शहरं
Join us  
Trending Stories
1
"दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार"; बिहारमधून PM मोदींचा इशारा
2
फ्राईड राईसमध्ये जास्त पडलेल्या मीठानं जीव वाचवला; पहलगाम हल्ल्यातील पीडितांनी सांगितली आपबीती
3
कधीपर्यंत धर्म सांगून गोळ्या खात राहायच्या?; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद काय बोलले?
4
पत्नीच्या नावे Post Office मध्ये ₹१,००,००० ची FD केल्यास २ वर्षांनी किती परतावा मिळेल, पाहा कॅलक्युलेशन
5
काश्मीरमध्ये तणाव असतानाच छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांवर मोठी कारवाई, १००० नक्षल्यांना जवानांनी घेरले, ५ ठार  
6
पहलगाम दहशतवादी हल्लाः पाकिस्तानी उच्चायोगात मागवण्यात आला केक; बॉक्स पाहून एकच प्रश्न, हे 'सेलिब्रेशन' कसलं?
7
पाकिस्तान पुरता अडकणार? पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा एक निर्णय अन् शेअर बाजार धडाम
8
Elphinstone Bridge: तारीख निश्चित! एल्फिन्स्टन ब्रिज २५ एप्रिलपासून वाहतुकीसाठी बंद, मुंबईकरांची कोंडी होणार
9
डोळ्यात अश्रू, कपड्यांवर रक्ताचे डाग..! दहशतवादी हल्ल्यात डोळ्यादेखत वडिलांना गमावलेल्या लेकीनेच केले अंत्यसंस्कार
10
IPL 2025: दिल्ली कॅपिटल्सचा युवा स्टार म्हणतो- "मला टीम इंडियाकडून खेळायचंय, पण..."
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या शुभमला परत आणा, मी माझं दुःख कोणाला सांगू, त्याने कोणाचं काय नुकसान केलं होतं?"
12
या सरकारी बँकेनं सुरू केलं लोन कॅम्पेन; कमी व्याजदर आणि शून्य चार्जेसवर मिळणार कर्ज, अखेरची तारीख कधी?
13
पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर खेळाडूही संतापले! सचिन तेंडुलकर ते नीरज चोप्रा.. कोण काय म्हणाले?
14
मुलगी झाली हो..! ; अभिनेता चिराग पाटील दुसऱ्यांदा झाला बाबा, पोस्ट शेअर करत दिली खुशखबर
15
Indus Waters Treaty: ६५ वर्षे जुना सिंधू पाणी करार काय आहे? पाकिस्तानवर किती परिणाम होईल?; वाचा सविस्तर
16
"मला पहलगाम दहशतवादी हल्ल्याबद्दल आधीच माहित होतं"; 'त्या' व्यक्तीचा पोलिसांना फोन अन्...
17
मोठा खुलासा! लेफ्टनंट विनयने दोन दहशतवाद्यांना पकडलेले; नौदलाचा अधिकारी धारातीर्थी पडला
18
"तुला ठार मारू’’, भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीरला दहशतवादी संघटनेकडून धमकी
19
‘जीव वाचवण्यासाठी आम्ही…’मृत गनबोटेंच्या पत्नीने शरद पवारांना सांगितला अंगावर काटा आणणारा अनुभव
20
दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबियांना इन्शुरन्स क्लेम मिळतो का? काय आहेत विमा नियम?

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:40 IST

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.  

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणांगणात 'बटोगे तो कटोगे' असा योगी आदित्यनाथ यांचा नारा चर्चेत आला आहे. मात्र योगींच्या या घोषणेवरून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला. बटोगे तो कटोगे असा नारा योगींनी दिला, पण बीफच्या नावाखाली, मॉब लिचिंगच्या नावावर, घरवापसी, डोक्यावर टोपी घातल्यामुळे, दाढी वाढवल्यामुळे जर तुम्ही कापत आहात. तर हा तुमचा द्वेष देशाला कमकुवत करत नाही का याचे उत्तर मला द्या असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगींचे हे विधान हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे म्हणजे देशाला कमकुवत करण्यासारखं नाही का...? मी अकबरुद्दीन औवेसी मुसलमान, या देशात भाडेकरू नाही. मोदी-योगी हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. हिंदुस्तान ना तुमची जाहागिरी आहे ना माझी...हिंदुस्तान हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, पारसी प्रत्येक धर्मातील माणसाचा आहे. कुणा एकाचा नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी, महागाई, प्रत्येक २-३ मिनिटाला होणारे बलात्कार, पदवीधरांना नोकऱ्या, कमकुवत अर्थव्यवस्थेला चालना देणे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करणे, रुपयाचा घसरता दर कमी करणे हे आहे. आज देशात बेघरांना घरे दिली जातायेत का, रोजगार दिले जातायेत का? हे काही होत नाही. केवळ धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहेत. जातीपातीचं राजकारण करू नका बोलणारे धर्माचं राजकारण करू नका ही गोष्ट का बोलत नाहीत असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना विचारला. 

औरंगाबाद आमचं होतं, आहे अन् राहणार

महाराष्ट्रात मराठवाडा सर्वात मागासलेला भाग आहे. मी मराठा बोलतो, तेव्हा केवळ हिंदू मराठा नसतो, तर मुस्लीम मराठा, दलित मराठा मराठवाड्यात राहणारा प्रत्येकजण मराठा आहेत. ३० वर्षापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बनवलं गेले, कागदावर आहे पण पैसे नाहीत. मराठा आरक्षणासह मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला आम्ही ५० हजार कोटींचं पॅकेज देऊन मराठवाड्याला पुढे आणू. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतायेत. पाण्यासाठी वणवण भटकतायेत. दवाखाने नाहीत. १००-२०० किमी रुग्णालयात जाण्यासाठी लागतात. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मराठवाड्यात नाही. नाव बदलल्याने काम मिळणार का, अन्न मिळणार का, पाण्याची तहान भागणार का, आजारपण दूर होणार का? अरे नावात काय ठेवले. बेईमानींनी काम दाखवावं असं सांगत अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद आमचं होतं, आमचं आहे अन् आमचेच राहणार असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

दरम्यान, योगी येणार आहेत असं मला सांगितले गेले. "योगी तेरे आने का बाद अकबरभी आयेगा, मोदी तेरे आने का बाद अकबर भी आयेगा" २० तारखेला पतंग उडवणार आहे. १० वर्षांनी मी आज आलोय पण जोश आजही तेवढाच आहे. घड्याळात ९.४५ वाजलेत, १० वाजता प्रचार संपणार आहे, मात्र अजून १५ मिनिटे बाकी आहेत असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. त्यात १५ मिनिटे बाकी आहेत, जरा धीर धरा, ना ते माझा पाठलाग सोडणार आणि मी त्यांचा पाठलाग सोडणार असं सांगत अकबरुद्दीन यांनी मागील सभेत केलेले १५ मिनिटांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलीलyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदूMuslimमुस्लीम