शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:40 IST

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.  

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणांगणात 'बटोगे तो कटोगे' असा योगी आदित्यनाथ यांचा नारा चर्चेत आला आहे. मात्र योगींच्या या घोषणेवरून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला. बटोगे तो कटोगे असा नारा योगींनी दिला, पण बीफच्या नावाखाली, मॉब लिचिंगच्या नावावर, घरवापसी, डोक्यावर टोपी घातल्यामुळे, दाढी वाढवल्यामुळे जर तुम्ही कापत आहात. तर हा तुमचा द्वेष देशाला कमकुवत करत नाही का याचे उत्तर मला द्या असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगींचे हे विधान हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे म्हणजे देशाला कमकुवत करण्यासारखं नाही का...? मी अकबरुद्दीन औवेसी मुसलमान, या देशात भाडेकरू नाही. मोदी-योगी हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. हिंदुस्तान ना तुमची जाहागिरी आहे ना माझी...हिंदुस्तान हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, पारसी प्रत्येक धर्मातील माणसाचा आहे. कुणा एकाचा नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी, महागाई, प्रत्येक २-३ मिनिटाला होणारे बलात्कार, पदवीधरांना नोकऱ्या, कमकुवत अर्थव्यवस्थेला चालना देणे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करणे, रुपयाचा घसरता दर कमी करणे हे आहे. आज देशात बेघरांना घरे दिली जातायेत का, रोजगार दिले जातायेत का? हे काही होत नाही. केवळ धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहेत. जातीपातीचं राजकारण करू नका बोलणारे धर्माचं राजकारण करू नका ही गोष्ट का बोलत नाहीत असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना विचारला. 

औरंगाबाद आमचं होतं, आहे अन् राहणार

महाराष्ट्रात मराठवाडा सर्वात मागासलेला भाग आहे. मी मराठा बोलतो, तेव्हा केवळ हिंदू मराठा नसतो, तर मुस्लीम मराठा, दलित मराठा मराठवाड्यात राहणारा प्रत्येकजण मराठा आहेत. ३० वर्षापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बनवलं गेले, कागदावर आहे पण पैसे नाहीत. मराठा आरक्षणासह मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला आम्ही ५० हजार कोटींचं पॅकेज देऊन मराठवाड्याला पुढे आणू. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतायेत. पाण्यासाठी वणवण भटकतायेत. दवाखाने नाहीत. १००-२०० किमी रुग्णालयात जाण्यासाठी लागतात. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मराठवाड्यात नाही. नाव बदलल्याने काम मिळणार का, अन्न मिळणार का, पाण्याची तहान भागणार का, आजारपण दूर होणार का? अरे नावात काय ठेवले. बेईमानींनी काम दाखवावं असं सांगत अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद आमचं होतं, आमचं आहे अन् आमचेच राहणार असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

दरम्यान, योगी येणार आहेत असं मला सांगितले गेले. "योगी तेरे आने का बाद अकबरभी आयेगा, मोदी तेरे आने का बाद अकबर भी आयेगा" २० तारखेला पतंग उडवणार आहे. १० वर्षांनी मी आज आलोय पण जोश आजही तेवढाच आहे. घड्याळात ९.४५ वाजलेत, १० वाजता प्रचार संपणार आहे, मात्र अजून १५ मिनिटे बाकी आहेत असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. त्यात १५ मिनिटे बाकी आहेत, जरा धीर धरा, ना ते माझा पाठलाग सोडणार आणि मी त्यांचा पाठलाग सोडणार असं सांगत अकबरुद्दीन यांनी मागील सभेत केलेले १५ मिनिटांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलीलyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदूMuslimमुस्लीम