शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
3
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
4
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
5
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
6
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
7
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
8
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
9
'माझ्याविरोधात कुणी तक्रार दिली तर...'; शिवीगाळ केल्याच्या व्हिडीओवरुन दत्ता भरणेंचा इशारा
10
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
11
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली
12
लखनौ-गुवाहाटी-वाराणसी! KKR चं विमानाची दोन वेळा दिशा बदलली, खेळाडूंनी घेतलं काशी दर्शन अन् 
13
Maruti Baleno, जिम्नीसह पाच कारवर 1.50 लाखांपर्यंत कॅश डिस्काउंट, पाहा ऑफर्स...
14
गुड न्यूज! कोरोना व्हायरसच्या प्रत्येक व्हेरिएंटवर प्रभावी ऑल-इन-वन लस बनवताहेत शास्त्रज्ञ
15
दीपिका पदुकोण रणवीर सिंहसोबत एन्जॉय करतेय Babymoon, पहिल्यांदाच दिसला बेबीबंप
16
“संभ्रम निर्माण करण्यासाठी ही भेट आहे का?”; अमोल मिटकरींचा सुप्रिया सुळेंना थेट सवाल
17
काँग्रेसला सोडचिठ्ठी दिलेल्या राधिका खेडा, अभिनेता शेखर सुमन यांचा भाजपत प्रवेश
18
हे काका-काकूंचे घर! ऐन मतदानाच्या दिवशीच अजित पवारांच्या घरी का गेला? सुप्रिया सुळेंनी सांगितले कारण
19
Gold Silver Price: अक्षय्य तृतीयेपूर्वी घसरले सोन्याचे दर; आज 'इतकं' स्वस्त झालं १० ग्राम Gold 
20
दत्ता भरणेंच्या अडचणीत वाढ; सुप्रिया सुळेंकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार!

Vidhan Sabha 2019: भाजपप्रमाणे शिवसेनेच्या अजेंड्यावरही कलम 370

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 12:30 PM

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता.

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा नारळ फोडले आहे. तर युतीतील दोन्ही पक्षांनी सुद्धा राज्यातील विविध मतदारसंघात महत्वाच्या नेत्यांच्या सभेंचा धडाकाच लावला आहे. मात्र भाजपकडून स्थानिक प्रश्न सोडून कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे आरोप होत असताना, आता शिवसेनेने सुद्धा आपल्या प्रचारात कलम 370 वर भर दिला असल्याचे पहायला मिळत आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे मंत्र्यांनी आपल्या भाषणातून शेतकरी आत्महत्या, पाणी प्रश्न यासारख्या स्थानिक मुद्द्यांऐवजी देशभक्ती आणि कलम 370 च्या मुद्द्यांवर भर दिला असल्याचा आरोप होत आहे. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सुद्धा कलम 370 च्या मुद्यावर भर दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे भाजपप्रमाणे शिवसेनेचा सुद्धा निवडणुकीच्या प्रचारात कलम 370 चा मुद्दाच अजेंडा असणार असल्याचे चर्चा पहायला मिळत आहे.

शिवाजी पार्कवर झालेल्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात सुद्धा उद्धव यांनी कलम 370 वर भर दिला होता. त्यांनतर बुधवारी अहमदनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या सभेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कलम 370 काढले गेले, हे आनंदाची आणि अभिमानास्पद गोष्ट आहे. कलम 370 हटवणार हे आमच्या 'वचन'नाम्यात वचन होते, आणि ते आम्ही पाळले सुद्धा. ज्यावेळी आम्ही हे वचन दिले त्यावेळी काँग्रेसवाले म्हणत होते. काही झाले तरीही आम्ही कलम 370 रद्द करणार नाही. असा आरोप सुद्धा उद्धव ठाकरे यांनी यावेळी केला.

विधानसभा निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी झाल्याशिवाय आम्ही गप्प्प बसणार नाही, अशी भूमिका घेणारे उद्धव ठाकरे आता पुन्हा सरकार आल्यावर कर्जमाफी करणारच असे म्हणत आहे. तर भाजपप्रमाणे शिवसेना सुद्धा कलम 370 मुद्दा आपल्या प्रचारात मांडत असल्याचे पहायला मिळत आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील सभेमध्ये काश्मीरच्या मुद्द्यावर भर देण्याचा भाजप-शिवसेनेचा प्रयत्न चुकीचा असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहे.