शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
4
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
5
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
6
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
7
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
8
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
9
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
10
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
11
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
12
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
13
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
14
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
15
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
16
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
17
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
18
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
19
राजस्थानात आजपासून धर्मांतरविरोधी कायदा लागू; बुलडोझर कारवाईसह अनेक कठोर तरतुदी
20
८९ वर्षीय अभिनेते धर्मेंद्र मुंबईतील रुग्णालयात दाखल, चाहते चिंतेत; हेल्थ अपडेट आली समोर

महिलांना दरमहा ३ हजार रुपये, राहुल गांधी यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीची गॅरंटी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2024 07:47 IST

Maharashtra Assembly Election 2024: राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला.

 मुंबई - राज्यात महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यास महिलांना दरमहा ३ हजार रुपये आणि बेरोजगार तरुणांना चार हजार रुपये देण्याची घोषणा करीत मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा असणारे ‘गॅरंटी कार्ड’ आघाडीने जाहीर केले.

देशात सध्या विचारधारेची लढाई सुरू आहे. एकीकडे डॉ. आंबेडकरांचे संविधान, एकता, सन्मान आणि दुसरीकडे लपूनछपून संविधानाला कमजोर करण्याचे काम करणारे भाजप, आरएसएस यांच्यातील ही लढाई आहे. पण, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही. स्वाभिमानी जनता यासाठी इंडिया आघाडीच्या पाठिशी ठामपणे उभी राहील, असा विश्वास राहुल गांधी यांनी व्यक्त केला. नागपूरमध्ये सकाळी संविधान संमेलनात बोलताना त्यांनी आपले हक्क व अधिकारांपासून वंचित राहिलेल्या ९० टक्के भारतीयांना न्याय मिळवून देण्यास जातगणना होणारच, आरक्षणाची ५०% ची भिंतही तोडणार, असा निर्धार बोलून दाखविला. 

राहुल गांधी म्हणाले... संविधान कुणीही संपवू शकत नाही- मुंबई, महाराष्ट्र जाणतो धारावीची एक लाख करोड रुपये किमतीची जमीन, तुमची गरिबांची आहे. पण, तुमच्या डोळ्यासमोर तुमच्याकडून ती काढून घेतली जात आहे आणि ती एका अब्जाधीशाला दिली जात आहे.- राज्यातील सेमी कंडक्टर प्रकल्प, टाटा एरअबस, गेल पेट्रोकेमिकल, आयफोन प्रकल्प तुमचे होते, ते एकापाठोपाठ एक हिसकावून भाजपने गुजरातला नेले.- मोदी, भाजपच्या धोरणांनी बेरोजगारी वाढवली आहे. लहान आणि मध्यम उद्योजकांना यांनी एकामागून एक संपवले आहे. रोजगार अदानी, अंबानी देऊ शकत नाही.- संविधान संपले तर या देशातील दलित, आदिवासी, गरिबांच्या हातात काहीच राहणार नाही. तुमच्या हक्कांचे रक्षण संविधान करते. संविधान हे केवळ  पुस्तक नाही, तर या पुस्तकात महापुरुषांचे विचार, देशाचा आवाज आहे.- यात आंबेडकर, फुले, गांधीजी, बसवन्नाजी, नारायण गुरु, भगवान बुद्ध यांचा आवाज आहे. गरीब, मागासवर्ग, शेतकरी, दलित, आदिवासी, युवा यांचा आवाज यात आहे. - हळूहळू मोदी, भाजप आरएसएस या संविधानाला संपवण्याचे काम करत आहे. आम्ही सांगतो, संविधानाला कुणीही संपवू शकत नाही, असा इशारा त्यांनी दिला.

काँग्रेस गॅरंटी पूर्ण करणारा पक्ष : खरगेआम्ही महिलांना कर्नाटक, तेलंगनामध्ये दरमहा पैसे देतो, इथे आम्ही ३ हजार रुपये देण्याचे जाहीर केले आहे. पण मोदींनी मागील दहा वर्षात एकही गॅरंटी पूर्ण केली नाही. काँग्रेसची सत्ता असलेल्या राज्यात आम्ही दिलेल्या गॅरंटी पूर्ण केल्या, असा दावा काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांनी केला.

५ जीवनावश्यक वस्तूंचे दर स्थिर ठेवणार : ठाकरे राज्यातील जनतेला सर्व प्रकारचे कर लावून महागाईच्या खाईत लोटणाऱ्या सरकारला सत्तेतून खाली खेचून आम्ही पाच जीवनावश्यक वस्तूंचे दर कायम स्थिर ठेवणार आहोत. तसेच महिलांसाठी असलेल्या योजनेत अधिक भर घालू, असे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

शेतकऱ्यांना ३ लाखांपर्यंत कर्ज माफ : शरद पवारमहाविकास आघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर आम्ही सर्व शेतकऱ्यांचे तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करू तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपये परतावा दिला जाईल, असे ज्येष्ठ नेते शरद पवार म्हणाले.

टॅग्स :Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीcongressकाँग्रेसRahul Gandhiराहुल गांधीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरे