऱ्या सपाने अन्य राज्यांत विस्तार करण्यासाठी तयारी सुरु केली आहे. १८ ऑक्टोबरला अखिलेश यादव मिशन महाराष्ट्राची सुरुवात करणार आहेत. मालेगावमध्ये ते एक मोठी रॅली करणार आहेत. मालेगाव हे मुस्लिम बहुल आहे. यानंतर १९ तारखेला धुळ्यातही ते राजकीय सभा घेणार आहेत. 

महाराष्ट्रात काहीही नसताना सपाचे दोन आमदार आहेत. मानखूर्द शिवाजी नगरमधून अबू आझमी आणि भिवंडी पूर्वहून रईस शेख. उत्तर प्रदेशातून कोणीही प्रचाराला आलेले नसताना  दोन आमदार तर लक्ष घातले तर किती? असा प्रश्न सपा प्रमुखांना खुणावत आहे. महाराष्ट्रात सपा जवळपास ३० जागांवर आपली व्होटबँक असल्याचा दावा करत आहे. यातून सपा मविआकडून १०-१२ जागा पदरात पाडून घेण्याचा प्रयत्न करत आहे. सपाने २००९ मध्ये ४ जागा जिंकल्या होत्या. परंतू, २०१४ मध्ये एकच जागा आली होती. 

सपा महाराष्ट्रात आलेल्या सर्वात मोठा फटका हा एआयएमआयएमच्या ओवेसी यांना आणि शरद पवार-अजित पवारांच्या राष्ट्रवादीला व काँग्रेसला बसणार आहे. AIMIM चे धुळे शहर आणि मालेगाव मध्य अशा दोन ठिकाणी २०१९ मध्ये आमदार निवडून आले होते. तिथेच अखिलेश यादव लक्ष ठेवून आहेत. तिथे मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर आहे. यामुळे सपा हे मतदारसंघ साधण्याच्या प्रयत्नात आहे. महत्वाची बाब म्हणजे सपाच्या धुळ्यातील उमेदवाराला २०१९ मध्ये केवळ ८०० मते मिळाली होती. 

सपाला मविआत जागा दिल्यास त्याचा फटका राष्ट्रवादी आणि काँग्रेसलाच जास्त बसणार आहे. कारण या दोघांच्याही अल्पसंख्यांक बहुल असलेल्या मतदारसंघांवर दावा आहे. या जागा सपाला सोडाव्या लागणार आहेत. जर मविआत सपा आली नाही तर या दोघांची मते सपाला जाऊन मतविभागणीचा फटका बसू शकतो. तिसरी आघाडी आल्याने आधीच राज्यातील राजकीय परिस्थिती बदललेली असताना आता सपाच्या दबावामुळे मविआमध्ये टेन्शनचे वातावरण आहे.  

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Akhilesh Yadavअखिलेश यादवSharad Pawarशरद पवारAIMIMऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीनSamajwadi Partyसमाजवादी पार्टी