शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती निवडणुकीत कुणाचं पारडं जड? एनडीए की इंडिया, कोण मारणार बाजी, असं आहे संसदेतील मतांचं गणित  
2
"ते मराठीत न बोलल्याने भाषेला भोकं पडणार का?’’, अभिनेत्री केतकी चितळेचं वादग्रस्त विधान
3
"सोनिया गांधी आमच्या देवी आहेत, त्यांनी…”, तेलंगाणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी उधळली स्तुतीसुमने   
4
WTC मध्ये भारताचा टॉपर ठरला रिषभ पंत! हिटमॅन रोहित शर्माचा रेकॉर्ड मोडला
5
हे सारं मी त्यांच्या सांगण्यावरून केलं, बनावट दूतावास चालवणाऱ्या हर्षवर्धनचा धक्कादायक दावा   
6
IND vs ENG 4th Test Day 2 Stumps: मॅच आधी गिलनं ज्यांना डिवचलं त्या दोघांनीच दमवलं; शेवटी...
7
Asia Cup 2025 : बीसीसीआय UAE च्या मैदानात स्पर्धा घेणार; भारत-पाक हायहोल्टेज मॅचही पाहायला मिळणार?
8
Anshul Kamboj vs Ben Duckett: अंशुल कंबोजची पहिली टेस्ट विकेट! बेन डकेट 'नर्व्हस नाइंटी'चा शिकार
9
"देशासाठी लढणारा मराठी माणूस कधी..., काहींना शिवरायांच्या नावाची ॲलर्जी"; मुख्यमंत्री फडणवीस यांचं जोरदार भाषण
10
Hulk Hogan Death: 'बालपणीचा सुपरहिरो' प्रसिद्ध WWE स्टार हल्क होगनचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन
11
मग मृतांना निवडणुकीत मतदान करायला द्यायचं का? राहुल-तेजस्वींना निवडणूक आयोगाचा सवाल
12
VIDEO: ती आली अन् थेट त्याला बिलगली... चहल-महावशची एकमेकांना घट्ट मिठी, क्लिप व्हायरल
13
चक्क दारूच्या ट्रकवर राज्यामंत्र्याचे नाव, ४० लाखांची विदेशी दारू, सात आराेपींना घेतले ताब्यात
14
'या लोकांचे प्रफुल्ल लोढासोबत काय संबंध आहेत?', गिरीश महाजनांच्या संयमाचा कडेलोट, 'मविआ'ला थेट फोटोच दाखवले
15
दिल्लीतील JNU मधील देवेंद्र फणडवीसांच्या कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांचं आंदोलन, महायुती सरकारविरोधात घोषणाबाजी
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी गुप्तचर संस्थेत नोकरी; मुंबई, नागपूरसाठी 'इतक्या' जागा राखीव!
17
Rishabh Pant Fifty : भारताच्या 'जखमी वाघा'ची डरकाळी! लढवय्या पंतनं ठोकली सॉलिड फिफ्टी
18
₹1600 वर पोहोचू शकतो इलेक्ट्रिक बस बनवणाऱ्या कंपनीचा शेअर, खरेदीसाठी उडालीय लोकांची झुंबड; करतोय मालामाल!
19
स्वातंत्र्यवीर सावरकर बदनामी प्रकरणी राहुल गांधी यांना नाशिकच्या कोर्टात जामीन
20
वाघाच्या काळजाचा! जखमी असूनही इंग्लंडशी भिडला, मँचेस्टरमध्ये पंतची विक्रमी खेळी

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:40 IST

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.  

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणांगणात 'बटोगे तो कटोगे' असा योगी आदित्यनाथ यांचा नारा चर्चेत आला आहे. मात्र योगींच्या या घोषणेवरून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला. बटोगे तो कटोगे असा नारा योगींनी दिला, पण बीफच्या नावाखाली, मॉब लिचिंगच्या नावावर, घरवापसी, डोक्यावर टोपी घातल्यामुळे, दाढी वाढवल्यामुळे जर तुम्ही कापत आहात. तर हा तुमचा द्वेष देशाला कमकुवत करत नाही का याचे उत्तर मला द्या असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगींचे हे विधान हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे म्हणजे देशाला कमकुवत करण्यासारखं नाही का...? मी अकबरुद्दीन औवेसी मुसलमान, या देशात भाडेकरू नाही. मोदी-योगी हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. हिंदुस्तान ना तुमची जाहागिरी आहे ना माझी...हिंदुस्तान हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, पारसी प्रत्येक धर्मातील माणसाचा आहे. कुणा एकाचा नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी, महागाई, प्रत्येक २-३ मिनिटाला होणारे बलात्कार, पदवीधरांना नोकऱ्या, कमकुवत अर्थव्यवस्थेला चालना देणे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करणे, रुपयाचा घसरता दर कमी करणे हे आहे. आज देशात बेघरांना घरे दिली जातायेत का, रोजगार दिले जातायेत का? हे काही होत नाही. केवळ धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहेत. जातीपातीचं राजकारण करू नका बोलणारे धर्माचं राजकारण करू नका ही गोष्ट का बोलत नाहीत असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना विचारला. 

औरंगाबाद आमचं होतं, आहे अन् राहणार

महाराष्ट्रात मराठवाडा सर्वात मागासलेला भाग आहे. मी मराठा बोलतो, तेव्हा केवळ हिंदू मराठा नसतो, तर मुस्लीम मराठा, दलित मराठा मराठवाड्यात राहणारा प्रत्येकजण मराठा आहेत. ३० वर्षापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बनवलं गेले, कागदावर आहे पण पैसे नाहीत. मराठा आरक्षणासह मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला आम्ही ५० हजार कोटींचं पॅकेज देऊन मराठवाड्याला पुढे आणू. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतायेत. पाण्यासाठी वणवण भटकतायेत. दवाखाने नाहीत. १००-२०० किमी रुग्णालयात जाण्यासाठी लागतात. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मराठवाड्यात नाही. नाव बदलल्याने काम मिळणार का, अन्न मिळणार का, पाण्याची तहान भागणार का, आजारपण दूर होणार का? अरे नावात काय ठेवले. बेईमानींनी काम दाखवावं असं सांगत अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद आमचं होतं, आमचं आहे अन् आमचेच राहणार असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

दरम्यान, योगी येणार आहेत असं मला सांगितले गेले. "योगी तेरे आने का बाद अकबरभी आयेगा, मोदी तेरे आने का बाद अकबर भी आयेगा" २० तारखेला पतंग उडवणार आहे. १० वर्षांनी मी आज आलोय पण जोश आजही तेवढाच आहे. घड्याळात ९.४५ वाजलेत, १० वाजता प्रचार संपणार आहे, मात्र अजून १५ मिनिटे बाकी आहेत असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. त्यात १५ मिनिटे बाकी आहेत, जरा धीर धरा, ना ते माझा पाठलाग सोडणार आणि मी त्यांचा पाठलाग सोडणार असं सांगत अकबरुद्दीन यांनी मागील सभेत केलेले १५ मिनिटांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलीलyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदूMuslimमुस्लीम