शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती तुटली! पुण्यात भाजपा-NCP वेगळे लढणार; अजित पवार म्हणाले, "मी माझं सर्वस्व..."
2
प्रशासकराज संपणार : १५ जानेवारीला मतदान, तर १६ जानेवारीला निकाल! महापालिकांचा महासंग्राम
3
Plane Crash Mexico Video: इमर्जन्सी लँडिंगआधीच विमान कोसळले; भयंकर अपघातात १० जण ठार
4
TV खरेदीचा विचार करत असाल तर आत्ताच करा, जानेवारीपासून किंमत वाढवण्याची तयारी; कारण काय?
5
आचारसंहिता लागण्यापूर्वी सत्ताधाऱ्यांची धावपळ; प्रकल्पाची उद्घाटने, भूमिपूजन अन् घोषणांचा सपाटा
6
धनुर्मासारंभ: ९ राशींना शुभ काळ, सूर्यकृपेने दुप्पट लाभ; पद-पैसा वाढ, धनुसंक्रांती ठरेल खास!
7
आजचे राशीभविष्य, १६ डिसेंबर २०२५: सरकारी कामात यश, अचानक धनलाभ; सुखाचा दिवस
8
कोट-पँट घालून फिरलात तर अटक अटळ! शिक्षा लेखी नाही, पण चाबकाचे फटकारे अन्...
9
पाकिस्तानमध्ये शिजला पहलगाम हल्ल्याचा कट, सहा जणांविरोधात १,५९७ पानांचे आरोपपत्र!
10
क्रिकेटवेड्या देशाने मेस्सीवर जीव टाकला... पुढे? भारतीय फुटबॉलच्या विकासासाठी काय?
11
इंडिगो गोंधळाबाबतच्या याचिकेवर सुनावणी घेण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार; दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागण्याचे आदेश
12
एक कोटी मतदार बजावणार हक्क; मुंबई महापालिका निवडणूक : एक लाख दुबार मतदार तपासणीत वगळले जाण्याची शक्यता
13
ऑर्डर कॅन्सल करण्याच्या कारणावरून वाद; डिलिव्हरी बॉयचा मित्रावर चाकूहल्ला
14
संपादकीय : यत्र, तत्र, पाकिस्तान सर्वत्र! ऑस्ट्रेलियातील हल्ल्याचे पाकिस्तानी कनेक्शन
15
शत्रूला दिसणारच नाही भारताचे लढाऊ विमान, जळगावच्या बहिणाबाई विद्यापीठाचे संशोधन
16
...जेव्हा गुंडच पोलिसांच्या कॉलरला हात घालतात; कांदिवलीत ५ अटकेत
17
सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला-उत्तर कमी, गुंता अधिक! न्यायालयीन सल्ल्यामुळे राजकीय अनिश्चितता वाढली
18
आचारसंहितेच्या आधीच निधीचे जीआर, उद्घाटने अन् भूमिपूजनाचा सपाटा; आयोगाची करडी नजर
19
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
20
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
Daily Top 2Weekly Top 5

योगींच्या 'बटोगे तो कटोगे' घोषणेवरून पलटवार; "मी अकबरुद्दीन ओवैसी मुसलमान..." 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2024 15:40 IST

औरंगाबादचं नाव छत्रपती संभाजीनगर करण्यावरून अकबरुद्दीन ओवैसी यांनी सत्ताधाऱ्यांवर प्रश्नचिन्ह उभे केले. त्याशिवाय मराठवाडाच्या मागासलेपणावर भाष्य केले.  

छत्रपती संभाजीनगर - महाराष्ट्रात निवडणुकीच्या रणांगणात 'बटोगे तो कटोगे' असा योगी आदित्यनाथ यांचा नारा चर्चेत आला आहे. मात्र योगींच्या या घोषणेवरून एमआयएम नेते अकबरुद्दीन ओवैसी यांनी जोरदार पलटवार केला. बटोगे तो कटोगे असा नारा योगींनी दिला, पण बीफच्या नावाखाली, मॉब लिचिंगच्या नावावर, घरवापसी, डोक्यावर टोपी घातल्यामुळे, दाढी वाढवल्यामुळे जर तुम्ही कापत आहात. तर हा तुमचा द्वेष देशाला कमकुवत करत नाही का याचे उत्तर मला द्या असं अकबरुद्दीन ओवैसी यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर येथे जाहीर सभेत ते बोलत होते. 

अकबरुद्दीन ओवैसी म्हणाले की, योगींचे हे विधान हिंदू मुस्लिमांमध्ये तेढ निर्माण करणे म्हणजे देशाला कमकुवत करण्यासारखं नाही का...? मी अकबरुद्दीन औवेसी मुसलमान, या देशात भाडेकरू नाही. मोदी-योगी हा देश जेवढा तुमचा आहे तेवढाच आमचा आहे. हिंदुस्तान ना तुमची जाहागिरी आहे ना माझी...हिंदुस्तान हिंदू, मुस्लीम, शिख, इसाई, पारसी प्रत्येक धर्मातील माणसाचा आहे. कुणा एकाचा नाही असं त्यांनी सांगितले. 

तसेच आज देशातील सर्वात मोठी समस्या बेरोजगारी, महागाई, प्रत्येक २-३ मिनिटाला होणारे बलात्कार, पदवीधरांना नोकऱ्या, कमकुवत अर्थव्यवस्थेला चालना देणे, पेट्रोल डिझेल गॅसचे दर कमी करणे, रुपयाचा घसरता दर कमी करणे हे आहे. आज देशात बेघरांना घरे दिली जातायेत का, रोजगार दिले जातायेत का? हे काही होत नाही. केवळ धर्माच्या नावाखाली देशाचं विभाजन करण्याचं काम करत आहेत. जातीपातीचं राजकारण करू नका बोलणारे धर्माचं राजकारण करू नका ही गोष्ट का बोलत नाहीत असा सवाल अकबरुद्दीन ओवैसी यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांना विचारला. 

औरंगाबाद आमचं होतं, आहे अन् राहणार

महाराष्ट्रात मराठवाडा सर्वात मागासलेला भाग आहे. मी मराठा बोलतो, तेव्हा केवळ हिंदू मराठा नसतो, तर मुस्लीम मराठा, दलित मराठा मराठवाड्यात राहणारा प्रत्येकजण मराठा आहेत. ३० वर्षापूर्वी मराठवाडा वैधानिक विकास मंडळ बनवलं गेले, कागदावर आहे पण पैसे नाहीत. मराठा आरक्षणासह मराठवाडा वैधानिक विकास मंडळाला आम्ही ५० हजार कोटींचं पॅकेज देऊन मराठवाड्याला पुढे आणू. मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्या करतायेत. पाण्यासाठी वणवण भटकतायेत. दवाखाने नाहीत. १००-२०० किमी रुग्णालयात जाण्यासाठी लागतात. सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल मराठवाड्यात नाही. नाव बदलल्याने काम मिळणार का, अन्न मिळणार का, पाण्याची तहान भागणार का, आजारपण दूर होणार का? अरे नावात काय ठेवले. बेईमानींनी काम दाखवावं असं सांगत अकबरुद्दीन ओवैसी यांनी औरंगाबाद आमचं होतं, आमचं आहे अन् आमचेच राहणार असा इशारा सत्ताधाऱ्यांना दिला. 

दरम्यान, योगी येणार आहेत असं मला सांगितले गेले. "योगी तेरे आने का बाद अकबरभी आयेगा, मोदी तेरे आने का बाद अकबर भी आयेगा" २० तारखेला पतंग उडवणार आहे. १० वर्षांनी मी आज आलोय पण जोश आजही तेवढाच आहे. घड्याळात ९.४५ वाजलेत, १० वाजता प्रचार संपणार आहे, मात्र अजून १५ मिनिटे बाकी आहेत असं अकबरुद्दीन ओवैसी म्हणताच उपस्थित जनसमुदायाने एकच जल्लोष केला. त्यात १५ मिनिटे बाकी आहेत, जरा धीर धरा, ना ते माझा पाठलाग सोडणार आणि मी त्यांचा पाठलाग सोडणार असं सांगत अकबरुद्दीन यांनी मागील सभेत केलेले १५ मिनिटांच्या वादग्रस्त विधानाची आठवण करून दिली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीImtiaz Jalilइम्तियाज जलीलyogi adityanathयोगी आदित्यनाथNarendra Modiनरेंद्र मोदीHinduहिंदूMuslimमुस्लीम